शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

३५ वर्षांत १५ हजारांवर मृत्युमुखी

By admin | Updated: June 14, 2015 23:58 IST

सन १९८० पासून गत ३५ वर्षांत नक्षली हिंसाचारात ३ हजार सुरक्षा जवानांसह एकूण १५ हजारांवर लोक मृत्युमुखी पडले आहेत.

नवी दिल्ली : सन १९८० पासून गत ३५ वर्षांत नक्षली हिंसाचारात ३ हजार सुरक्षा जवानांसह एकूण १५ हजारांवर लोक मृत्युमुखी पडले आहेत.माहिती अधिकार कायद्याअंतर्गत एका अर्जाच्या उत्तरादाखल केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गत ३५ वर्षांत नक्षल्यांनी १२,१७७ नागरिकांचा बळी घेतला. शिवाय नक्षल्यांशी चार हात करताना ३१२५ सुरक्षा जवान शहीद झाले. याउलट १९८० ते ३१ मे २०१५ या काळात ४७६८ नक्षल्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले.माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दाखल अन्य एका अर्जाला उत्तर देताना गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गत तीन वर्षांत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणापोटी विविध राज्यांना ३,०३८.८६ कोटी रुपयांचा निधी दिला गेला. २०१२-१३ आणि २०१४-१५ या वित्तीय वर्षांत आंध्र प्रदेशला पोलीस दल आधुनिकीकरण योजनेअंतर्गत १६१ कोटी रुपये दिले गेले. उत्तर प्रदेशला ३७७ कोटी रुपये, तर छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांना अनुक्रमे ७३ कोटी व ६९ कोटी रुपयांचे वाटप केले गेले. गुजरातला १६४ कोटी, जम्मू-काश्मीरला २२८ कोटी, कर्नाटकला २०० कोटी, मध्यप्रदेशला १३३ कोटी, तर महाराष्ट्राला १९९ कोटी रुपये दिले गेले. ओडिशा, राजस्थान व तामिळनाडू या तीन राज्यांनाही अनुक्रमे १०० कोटी, १८१ कोटी आणि १७३ कोटी रुपये जारी केले गेले. आंध्रचे विभाजन होऊन अस्तित्वात आलेल्या नवनिर्मित तेलंगण राज्याला २०१४-१५ या वित्तीय वर्षात ६८.१३ कोटी रुपये दिले गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)