शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

15 कोटी भारतीय मानसिक समस्यांनी त्रस्त

By admin | Updated: October 25, 2016 18:05 IST

भारतातील तब्बल 15 कोटी प्रौढ नागरिक मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 
बंगळुरू, दि. 25 - भारतीयांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले असून, देशातील तब्बल 15 कोटी प्रौढ नागरिक  मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ आणि न्युरो सायन्स (निम्हान्स) ने राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण 2016 हा सर्वे केला होता. या सर्वेअंतर्गत तामिळनाडू, केरळ, गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल मणिपूर आणि आसाममधील 40 हजार प्रौढ आणि 1 हजार 200 किशोरवयीनांचे मानसिक आरोग्य तपासण्यात आले होते. या सर्वेमधून छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मणिपूर आणि आसाम या राज्यांमधील नागरिकांमध्ये सर्वाधिक मानसिक समस्या आढळून  आली आहे. तर कर्नाटकमध्ये एकूण लोकसंख्येच्य 8 टक्के नागरिक हे मानसिक आजारांनी त्रस्त असल्याचे समोर आले आहे. तसेच 13 ते 17 वयोगटातील सुमारे 7.3 टक्के मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. 
(मानसिक आरोग्याकडे पाहताना) 
या सर्वेमधून  दर दहापैकी एका व्यक्तीला नैराश्य, चिंता यांसारख्या मानसिक समस्या भेडसावत असून त्यातील नैराश्याने ग्रस्त असलेल्या लोकांचे प्रमाण अधिक असल्याची माहितीही समोर आली आहे. "शहरी भागांमध्ये मानसिक ताणतणावाच्या समस्येचे प्रमाण अधिक आहे. तसेच कनिष्ठ उत्पन्न गट आणि अल्पशिक्षित लोक मानसिक तणावाची शिकार होण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही आढळून आले आहे," असे हा सर्वे करणाऱ्या निम्हासचे निर्देशक डॉ. बी. एन. गंगाधर यांनी सांगितले.