शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सौदी अरेबियामध्ये अडकलेले 10 हजार भारतीय परतणार मायदेशी

By admin | Updated: August 1, 2016 16:06 IST

सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या 10 हजार भारतीयांची लवकरच सुटका करण्यात येणार असल्याची माहिती माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 01 - सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या 10 हजार भारतीयांची लवकरच सुटका करण्यात येणार आहे. तसंच सर्व भारतीयांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे, जेणेकरुन कोणाची उपासमार होऊ नये अशी माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली आहे. दोन्ही सभागृहात सुषमा स्वराज यांनी निवेदन दिले. व्ही के सिंग स्वत: याची पाहणी करणार असून तेदेखील सौदी अरेबियाला जाणार आहेत असं सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे. 
 
सौदी अरेबियात अडकलेल्या भारतीयांसंबधी दोन्ही सभागृहात सदस्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. भारतीय दूतावासाने पाच कॅम्प उभारले असून, आपल्याला प्रत्येक तासाची माहिती मिळत असल्याचं सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितलं. एकही भारतीय उपाशी राहणार नाही, याची खात्री मी देते. आम्ही सर्वांना परत भारतात घेऊन येऊ असा विश्वास सुषमा स्वराज यांनी यावेळी व्यक्त केला. 
 
 
सौदी अरेबियामधील परराष्ट्र आणि कामगार कार्यालयांच्या भारतीय सरकार संपर्कात आहे.  अचानक नोक-या गेल्यामुळे सौदी अरेबियामध्ये १० हजारहून अधिक भारतीय कामगारांचे हाल होत आहेत. आर्थिक चणचणीमुळे हजारो कामगारांना उपाशीपोटी रहावे लागत आहे. केंद्र सरकारने आखाती देशांमधील आपल्या दूतावासांना या बेरोजगार कामगारांना अन्य मदतीबरोबर अन्न-पाणी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत. 
 
 सुषमा स्वराज यांनी सौदीमध्ये राहणा-या 30 लाख भारतीयांना या कठीण काळात आपल्या बंधु-भगिनीना मदत करण्याचे आवाहन केले आहे. सौदी अरेबियामधील बेरोजगार भारतीय कामगारांना मोफत रेशन देण्याच्या रियाधमधील भारतीय दूतावासाला सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी टि्वटरवरुन दिली होती