शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

२५० कोटींच्या ठेवीसाठी १० हजार अर्ज बीएचआर पतसंस्था : ७०९ मालमत्तांचे १०७ कोटींचे अवार्ड

By admin | Updated: July 14, 2016 21:35 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायकांच्या नियुक्तीनंतर ठेवीदारांचा ठेवीसाठी तगादा सुरु झाला आहे. पतसंस्थेकडे १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या ठेवीदारांची सुमारे २५० कोटींची रक्कम देणे आहे. दरम्यान,लवादकाच्या नियुक्तीनंतर ७०६ मालमत्तांचे १०७ कोटी रुपयांच्या रकमेचे अवार्ड करण्यात आले आहे.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायकांच्या नियुक्तीनंतर ठेवीदारांचा ठेवीसाठी तगादा सुरु झाला आहे. पतसंस्थेकडे १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या ठेवीदारांची सुमारे २५० कोटींची रक्कम देणे आहे. दरम्यान,लवादकाच्या नियुक्तीनंतर ७०६ मालमत्तांचे १०७ कोटी रुपयांच्या रकमेचे अवार्ड करण्यात आले आहे.
बीएचआर पतसंस्थेवर अवसायक जितेंद्र कंडारे यांची ऑक्टोबर २०१५ मध्ये नियुक्ती झाली आहे. नियुक्तीला ९ महिन्यांचा कालावधी उलटला असताना ठेवीदारांना अद्याप एक रुपयादेखील मिळालेला नाही. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत.
१० हजार ठेवीदारांचे अर्ज
बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात ठेवीदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तसेच तक्रार अर्ज घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी अवसायकांनी नियुक्त केले आहे. त्यानुसार जुलै महिन्यापर्यंत राज्यभरातील १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. या १० हजार ठेवीदारांचे सुमारे २५० कोटी रुपयांची रक्कम पतसंस्थेकडे घेणे आहे.
ऑडिट झालेल्या शाखांमध्ये ६५० कोटींच्या ठेवी
बीएचआर पतसंस्थेच्या १५० शाखांचे ऑडिट पूर्ण झाले आहे. तर १० शाखांचे ऑडिट हे अंतिम टप्प्यात आहे. १५० शाखांमध्ये तब्बल ६५० कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. तर सुमारे ५५० कोटी रुपयांची कर्जवाटप झालेली आहे. उर्वरित शाखांमधील ऑडिट पूर्ण झाल्यानंतर सर्व शाखांमधील एकूण ठेवी आणि कर्जाची रक्कम याचा ताळमेळ बसणार आहे.

७०९ मालमत्तांचे १०७ कोटींचे अवार्ड
बीएचआर पतसंस्थेतून कर्ज घेऊन परतफेड न करणार्‍या कर्जदारांना लवादकांनी नोटीस काढल्या आहेत. त्यात ५५४ कर्जदारांकडील वसुलीसाठी अवार्डची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार वसुलीसाठी दरखास्त देण्यात आली आहे. १५२ कर्जदारांची अवार्डची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एकुण ७०६ कर्जदारांच्या १०७ कोटी ३३ लाखांच्या मालमत्तांचे अवार्ड करण्यात आले आहे.

आठ कोटींची वसुली तरी ठेवीदार उपाशी
अवसायकांनी आतापर्यंत कर्जदारांकडून ८ कोटी रुपयांची कर्जवसुली केली आहे. तसेच वस्तू व मालमत्तांच्या विक्रीची निविदा काढली आहे. कर्जदारांकडून रकमेची वसुली होत असताना ठेवीदारांना मात्र ठेवी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या रकमेतून वैद्यकीय उपचार, लग्न या कारणांना महत्त्व देत ठेवींचे वितरण केल्यास अनेकांना दिलासा मिळणार आहे. अवसायकांनी याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.