शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

देशात मिनिटाला १५ आत्महत्या !

By admin | Updated: July 20, 2015 01:50 IST

गतवर्षी देशात दर मिनिटाला १५ व्यक्तींनी आत्महत्या करून आयुष्य संपवले. सन २०१४ मध्ये देशभरात एकूण १.३१ लाख लोकांनी आत्महत्या केली.

नवी दिल्ली : गतवर्षी देशात दर मिनिटाला १५ व्यक्तींनी आत्महत्या करून आयुष्य संपवले. सन २०१४ मध्ये देशभरात एकूण १.३१ लाख लोकांनी आत्महत्या केली. या वर्षात देशातील विविध राज्यांपैकी महाराष्ट्रात आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या, तर शहरांमध्ये चेन्नईत सर्वाधिक आत्महत्या झाल्या.राष्ट्रीय गुन्हे नोंदणी शाखेच्या (एनसीआरबी) अहवालातून हे वास्तव समोर आले आहे. अहवालानुसार सन २०१४ मध्ये महाराष्ट्रात आत्महत्येच्या १६,३०७ घटना घडल्या. या पाठोपाठ तामिळनाडूत १६,१२२ आाणि पश्चिम बंगालमध्ये अशा १४,३१० घटना घडल्या. टक्केवारीत सांगायचे तर महाराष्ट्रात गतवर्षी सर्वाधिक म्हणजे १२.४ टक्के, तर तामिळनाडू आणि प. बंगालमध्ये अनुक्रमे १२.२ आणि १०.९ टक्के आत्महत्या घडल्या. आत्महत्या केलेल्या ६९.७ टक्के लोकांचे वार्र्षिक उत्पन्न एक लाखापेक्षाही कमी होते. याशिवाय जीवन संपविणाऱ्या प्रत्येक सहापैकी एक गृहिणी होती, असेही या अहवालातून उघड झाले आहे.सर्वाधिक अपघाती मृत्यू राज्यातराज्यातील रस्ते अधिकाधिक असुरक्षित बनत असल्याचे चित्र राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून निर्माण होत आहे. २०१४ या वर्षात देशभरातील रस्ते अपघातात तब्बल १.४ लाख लोकांचे बळी गेले आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक बळी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत गेले आहेत. वर्षभरात देशात झालेल्या एकूण ४.५ लाख अपघातांपैकी सर्वाधिक अपघात झालेल्या राज्यांच्या यादीतही महाराष्ट्राचा समावेश आहे.२०१३ च्या तुलनेत गेल्या वर्षी रस्ते अपघातात ३ टक्के अधिक लोकांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी रस्ते अपघातात तब्बल ४.८ लाख लोक जखमी झाले आहेत. वेगाने आणि धोकादायकरित्या वाहाने हाकणे, हे वाढत्या अपघातांमागील प्रमुख कारण आहे. तसेच मोटारसायकल आणि ट्रक-लॉरी यांचा सहभाग असलेल्या अपघातांचे प्रमाण एकूण अपघातांच्या निम्मे आहे. दुचाकीच्या अपघातांत १३,७८७ चालक ठार झाले आहेत, तर २३,५२९ अन्य लोक बळी पडले आहेत.