शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

२५० कोटींच्या ठेवीसाठी १० हजार अर्ज बीएचआर पतसंस्था : ७०९ मालमत्तांचे १०७ कोटींचे अवार्ड

By admin | Updated: July 14, 2016 21:35 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायकांच्या नियुक्तीनंतर ठेवीदारांचा ठेवीसाठी तगादा सुरु झाला आहे. पतसंस्थेकडे १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या ठेवीदारांची सुमारे २५० कोटींची रक्कम देणे आहे. दरम्यान,लवादकाच्या नियुक्तीनंतर ७०६ मालमत्तांचे १०७ कोटी रुपयांच्या रकमेचे अवार्ड करण्यात आले आहे.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायकांच्या नियुक्तीनंतर ठेवीदारांचा ठेवीसाठी तगादा सुरु झाला आहे. पतसंस्थेकडे १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या ठेवीदारांची सुमारे २५० कोटींची रक्कम देणे आहे. दरम्यान,लवादकाच्या नियुक्तीनंतर ७०६ मालमत्तांचे १०७ कोटी रुपयांच्या रकमेचे अवार्ड करण्यात आले आहे.
बीएचआर पतसंस्थेवर अवसायक जितेंद्र कंडारे यांची ऑक्टोबर २०१५ मध्ये नियुक्ती झाली आहे. नियुक्तीला ९ महिन्यांचा कालावधी उलटला असताना ठेवीदारांना अद्याप एक रुपयादेखील मिळालेला नाही. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत.
१० हजार ठेवीदारांचे अर्ज
बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात ठेवीदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तसेच तक्रार अर्ज घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी अवसायकांनी नियुक्त केले आहे. त्यानुसार जुलै महिन्यापर्यंत राज्यभरातील १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. या १० हजार ठेवीदारांचे सुमारे २५० कोटी रुपयांची रक्कम पतसंस्थेकडे घेणे आहे.
ऑडिट झालेल्या शाखांमध्ये ६५० कोटींच्या ठेवी
बीएचआर पतसंस्थेच्या १५० शाखांचे ऑडिट पूर्ण झाले आहे. तर १० शाखांचे ऑडिट हे अंतिम टप्प्यात आहे. १५० शाखांमध्ये तब्बल ६५० कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. तर सुमारे ५५० कोटी रुपयांची कर्जवाटप झालेली आहे. उर्वरित शाखांमधील ऑडिट पूर्ण झाल्यानंतर सर्व शाखांमधील एकूण ठेवी आणि कर्जाची रक्कम याचा ताळमेळ बसणार आहे.

७०९ मालमत्तांचे १०७ कोटींचे अवार्ड
बीएचआर पतसंस्थेतून कर्ज घेऊन परतफेड न करणार्‍या कर्जदारांना लवादकांनी नोटीस काढल्या आहेत. त्यात ५५४ कर्जदारांकडील वसुलीसाठी अवार्डची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार वसुलीसाठी दरखास्त देण्यात आली आहे. १५२ कर्जदारांची अवार्डची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एकुण ७०६ कर्जदारांच्या १०७ कोटी ३३ लाखांच्या मालमत्तांचे अवार्ड करण्यात आले आहे.

आठ कोटींची वसुली तरी ठेवीदार उपाशी
अवसायकांनी आतापर्यंत कर्जदारांकडून ८ कोटी रुपयांची कर्जवसुली केली आहे. तसेच वस्तू व मालमत्तांच्या विक्रीची निविदा काढली आहे. कर्जदारांकडून रकमेची वसुली होत असताना ठेवीदारांना मात्र ठेवी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या रकमेतून वैद्यकीय उपचार, लग्न या कारणांना महत्त्व देत ठेवींचे वितरण केल्यास अनेकांना दिलासा मिळणार आहे. अवसायकांनी याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.