शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

१३४ कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन १७ हजार शेतकर्‍यांना लाभ : १९३७ कोटींचे पीक कर्ज वाटप

By admin | Updated: August 1, 2016 23:57 IST

जळगाव : जिल्‘ातील १७ हजार ६३ थकबाकीदार शेतकर्‍यांच्या १३४ कोटी ८४ लाख रुपयांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तर एक लाख ८५ हजार १८८ शेतकर्‍यांना १९३७ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

जळगाव : जिल्‘ातील १७ हजार ६३ थकबाकीदार शेतकर्‍यांच्या १३४ कोटी ८४ लाख रुपयांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तर एक लाख ८५ हजार १८८ शेतकर्‍यांना १९३७ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थिती आणि ५० टक्के आणेवारी असलेल्या गावातील थकबाकीदार शेतकर्‍यांकडून कर्जाची सक्तीने वसुली न करता पीक कर्जाचे पुनर्गठन करावे अशी सूचना शासनातर्फे करण्यात आली होती. त्यानुसार पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ३१ जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती.

१३४ कोटींच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन
या वर्षी जिल्हा बँकेकडून तीन हजार ४६९ शेतकर्‍यांच्या १५ कोटी २२ लाखांच्या कर्जाचे पुनर्गठन केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकामार्फत १२ हजार ६३० शेतकर्‍यांच्या १११ कोटी ५१ लाखांच्या थकित कर्जाचे तर खाजगी बँकांकडून ९५७ शेतकर्‍यांच्या ८ कोटी १ लाखांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. ग्रामीण बँकेने ६ शेतकर्‍यांच्या ९ लाखांच्या कर्जाचे पुनर्गठन केले आहे.
१९३७ कोटींचे पीककर्ज वाटप
जिल्हा बँक व खाजगी बँकांकडून पीक कर्ज वाटपाला गती देण्यात आली आहे. जिल्हा बँकेतर्फे एक लाख २२ हजार ६२९ शेतकर्‍यांना ८९७ कोटी ९२ लाखांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकेतर्फे ५८ हजार ५३३ शेतकर्‍यांना ९७० कोटी ४५ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. ग्रामीण बँकेतर्फे ५८३ शेतकर्‍यांना ८ कोटी ४३ लाख तर खाजगी बँकेकडून ३ हजार ४४३ शेतकर्‍यांना ६० कोटी २५ लाखांच्या रकमेच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. पीक कर्जवाटपाची अंतिम मुदत ही ३० सप्टेंबरपर्यंत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी २६०६ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.