शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

ट्रक कालव्यात कोसळून उत्तर प्रदेशात १४ ठार

By admin | Updated: May 6, 2017 01:08 IST

टिळ्याच्या कार्यक्रमानंतर घरी परतणाऱ्या लोकांचा छोटा ट्रक कालव्यात कोसळून १४ ठार, तर २८ जण जखमी झाले. उत्तर प्रदेशात

एटा (उत्तर प्रदेश) : टिळ्याच्या कार्यक्रमानंतर घरी परतणाऱ्या लोकांचा छोटा ट्रक कालव्यात कोसळून १४ ठार, तर २८ जण जखमी झाले. उत्तर प्रदेशात शुक्रवारी ही भयंकर दुर्घटना घडली. हा ट्रक आग्रा येथून परतत असताना जलेसर भागातील सराई नीम येथे पहाटे ३ वाजता ही दुर्घटना घडली. दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, गंभीर जखमींना ५० हजार रुपये, तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची भरपाई घोषित केली. गिरंद सिंह (६५), प्रशांत (१२), लवकुश (२१), मुकेश (२३), नेरापाल (२५), पद्मसिंह (५०), ओमवीर (१९), शैतानसिंह (५०), पद्मसिंह (४०), बनीसिंह (४५), राजेंद्र (६०), विजय (२२), परवेंद्र फौजी (३५) आणि संजू (२५), अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण जागीच ठार झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.२८ जखमींपैकी १६ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी आग्रा येथे पाठविण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली.  (वृत्तसंस्था)