शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

बस अपघातात १२ विद्यार्थी ठार

By admin | Updated: January 20, 2017 05:51 IST

शालेय बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन १२ विद्यार्थी आणि त्यांचा बसचालक असे १३ ठार

एटा (उत्तर प्रदेश) : शालेय बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन १२ विद्यार्थी आणि त्यांचा बसचालक असे १३ ठार तर ३५ मुले जखमी झाली. उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात गुरुवारी हा भयंकर अपघात घडला. दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी शंभू नाथ यांनी यापूर्वी १५ मुले ठार झाल्याचे म्हटले होते. तथापि, नंतर अधिकाऱ्यांनी मृतांची संख्या १३ असल्याचे स्पष्ट केले. अलिगंज-पलियाली रस्त्यावरील असदनगर गावाजवळ ही दुर्घटना घडली. या बसमध्ये जे.एस. विद्यानिकेतनचे विद्यार्थी होते. २० जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी एटा, सैफेई आणि अलीगड येथे तर काहींना स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मृतांत ५ ते १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वाहनाला मोठा अपघात होण्याची राज्यातील ही अलीकडची दुसरी घटना आहे. यापूर्वी भदोही जिल्ह्यात रेल्वेने स्कूल व्हॅनला उडविल्यामुळे ८ विद्यार्थी ठार तर १४ जण जखमी झाले होते. अपघाताचे वृत्त समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याची देखरेख केली, असे नाथ यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळकरी मुलांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही मुलांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. जखमींना योग्य उपचार मिळतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना यादव यांनी दिल्या. ।बस उलटून २५ जखमीजयपूर : राजस्थानात शालेय बस उलटून २५ विद्यार्थी जखमी झाले. चुरू जिल्ह्यात गुरुवारी ही दुर्घटना घडली. ही बस छोटेगाव येथून राडेलसर येथे जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती उलटली, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात, तर गंभीर जखमींना चुरू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमींना प्रथमोपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. जखमींत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बसचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.।शाळेची मान्यता रद्दतीव्र थंडीमुळे आठवीपर्यंतच्या शाळा शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. तथापि, जे.एस. विद्यानिकेतनचा व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकाने या आदेशाची पायमल्ली करून शाळा सुरू ठेवली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले असून शाळा व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.