शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

लोककल्याणाची ऐशीतैशी : १.६२ लाख कोटींचा उपकर केंद्राने लाटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:06 IST

मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून पहिल्या तीन वर्षांत विविध उपकरांच्या (सेस) माध्यमातून ३.९४ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला. मात्र हे उपकर ज्या योजनांसाठी लागू करण्यात केले गेले त्या योजनांवर हा पैसा पूर्णपणे खर्च केला गेला नाही. उपकराच्या महसुलापैकी फक्त २.३२ लाख कोटी रुपये सरकारने खर्च केले असून, बाकीचे १.६२ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने स्वत:च्या खिशात घातले आहेत.

- हरिश गुप्तानवी दिल्ली  - मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून पहिल्या तीन वर्षांत विविध उपकरांच्या (सेस) माध्यमातून ३.९४ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला. मात्र हे उपकर ज्या योजनांसाठी लागू करण्यात केले गेले त्या योजनांवर हा पैसा पूर्णपणे खर्च केला गेला नाही. उपकराच्या महसुलापैकी फक्त २.३२ लाख कोटी रुपये सरकारने खर्च केले असून, बाकीचे १.६२ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने स्वत:च्या खिशात घातले आहेत.उपकर म्हणजे आधीपासून लागू असलेल्या एखाद्या करावर ठरावीक उद्दिष्टासाठी व मर्यादित कालावधीसाठी लागू केलेला अधिभार. यातून गोळा होणारा पैसा ज्या योजनांसाठी गोळा केला, त्यावरच खर्च करावा लागतो, शिवाय इतर करांच्या महसुलाप्रमाणे उपकरांमध्ये राज्यांना वाटा मिळत नसल्याने, यातून जमा होणारी सर्व रक्कम केंद्राच्याच तिजोरीत जमा होत असते.१५व्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारसी मान्य केल्याने, सध्या केंद्र सरकार करांच्या महसुलातील आत्तापर्यंतचा सर्वात जास्त म्हणजे ४२ टक्के वाटा राज्यांना देत असल्याचा दावा मोदी सरकार करत अहे. शिवाय स्वच्छ भारत अभियान, प्राथमिक शिक्षा कोष, क्लीन एनर्जी फंड यासारख्या कल्याणकारी योजनांवर केंद्र सरकार उपकरातून मिळतो त्याहून अधिक पैसा खर्च करत असल्याचाही मोदी सरकारचा दावा आहे. (विविध प्रकारच्या उपकरांतून जमा झालेली रक्कम व खर्च झालेली रक्कम यांचा तपशील सोबतच्या तक्त्यांमध्ये दिली आहे.)परंतु सरकारी आकडेवारीचे बारकाईने विश्लेषण केले असता सन २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ या गेल्या तीन वित्तीय वर्षांत उपकरामधून मिळालेल्या महसुलाची रक्कम विविध योजनांवर खर्च करताना मोदी सरकारने हात आखडता घेतल्याचे चित्र दिसते. या तीन वर्षांत सरकारने उपकरांच्या माध्यमांतून ३.९४ कोटी रुपये जमा केले व त्यापैकी फक्त २.३२ कोटी रुपये खर्च केले. एवढेच नव्हे तर दरवर्षी उपकरांतून मिळालेली रक्कम खर्च न करता जास्तीत जास्त प्रमाणात बाजूला काढून ठेवण्याचे नवनवे मार्ग सरकारने शेधल्याचेही दिसते.मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा केंद्र सरकारचे विविध प्रकारचे ३७ उपकर लागू होते. त्यापैकी काही उपकर रद्द करून व काही उपकर एकमेकांत विलिन करून सरकारने एकूण उपकरांची संख्या २३ वर आणली. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचा अपवाद वगळला तर मोदी सरकारने त्यांच्या पहिल्या तीन वर्षांत ज्यासाठी निधी गोळा केले ते त्या त्या योजनांवर पूर्णपणे खर्च केलेले नाहीत. यात स्वच्छ भारत अभियान, क्लीन एनर्जी व प्राथमिक शिक्षण यारख्या स्वत: मोदी यांच्या लाडक्या व महत्त्वाकांक्षी योजनांचाही समावेश आहे.स्वत: तेच करत आहेतविशेष म्हणजे मोदी सरकारची चलाखी उघड करणारी ही माहिती, सरकारनेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार विवेक गुप्ता यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात राज्यसभेत दिली आहे. केंद्र सरकार उपकरातून पैसा गोळा करते, पण तो ठरलेल्या योजनांवर खर्च करत नाही किंवा त्यातील वाटा राज्यांनाही देत नाही, अशी टीका मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, तेव्हाच्या काँग्रेसच्या सरकारवर करायचे. आता दिल्लीच्या खुर्चीवर बसल्यावर मोदी स्वत: तेच करत आहेत, हा विरोधाभास लक्षणीय आहे.- सन २०१४-१५ या सत्तेच्या पहिल्या वर्षात या सरकारने ३७ प्रकारच्या उपकरांमधून मिळालेल्या ८९,११७ कोटी रुपयांपैैकी फक्त ५७,७३३ कोटी रुपये विविध योजनांवर खर्च केले.- त्यापुढील २०१५-१६ या वर्षात उपकरांतून १.३६ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला, पण त्यापैकी फक्त ७३,९६५ कोटी रुपये खर्च केले गेले.

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीTaxकर