शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

देशात पावसाची १४ टक्के तूट; परतीच्या पावसानेही दिला दगा

By admin | Updated: October 20, 2015 03:41 IST

देशातील बहुतांश भागातून मान्सून परतला असताना यंदा सरासरीपेक्षा तब्बल १४ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. २००९ नंतर मान्सूनमध्ये झालेला हा सर्वात कमी पाऊस आहे.

नवी दिल्ली : देशातील बहुतांश भागातून मान्सून परतला असताना यंदा सरासरीपेक्षा तब्बल १४ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. २००९ नंतर मान्सूनमध्ये झालेला हा सर्वात कमी पाऊस आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्रात तर पावसाची तब्बल ३३ टक्के एवढी तूट नोंदली गेली आहे. परतीच्या पावसानेही यंदा दगा दिला आहे. गेल्या दशकात २००२ व २००९ मध्ये देशात अपुरा पाऊस पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यात अनुक्रमे १९.२% व २१.८% तूट होती.विशेष म्हणजे २००९ मध्ये एकीकडे जागतिक मंदीचे संकट असताना दुसरीकडे मान्सूनने सुद्धा भारताला दगा दिला होता. तर १९७९ मध्ये १९% कमी पाऊस झाला होता. १९७९ नंतरचे हे सर्वात कमी चौथ्या क्रमांकाचे पर्जन्यमान आहे. २००२ मध्येही देशात पावसाने मोठी ओढ दिली होती. यंदा देशात ८८७.५ मिमी सर्वसाधारण पर्जनाच्या तुलनेत जून ते सप्टेंबरमध्ये ७६० मिमी पाऊस झाला. २०१४ मध्ये देशात ७८१.७ मिमी पाऊस झाला होता.आभाळाकडे डोळे लागलेल्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच देशाच्या उत्तर पश्चिम (वायव्य) भागात सप्टेंबरमध्ये पाऊस होऊनही देशातील या महिन्यामधील एकूण पर्जन्यमान २००५ नंतर सर्वात कमी होते. सप्टेंबरमध्ये भारतात सर्वसाधारणपेक्षा २४% कमी म्हणजे १३१.४ मिमी पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क) दुष्काळ नाही !भारतीय हवामान शास्त्र विभाग मात्र देशातील पावसाच्या या स्थितीस दुष्काळ मानण्यास तयार नाही. कारण संपूर्ण देशात पाण्याची एकसारखी स्थिती नसते. एल निनोचा प्रभाव यंदाच्या कमी पावसास कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कमी पावसाचे प्रदेशउत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी ओढ दिली.