शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर

By admin | Updated: July 5, 2015 22:55 IST

जलवाहतुकीला चालना देण्यास उत्सुक असलेले रालोआ सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात देशभरातील १०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्याबाबतचे विधेयक सादर करणार आहे.

नवी दिल्ली : जलवाहतुकीला चालना देण्यास उत्सुक असलेले रालोआ सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात देशभरातील १०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्याबाबतचे विधेयक सादर करणार आहे. भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.नद्यांचे जलमार्गात रूपांतर केल्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल. कारण हे मालवाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन आहे. त्यामुळे सरकारने १०१ नद्यांना जलमार्गात रूपांतरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे नमूद करून गडकरी म्हणाले, संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक आणण्यात येईल. जलमार्गांना चालना देण्याला आपल्या मंत्रालयाने प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे रस्ता व रेल्वे नेटवर्कवरील बोजा कमी होईल; सोबतच एक स्वस्त आणि पर्यावरण अनुकूल असे वाहतुकीचे माध्यमही मिळेल. वाहतुकीचे स्वस्त साधन असलेल्या जलमार्गाचा भारतात अद्याप वापर करण्यात आलेला नाही. तथापि, चीनच्या मालवाहतुकीत जलमार्गाचा ४७ टक्के आणि युरोपच्या मालवाहतुुकीत जलमार्गाचा ४० टक्के वाटा आहे. जपान आणि कोरिया तर जलमार्गावरच निर्भर आहेत. (वृत्तसंस्था) प्रकल्प पीपीपी आधारावर पूर्ण करणारसरकारने आतापर्यंत केवळ पाच नद्यांना जलमार्गाच्या रूपात घोषित केले आहे, तर ५५ नद्यांसाठी सल्लागारांची निवड करण्यात आली आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. हे प्रकल्प पीपीपी आधारावर पूर्ण केले जातील. भारतात मात्र केवळ ३.३ टक्के जलवाहतूक केली जाते, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.