शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

पिकल्या पानाची काटेरी होरपळ मुलांचे दुर्लक्ष : १५ निराधार माता-पित्यांची जिल्हा प्रशासनाकडे धाव

By admin | Updated: August 1, 2016 23:57 IST

जळगाव : आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मुले आणि सुनांनी सांभाळ करावा, आजारपणात देखभाल करावी इतकी माफक अपेक्षा ठेवणार्‍या मातापित्यांकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. प्रेमाची माणसे आणि हक्काचे घर मिळेल का? या आर्त मागणीसाठी जिल्हाभरातील १५ निराधार ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मुलांविरुद्ध जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी हात पसरविले आहे.

जळगाव : आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मुले आणि सुनांनी सांभाळ करावा, आजारपणात देखभाल करावी इतकी माफक अपेक्षा ठेवणार्‍या मातापित्यांकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. प्रेमाची माणसे आणि हक्काचे घर मिळेल का? या आर्त मागणीसाठी जिल्हाभरातील १५ निराधार ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मुलांविरुद्ध जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी हात पसरविले आहे.
निराधार मातापित्यांची होरपळ
तुळशी वृंदावनाची जागा मनी प्लान्टने घेतली आणि पाश्चात्य संस्कृतीमुळे संयुक्त कुटुंबपद्धतीचा र्‍हास झाला. यासार्‍यात पती, पत्नी व मुले अशी कुटुंबाची मर्यादित संकल्पना राहिली. छोट्याशा कुटुंबात आई-वडील नकोसे वाटू लागले. ज्या मुलाच्या सुखासाठी आणि स्वप्नांसाठी दिवसरात्र केले, तोच मुलगा आणि सुनेकडून अवहेलना होऊ लागल्याने अनेक मातापित्यांची पोटगीसाठी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे.

पिकल्या पानांना कायद्याचे कवच
आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ नुसार वृद्ध आई वडिलांना पोटगी, वृद्धाश्रमाचा आधार, वैद्यकीय सेवा याबरोबर त्यांना व त्यांच्या मालमत्तांना संरक्षण मिळाले आहे. देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेत हा कायदा ३१ डिसेंबर २००७ रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाला. महाराष्ट्रात हा कायदा १ मार्च २००९ पासून लागू करण्यात आला आहे. प्रातांधिकारी यांच्याकडे या प्रकरणांचे कामकाज चालणार आहे. प्रातांधिकार्‍यांनी या प्रकरणात नोटीस काढल्यानंतर ९० दिवसात त्यांचा निकाल लावणे बंधनकारक आहे.
या कायद्यानुसार दाद कुणी मागावी
ज्येष्ठ नागरिकाने स्वत:चा सांभाळ करण्यास असमर्थ आहे. त्यांना मिळणार्‍या उत्पन्नातून त्यांचा सांभाळ शक्य नाही. या प्रकारचा अर्ज ज्येष्ठ नागरिक किंवा एखादी अधिकृत संघटना त्यांचा मुलगा, मुलगी किंवा नातेवाईक यांच्याविरोधात प्रातांधिकारी यांच्याकडे देऊ शकतात. पोटगीची रक्कम जास्तीत जास्त दहा हजार रुपये देण्याची तरतूद आहे. या आदेशाचे पालन न केल्यास तीन महिन्यापर्यंतची शिक्षा व ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.