शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

३५ वर्षांत १५ हजारांवर मृत्युमुखी

By admin | Updated: June 14, 2015 23:58 IST

सन १९८० पासून गत ३५ वर्षांत नक्षली हिंसाचारात ३ हजार सुरक्षा जवानांसह एकूण १५ हजारांवर लोक मृत्युमुखी पडले आहेत.

नवी दिल्ली : सन १९८० पासून गत ३५ वर्षांत नक्षली हिंसाचारात ३ हजार सुरक्षा जवानांसह एकूण १५ हजारांवर लोक मृत्युमुखी पडले आहेत.माहिती अधिकार कायद्याअंतर्गत एका अर्जाच्या उत्तरादाखल केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गत ३५ वर्षांत नक्षल्यांनी १२,१७७ नागरिकांचा बळी घेतला. शिवाय नक्षल्यांशी चार हात करताना ३१२५ सुरक्षा जवान शहीद झाले. याउलट १९८० ते ३१ मे २०१५ या काळात ४७६८ नक्षल्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले.माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दाखल अन्य एका अर्जाला उत्तर देताना गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गत तीन वर्षांत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणापोटी विविध राज्यांना ३,०३८.८६ कोटी रुपयांचा निधी दिला गेला. २०१२-१३ आणि २०१४-१५ या वित्तीय वर्षांत आंध्र प्रदेशला पोलीस दल आधुनिकीकरण योजनेअंतर्गत १६१ कोटी रुपये दिले गेले. उत्तर प्रदेशला ३७७ कोटी रुपये, तर छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांना अनुक्रमे ७३ कोटी व ६९ कोटी रुपयांचे वाटप केले गेले. गुजरातला १६४ कोटी, जम्मू-काश्मीरला २२८ कोटी, कर्नाटकला २०० कोटी, मध्यप्रदेशला १३३ कोटी, तर महाराष्ट्राला १९९ कोटी रुपये दिले गेले. ओडिशा, राजस्थान व तामिळनाडू या तीन राज्यांनाही अनुक्रमे १०० कोटी, १८१ कोटी आणि १७३ कोटी रुपये जारी केले गेले. आंध्रचे विभाजन होऊन अस्तित्वात आलेल्या नवनिर्मित तेलंगण राज्याला २०१४-१५ या वित्तीय वर्षात ६८.१३ कोटी रुपये दिले गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)