शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

बस अपघातात १२ विद्यार्थी ठार

By admin | Updated: January 20, 2017 05:51 IST

शालेय बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन १२ विद्यार्थी आणि त्यांचा बसचालक असे १३ ठार

एटा (उत्तर प्रदेश) : शालेय बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन १२ विद्यार्थी आणि त्यांचा बसचालक असे १३ ठार तर ३५ मुले जखमी झाली. उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात गुरुवारी हा भयंकर अपघात घडला. दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी शंभू नाथ यांनी यापूर्वी १५ मुले ठार झाल्याचे म्हटले होते. तथापि, नंतर अधिकाऱ्यांनी मृतांची संख्या १३ असल्याचे स्पष्ट केले. अलिगंज-पलियाली रस्त्यावरील असदनगर गावाजवळ ही दुर्घटना घडली. या बसमध्ये जे.एस. विद्यानिकेतनचे विद्यार्थी होते. २० जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी एटा, सैफेई आणि अलीगड येथे तर काहींना स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मृतांत ५ ते १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वाहनाला मोठा अपघात होण्याची राज्यातील ही अलीकडची दुसरी घटना आहे. यापूर्वी भदोही जिल्ह्यात रेल्वेने स्कूल व्हॅनला उडविल्यामुळे ८ विद्यार्थी ठार तर १४ जण जखमी झाले होते. अपघाताचे वृत्त समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याची देखरेख केली, असे नाथ यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळकरी मुलांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही मुलांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. जखमींना योग्य उपचार मिळतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना यादव यांनी दिल्या. ।बस उलटून २५ जखमीजयपूर : राजस्थानात शालेय बस उलटून २५ विद्यार्थी जखमी झाले. चुरू जिल्ह्यात गुरुवारी ही दुर्घटना घडली. ही बस छोटेगाव येथून राडेलसर येथे जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती उलटली, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात, तर गंभीर जखमींना चुरू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमींना प्रथमोपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. जखमींत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बसचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.।शाळेची मान्यता रद्दतीव्र थंडीमुळे आठवीपर्यंतच्या शाळा शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. तथापि, जे.एस. विद्यानिकेतनचा व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकाने या आदेशाची पायमल्ली करून शाळा सुरू ठेवली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले असून शाळा व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.