शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

१३ तासांचा विलंब, प्रवाशांची रात्र विमानातच

By admin | Updated: March 23, 2016 03:33 IST

तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाच्या बोर्इंग ७८७ या विमानाच्या उड्डाणास तब्बल १३ तासांचा विलंब लागला. परिणामी दिल्लीला जाणाऱ्या १५० प्रवाशांना अख्खी रात्र विमानातच घालवावी लागली.

कोलकाता : तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाच्या बोर्इंग ७८७ या विमानाच्या उड्डाणास तब्बल १३ तासांचा विलंब लागला. परिणामी दिल्लीला जाणाऱ्या १५० प्रवाशांना अख्खी रात्र विमानातच घालवावी लागली. कोलकाता विमानतळावर रविवारी रात्री ही घटना घडली.एअर इंडियाचे फ्लाईट एआय ७०१ हे विमान २३६ प्रवाशांना घेऊन कोलकाता विमानतळावरून रविवारी सायंकाळी ५.३० वाजता दिल्लीला उड्डाण करणार होते. विमान प्रवाशांमध्ये माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, गायक शफाकत अमानत अली आणि भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा समावेश होता. विमान दिल्लीला उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. बिघाड दूर करण्यास वेळ लागेल, हे समजल्यानंतर बासित, येचुरी आणि अन्य २१ प्रवाशांना विमानातून खाली उतरविण्यात येऊन त्यांची दुसऱ्या विमानात दिल्लीला जाण्याची सोय करण्यात आली. अन्य प्रवाशांना मात्र विमानातच बसून राहण्यास सांगण्यात आले होते. विमानातील बिघाड दुरुस्त होणार नाही हे रात्री १० वाजता लक्षात आल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठविण्याचे ठरले. त्यानंतर एअर इंडियाचे दुसरे विमान कोलकाता विमानतळावर उतरले आणि प्रवाशांना एआय ७०१ या विमानाने दिल्लीला रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व प्रवासी बंद पडलेल्या विमानातून उतरून दुसऱ्या विमानात चढले. परंतु वैमानिकाची फ्लार्इंग ड्युटी संपल्याने हे विमानही सोमवारी सकाळी ६.३० वाजेपर्यंत उड्डाण करू शकले नाही, त्यामुळे प्रवाशांना विमानातच रात्र घालवावी लागली. (वृत्तसंस्था)