चेन्नई : चेन्नईत व आजूबाजूच्या भागांत पावसाने विश्रांती घेतल्याने पूरप्रभावित लोक व बचाव दलाच्या जवानांना काहीसा दिलासा मिळाला खरा, पण एका खासगी रुग्णालयात कथितरीत्या व्हेन्टिलेटर बंद पडल्यामुळे १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी उघड झाल्यानंतर पूरबळींची संख्या ३१४वर पोहोचली आहे. पूरप्रभावित तामिळनाडूला देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे; शिवाय अमेरिकेनेही मदतीचा हात पुढे केला आहे. लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने जीवितहानी रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू ठेवली आहे. अर्थात जनजीवन काही पूर्वपदावर आलेले नाही. शुक्रवारी चेन्नईच्या एका सरकारी रुग्णालयात ४५ मृतदेह आणले गेले. यापैकी १८ रुग्णांचा मृत्यू हा एका झाल्याचे समजते. येथील एका खासगी रुग्णालयाच्या जनरेटर रूममध्ये पुराचे पाणी शिरल्याने रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला आणि यामुळे कथितरीत्या व्हेन्टिलेटर बंद झाल्याने १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. मृत रुग्णांच्या नातेवाईकांनीच पत्रकारांशी बोलताना हा दावा केला. रुग्णालयाने याप्रकरणी मौन बाळगले असून तामिळनाडू सरकारने चौकशीचे संकेत दिले आहेत. संबंधित रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ७५ रुग्ण होते. यापैकी व्हेन्टिलेटरवर असलेल्या ५७ रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले. उर्वरित रुग्णांचा गेल्या दोन ते तीन दिवसांत मृत्यू झाला. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करता येणार नाही. सरकारने या प्रकरणाचा तपास चालवला आहे, असे राज्याचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी सांगितले.ओडिशा सरकारने तामिळनाडूला ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. तर स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनेही पूरग्रस्तांसाठी २ लाख रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे. उत्तराखंड सरकारनेही तामिळनाडूला मदतीचा प्रस्ताव दिला आहे.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) चेन्नई व आजूबाजूच्या पूरप्रभावित भागांतील मदत व बचाव कार्यासाठी आपली आणखी २० पथके रवाना केली. एनडीआरएफने आतापर्यंत १० हजारांपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित हलविले आहे.वीजपुरवठा, संपर्क सेवा, वाहतूक सेवा अद्यापही विस्कळीत आहे. पाणी आणि दूध, भाजीपाल्यासह पेट्रोल-डिझेलचा तुटवडा अद्यापही कायम आहे.पुड्डुचेरीतही मुसळधार... एक महिन्यापासून पावसाचा प्रकोप झेलणाऱ्या पुड्डुचेरीतही जनजीवन ठप्प झाले असून, बचाव कार्यातही अनेक अडचणी आहेत.अमेरिकेचा मदतीचा प्रस्तावअमेरिका तामिळनाडूच्या लोकांसोबतच भारत सरकारच्या मदतीसाठीही तयार आहे. अमेरिका भारत सरकारच्या संपर्कात असून या संकटसमयी मदतीसाठी तत्पर आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपप्रवक्ते मार्क सी. टोनर यांनी गुरुवारी वॉशिंग्टन येथे म्हटले.मुल्लपेरियार धरणाचा जलस्तर वाढलाथेनी : ईशान्य मान्सून पावसामुळे तामिळनाडूतील जनजीवन विस्कळीत झाले पण यामुळे मुल्लपेरियार धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे. शुक्रवारी लोकसभेत काँगे्रसचे एंटो अॅन्टनी यांनी मुल्लपेरिया धरणाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. धरणाचा जलस्तर वाढला असून भिंतीला तडा गेला आहे, असे ते म्हणाले.
आॅक्सिजनअभावी १८ रुग्णांचा मृत्यू
By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST