शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

१२ नक्षलवाद्यांचा झारखंडमधील चकमकीत खात्मा

By admin | Updated: June 10, 2015 00:14 IST

झारखंडच्या पलामू जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) एका भीषण चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

मेदिनीनगर (झारखंड) : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) एका भीषण चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या एका वरिष्ठ कमांडरचाही समावेश आहे.ही चकमक रात्री १२ वाजताच्या दरम्यान रांचीपासून १४० किमी अंतरावरील बकोरिया गावात झाली आणि सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मयूर पटेल यांनी दिली. क्षेत्रीय कमांडर आर.के. ऊर्फ अनुराग ऊर्फ डॉक्टर याच्यासह सशस्त्र नक्षल गटाच्या उपक्षेत्रीय समितीचे आणखी दोन सदस्य चकमकीत ठार झाले असल्याचे सीआरपीएफचे महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी सांगितले. हे फार मोठे यश असल्याचे सांगून ते म्हणाले की,चकमकीनंतर ८ ते १० अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.नक्षलवादी जिल्ह्यात गेले असल्याची गुप्त सूचना मिळाली होती. त्यानंतर कोब्रा बटालियन आणि जिल्हा पोलीस घटनास्थळी रवाना झाले. सुरक्षा जवानांना बघून नक्षलवादी गाड्यांमधून खाली उतरले आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. नक्षली दोन वाहनांमधून आले होते. एका वाहनातून नक्षल्यांनी पळ काढला.(वृत्तसंस्था)