शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश सरकारमध्ये १२ नवे चेहरे

By admin | Updated: November 1, 2015 02:48 IST

उत्तर प्रदेश विधानसभेच्या २०१७ साली होणाऱ्या निवडणुकांपूर्वी सरकारची जनमानसातील प्रतिमा उंचावण्याच्या प्रयत्नांतर्गत अखिलेश यादव सरकारच्या मंत्रिमंडळात शनिवारी

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या २०१७ साली होणाऱ्या निवडणुकांपूर्वी सरकारची जनमानसातील प्रतिमा उंचावण्याच्या प्रयत्नांतर्गत अखिलेश यादव सरकारच्या मंत्रिमंडळात शनिवारी व्यापक फेरबदलासह २० मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. या विस्तारात आठ मंत्र्यांना पदोन्नती मिळाली असून १२ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.राज्यपाल राम नाईक यांनी राजभवनात आयोजित समारंभात पाच कॅबिनेट, आठ स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि सात राज्यमंत्र्यांना शपथ दिली. नव्या मंत्रिमंडळात बलवंतसिंग रामूवालिया यांची वर्णी लागणे आश्चर्यकारक मानले जात आहे. पंजाबमधील सत्ताधारी अकाली दलातून बाहेर पडून त्यांनी उत्तर प्रदेशचे मंत्रिपद स्वीकारले आहे. ते राज्य विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. समाजवादी पार्टी सत्तारूढ झाल्यापासूनचा मंत्रिमंडळातील हा सहावा फेरबदल आहे. (वृत्तसंस्था)---------------राज्यपालांनी राष्ट्रगीत मध्येच थांबविल्याने वादउत्तर प्रदेशात नव्या मंत्र्यांच्या शपथविधी समारंभादरम्यान राज्यपाल राम नाईक यांनी बॅण्डवर सुरू झालेले राष्ट्रगीत मध्येच थांबविल्याने वाद निर्माण झाला आहे. शपथविधी समारंभानंतर राष्ट्रगीताची परंपरा आहे. आजही तेच झाले; परंतु नियोजित कार्यक्रमानुसार शपथविधीनंतर राज्यपालांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ द्यायची होती. त्यानंतर राष्ट्रगीत होणार होते. शपथविधी होताच राष्ट्रगीत सुरू झाले. तेव्हा राज्यपालांनी इशाऱ्याने समोर उभ्या असलेल्या लोकांना बसण्यास सांगितले. बहुधा त्यांना तत्पूर्वी शपथ द्यायची होती. त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाईक यांचा हात पकडला. राष्ट्रगीत सुरू झाले आहे ते मध्ये थांबवू नका असे त्यांना सुचवायचे होते. या संभ्रमातच राज्यपाल राष्ट्रगीत थांबवू इच्छितात असा संदेश बॅण्ड पथकापर्यंत पोहोचला आणि राष्ट्रगीत बंद झाले. राज्यपालांनी उपस्थितांना शपथ दिली आणि त्यानंतर पुन्हा राष्ट्रगीत सुरू झाले. राज्यपालांच्या या वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे गैरसमजातून हा प्रकार घडला असून राष्ट्रगीताचा अपमान करण्याचा हेतू यामागे नव्हता, असा खुलासा राजभवनातील एका अधिकाऱ्याने केला.