शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

देशात मिनिटाला १५ आत्महत्या !

By admin | Updated: July 20, 2015 01:50 IST

गतवर्षी देशात दर मिनिटाला १५ व्यक्तींनी आत्महत्या करून आयुष्य संपवले. सन २०१४ मध्ये देशभरात एकूण १.३१ लाख लोकांनी आत्महत्या केली.

नवी दिल्ली : गतवर्षी देशात दर मिनिटाला १५ व्यक्तींनी आत्महत्या करून आयुष्य संपवले. सन २०१४ मध्ये देशभरात एकूण १.३१ लाख लोकांनी आत्महत्या केली. या वर्षात देशातील विविध राज्यांपैकी महाराष्ट्रात आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या, तर शहरांमध्ये चेन्नईत सर्वाधिक आत्महत्या झाल्या.राष्ट्रीय गुन्हे नोंदणी शाखेच्या (एनसीआरबी) अहवालातून हे वास्तव समोर आले आहे. अहवालानुसार सन २०१४ मध्ये महाराष्ट्रात आत्महत्येच्या १६,३०७ घटना घडल्या. या पाठोपाठ तामिळनाडूत १६,१२२ आाणि पश्चिम बंगालमध्ये अशा १४,३१० घटना घडल्या. टक्केवारीत सांगायचे तर महाराष्ट्रात गतवर्षी सर्वाधिक म्हणजे १२.४ टक्के, तर तामिळनाडू आणि प. बंगालमध्ये अनुक्रमे १२.२ आणि १०.९ टक्के आत्महत्या घडल्या. आत्महत्या केलेल्या ६९.७ टक्के लोकांचे वार्र्षिक उत्पन्न एक लाखापेक्षाही कमी होते. याशिवाय जीवन संपविणाऱ्या प्रत्येक सहापैकी एक गृहिणी होती, असेही या अहवालातून उघड झाले आहे.सर्वाधिक अपघाती मृत्यू राज्यातराज्यातील रस्ते अधिकाधिक असुरक्षित बनत असल्याचे चित्र राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून निर्माण होत आहे. २०१४ या वर्षात देशभरातील रस्ते अपघातात तब्बल १.४ लाख लोकांचे बळी गेले आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक बळी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत गेले आहेत. वर्षभरात देशात झालेल्या एकूण ४.५ लाख अपघातांपैकी सर्वाधिक अपघात झालेल्या राज्यांच्या यादीतही महाराष्ट्राचा समावेश आहे.२०१३ च्या तुलनेत गेल्या वर्षी रस्ते अपघातात ३ टक्के अधिक लोकांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी रस्ते अपघातात तब्बल ४.८ लाख लोक जखमी झाले आहेत. वेगाने आणि धोकादायकरित्या वाहाने हाकणे, हे वाढत्या अपघातांमागील प्रमुख कारण आहे. तसेच मोटारसायकल आणि ट्रक-लॉरी यांचा सहभाग असलेल्या अपघातांचे प्रमाण एकूण अपघातांच्या निम्मे आहे. दुचाकीच्या अपघातांत १३,७८७ चालक ठार झाले आहेत, तर २३,५२९ अन्य लोक बळी पडले आहेत.