शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

३५ वर्षांत १५ हजारांवर मृत्युमुखी

By admin | Updated: June 14, 2015 23:58 IST

सन १९८० पासून गत ३५ वर्षांत नक्षली हिंसाचारात ३ हजार सुरक्षा जवानांसह एकूण १५ हजारांवर लोक मृत्युमुखी पडले आहेत.

नवी दिल्ली : सन १९८० पासून गत ३५ वर्षांत नक्षली हिंसाचारात ३ हजार सुरक्षा जवानांसह एकूण १५ हजारांवर लोक मृत्युमुखी पडले आहेत.माहिती अधिकार कायद्याअंतर्गत एका अर्जाच्या उत्तरादाखल केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गत ३५ वर्षांत नक्षल्यांनी १२,१७७ नागरिकांचा बळी घेतला. शिवाय नक्षल्यांशी चार हात करताना ३१२५ सुरक्षा जवान शहीद झाले. याउलट १९८० ते ३१ मे २०१५ या काळात ४७६८ नक्षल्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले.माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दाखल अन्य एका अर्जाला उत्तर देताना गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गत तीन वर्षांत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणापोटी विविध राज्यांना ३,०३८.८६ कोटी रुपयांचा निधी दिला गेला. २०१२-१३ आणि २०१४-१५ या वित्तीय वर्षांत आंध्र प्रदेशला पोलीस दल आधुनिकीकरण योजनेअंतर्गत १६१ कोटी रुपये दिले गेले. उत्तर प्रदेशला ३७७ कोटी रुपये, तर छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांना अनुक्रमे ७३ कोटी व ६९ कोटी रुपयांचे वाटप केले गेले. गुजरातला १६४ कोटी, जम्मू-काश्मीरला २२८ कोटी, कर्नाटकला २०० कोटी, मध्यप्रदेशला १३३ कोटी, तर महाराष्ट्राला १९९ कोटी रुपये दिले गेले. ओडिशा, राजस्थान व तामिळनाडू या तीन राज्यांनाही अनुक्रमे १०० कोटी, १८१ कोटी आणि १७३ कोटी रुपये जारी केले गेले. आंध्रचे विभाजन होऊन अस्तित्वात आलेल्या नवनिर्मित तेलंगण राज्याला २०१४-१५ या वित्तीय वर्षात ६८.१३ कोटी रुपये दिले गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)