शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

ट्रक कालव्यात कोसळून उत्तर प्रदेशात १४ ठार

By admin | Updated: May 6, 2017 01:08 IST

टिळ्याच्या कार्यक्रमानंतर घरी परतणाऱ्या लोकांचा छोटा ट्रक कालव्यात कोसळून १४ ठार, तर २८ जण जखमी झाले. उत्तर प्रदेशात

एटा (उत्तर प्रदेश) : टिळ्याच्या कार्यक्रमानंतर घरी परतणाऱ्या लोकांचा छोटा ट्रक कालव्यात कोसळून १४ ठार, तर २८ जण जखमी झाले. उत्तर प्रदेशात शुक्रवारी ही भयंकर दुर्घटना घडली. हा ट्रक आग्रा येथून परतत असताना जलेसर भागातील सराई नीम येथे पहाटे ३ वाजता ही दुर्घटना घडली. दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, गंभीर जखमींना ५० हजार रुपये, तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची भरपाई घोषित केली. गिरंद सिंह (६५), प्रशांत (१२), लवकुश (२१), मुकेश (२३), नेरापाल (२५), पद्मसिंह (५०), ओमवीर (१९), शैतानसिंह (५०), पद्मसिंह (४०), बनीसिंह (४५), राजेंद्र (६०), विजय (२२), परवेंद्र फौजी (३५) आणि संजू (२५), अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण जागीच ठार झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.२८ जखमींपैकी १६ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी आग्रा येथे पाठविण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली.  (वृत्तसंस्था)