शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

देशात पावसाची १४ टक्के तूट; परतीच्या पावसानेही दिला दगा

By admin | Updated: October 20, 2015 03:41 IST

देशातील बहुतांश भागातून मान्सून परतला असताना यंदा सरासरीपेक्षा तब्बल १४ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. २००९ नंतर मान्सूनमध्ये झालेला हा सर्वात कमी पाऊस आहे.

नवी दिल्ली : देशातील बहुतांश भागातून मान्सून परतला असताना यंदा सरासरीपेक्षा तब्बल १४ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. २००९ नंतर मान्सूनमध्ये झालेला हा सर्वात कमी पाऊस आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्रात तर पावसाची तब्बल ३३ टक्के एवढी तूट नोंदली गेली आहे. परतीच्या पावसानेही यंदा दगा दिला आहे. गेल्या दशकात २००२ व २००९ मध्ये देशात अपुरा पाऊस पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यात अनुक्रमे १९.२% व २१.८% तूट होती.विशेष म्हणजे २००९ मध्ये एकीकडे जागतिक मंदीचे संकट असताना दुसरीकडे मान्सूनने सुद्धा भारताला दगा दिला होता. तर १९७९ मध्ये १९% कमी पाऊस झाला होता. १९७९ नंतरचे हे सर्वात कमी चौथ्या क्रमांकाचे पर्जन्यमान आहे. २००२ मध्येही देशात पावसाने मोठी ओढ दिली होती. यंदा देशात ८८७.५ मिमी सर्वसाधारण पर्जनाच्या तुलनेत जून ते सप्टेंबरमध्ये ७६० मिमी पाऊस झाला. २०१४ मध्ये देशात ७८१.७ मिमी पाऊस झाला होता.आभाळाकडे डोळे लागलेल्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच देशाच्या उत्तर पश्चिम (वायव्य) भागात सप्टेंबरमध्ये पाऊस होऊनही देशातील या महिन्यामधील एकूण पर्जन्यमान २००५ नंतर सर्वात कमी होते. सप्टेंबरमध्ये भारतात सर्वसाधारणपेक्षा २४% कमी म्हणजे १३१.४ मिमी पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क) दुष्काळ नाही !भारतीय हवामान शास्त्र विभाग मात्र देशातील पावसाच्या या स्थितीस दुष्काळ मानण्यास तयार नाही. कारण संपूर्ण देशात पाण्याची एकसारखी स्थिती नसते. एल निनोचा प्रभाव यंदाच्या कमी पावसास कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कमी पावसाचे प्रदेशउत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी ओढ दिली.