शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

१५.... पारशिवनी... अपघात

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

अपघात नसून घातपाताचा संशय

अपघात नसून घातपाताचा संशय
नातेवाइकांची पोलिसांत तक्रार : रवींद्र ठाकूर यांचा अपघातात मृत्यू
पारशिवनी : पारशिवनी-सावनेर मार्गावरील करंभाड परिसरात रवींद्र ठाकूर रा. पालासावळी, ता. पारशिवनी यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. मात्र, त्यांचा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याचा संशय मृताच्या नातेवाइकांनी व्यक्त केला असून, यासंदर्भात पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
पारशिवनी-सावनेर मार्गावरील करंभाड शिवारात रवींद्र ठाकूर यांचा मृतदेह मंगळवारी (दि.१०) रात्री ७ ते ८ वाजताच्या दरम्यान रोडवर पडला असल्याचे आढळून आले होते. रवींद्र ठाकूर हे नेटसर्फ कम्युनिकेशनमध्ये मार्केटिंगचे काम करायचे. ते मंगळवारी केळवद परिसरात कंपनीच्या बैठकीला गेले होते. दरम्यान, अनोळखी व्यक्तीचा फोन आल्याने ते बैठक सोडून निघून आले. त्यांचे काही व्यक्तींशी आर्थिक व्यवहारातून २५ डिसेंबर २०१४ रोजी भांडण झाले होते. त्यात संबंधित व्यक्तींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती, असेही तक्रारीत नमूद केले आहे.
त्यांचा मृतदेह करंभाडपासून एक कि.मी. अंतरावर आढळून आला. त्यांची मोटरसायकल रोडच्या कडेला पडलेली होती. त्यांच्याजवळील बॅगमध्ये असलेल्या डायरीवर रक्ताचे डाग आढळून आले. त्यांचा चष्मा, पेन कुठेही आढळून आला नाही, शिवाय त्यांच्या शर्टच्या खिशाला पेनाचे टोपन लटकलेले होते. पारशिवनीचे ठाणेदार दिलीप मेश्राम हे घटनास्थळी पोहोचले त्यावेळी ठाकूर यांचा मोबाईल सुरू होता. त्यामुळे त्यांचा इतरत्र खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशााने मृतदेह करंभाड शिवारात फेकला असावा, अशी शक्यताही नातेवाइकांनी व्यक्त केली. सदर घटनेची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणीही ठाकूर यांच्या नातेवाइकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
***