शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पिकल्या पानाची काटेरी होरपळ मुलांचे दुर्लक्ष : १५ निराधार माता-पित्यांची जिल्हा प्रशासनाकडे धाव

By admin | Updated: August 1, 2016 23:57 IST

जळगाव : आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मुले आणि सुनांनी सांभाळ करावा, आजारपणात देखभाल करावी इतकी माफक अपेक्षा ठेवणार्‍या मातापित्यांकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. प्रेमाची माणसे आणि हक्काचे घर मिळेल का? या आर्त मागणीसाठी जिल्हाभरातील १५ निराधार ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मुलांविरुद्ध जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी हात पसरविले आहे.

जळगाव : आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मुले आणि सुनांनी सांभाळ करावा, आजारपणात देखभाल करावी इतकी माफक अपेक्षा ठेवणार्‍या मातापित्यांकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. प्रेमाची माणसे आणि हक्काचे घर मिळेल का? या आर्त मागणीसाठी जिल्हाभरातील १५ निराधार ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मुलांविरुद्ध जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी हात पसरविले आहे.
निराधार मातापित्यांची होरपळ
तुळशी वृंदावनाची जागा मनी प्लान्टने घेतली आणि पाश्चात्य संस्कृतीमुळे संयुक्त कुटुंबपद्धतीचा र्‍हास झाला. यासार्‍यात पती, पत्नी व मुले अशी कुटुंबाची मर्यादित संकल्पना राहिली. छोट्याशा कुटुंबात आई-वडील नकोसे वाटू लागले. ज्या मुलाच्या सुखासाठी आणि स्वप्नांसाठी दिवसरात्र केले, तोच मुलगा आणि सुनेकडून अवहेलना होऊ लागल्याने अनेक मातापित्यांची पोटगीसाठी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे.

पिकल्या पानांना कायद्याचे कवच
आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ नुसार वृद्ध आई वडिलांना पोटगी, वृद्धाश्रमाचा आधार, वैद्यकीय सेवा याबरोबर त्यांना व त्यांच्या मालमत्तांना संरक्षण मिळाले आहे. देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेत हा कायदा ३१ डिसेंबर २००७ रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाला. महाराष्ट्रात हा कायदा १ मार्च २००९ पासून लागू करण्यात आला आहे. प्रातांधिकारी यांच्याकडे या प्रकरणांचे कामकाज चालणार आहे. प्रातांधिकार्‍यांनी या प्रकरणात नोटीस काढल्यानंतर ९० दिवसात त्यांचा निकाल लावणे बंधनकारक आहे.
या कायद्यानुसार दाद कुणी मागावी
ज्येष्ठ नागरिकाने स्वत:चा सांभाळ करण्यास असमर्थ आहे. त्यांना मिळणार्‍या उत्पन्नातून त्यांचा सांभाळ शक्य नाही. या प्रकारचा अर्ज ज्येष्ठ नागरिक किंवा एखादी अधिकृत संघटना त्यांचा मुलगा, मुलगी किंवा नातेवाईक यांच्याविरोधात प्रातांधिकारी यांच्याकडे देऊ शकतात. पोटगीची रक्कम जास्तीत जास्त दहा हजार रुपये देण्याची तरतूद आहे. या आदेशाचे पालन न केल्यास तीन महिन्यापर्यंतची शिक्षा व ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.