शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

१०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर

By admin | Updated: July 5, 2015 22:55 IST

जलवाहतुकीला चालना देण्यास उत्सुक असलेले रालोआ सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात देशभरातील १०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्याबाबतचे विधेयक सादर करणार आहे.

नवी दिल्ली : जलवाहतुकीला चालना देण्यास उत्सुक असलेले रालोआ सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात देशभरातील १०१ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्याबाबतचे विधेयक सादर करणार आहे. भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.नद्यांचे जलमार्गात रूपांतर केल्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल. कारण हे मालवाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन आहे. त्यामुळे सरकारने १०१ नद्यांना जलमार्गात रूपांतरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे नमूद करून गडकरी म्हणाले, संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक आणण्यात येईल. जलमार्गांना चालना देण्याला आपल्या मंत्रालयाने प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे रस्ता व रेल्वे नेटवर्कवरील बोजा कमी होईल; सोबतच एक स्वस्त आणि पर्यावरण अनुकूल असे वाहतुकीचे माध्यमही मिळेल. वाहतुकीचे स्वस्त साधन असलेल्या जलमार्गाचा भारतात अद्याप वापर करण्यात आलेला नाही. तथापि, चीनच्या मालवाहतुकीत जलमार्गाचा ४७ टक्के आणि युरोपच्या मालवाहतुुकीत जलमार्गाचा ४० टक्के वाटा आहे. जपान आणि कोरिया तर जलमार्गावरच निर्भर आहेत. (वृत्तसंस्था) प्रकल्प पीपीपी आधारावर पूर्ण करणारसरकारने आतापर्यंत केवळ पाच नद्यांना जलमार्गाच्या रूपात घोषित केले आहे, तर ५५ नद्यांसाठी सल्लागारांची निवड करण्यात आली आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. हे प्रकल्प पीपीपी आधारावर पूर्ण केले जातील. भारतात मात्र केवळ ३.३ टक्के जलवाहतूक केली जाते, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.