शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

बस अपघातात १२ विद्यार्थी ठार

By admin | Updated: January 20, 2017 05:51 IST

शालेय बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन १२ विद्यार्थी आणि त्यांचा बसचालक असे १३ ठार

एटा (उत्तर प्रदेश) : शालेय बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन १२ विद्यार्थी आणि त्यांचा बसचालक असे १३ ठार तर ३५ मुले जखमी झाली. उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात गुरुवारी हा भयंकर अपघात घडला. दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी शंभू नाथ यांनी यापूर्वी १५ मुले ठार झाल्याचे म्हटले होते. तथापि, नंतर अधिकाऱ्यांनी मृतांची संख्या १३ असल्याचे स्पष्ट केले. अलिगंज-पलियाली रस्त्यावरील असदनगर गावाजवळ ही दुर्घटना घडली. या बसमध्ये जे.एस. विद्यानिकेतनचे विद्यार्थी होते. २० जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी एटा, सैफेई आणि अलीगड येथे तर काहींना स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मृतांत ५ ते १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वाहनाला मोठा अपघात होण्याची राज्यातील ही अलीकडची दुसरी घटना आहे. यापूर्वी भदोही जिल्ह्यात रेल्वेने स्कूल व्हॅनला उडविल्यामुळे ८ विद्यार्थी ठार तर १४ जण जखमी झाले होते. अपघाताचे वृत्त समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याची देखरेख केली, असे नाथ यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळकरी मुलांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही मुलांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. जखमींना योग्य उपचार मिळतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना यादव यांनी दिल्या. ।बस उलटून २५ जखमीजयपूर : राजस्थानात शालेय बस उलटून २५ विद्यार्थी जखमी झाले. चुरू जिल्ह्यात गुरुवारी ही दुर्घटना घडली. ही बस छोटेगाव येथून राडेलसर येथे जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती उलटली, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात, तर गंभीर जखमींना चुरू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमींना प्रथमोपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. जखमींत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बसचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.।शाळेची मान्यता रद्दतीव्र थंडीमुळे आठवीपर्यंतच्या शाळा शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. तथापि, जे.एस. विद्यानिकेतनचा व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकाने या आदेशाची पायमल्ली करून शाळा सुरू ठेवली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले असून शाळा व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.