शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

जलवाहतुकीत महाराष्ट्रातील १० नद्या

By admin | Updated: March 27, 2015 01:37 IST

मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलवाहतूक योजनेमध्ये महाराष्ट्रातील दहा नद्यांची निवड झाली असून, पुढील दीड वर्षांत यामधून मधून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलवाहतूक योजनेमध्ये महाराष्ट्रातील दहा नद्यांची निवड झाली असून, पुढील दीड वर्षांत यामधून मधून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. यासाठी स्वयंचलित नौका वापरण्याचा विचार आहे. नदीच्या दोन्ही बाजूंचा विकास यातून साध्य होईल असा विश्वास सरकारला आहे.मुंबईच्या रहदारीचा अंदाज घेऊन कल्याण- ठाणे- मुंबई हा मार्ग जलवाहतुकीने जोडण्यात येणार आहे. रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून स्वस्त जलवाहतुकीला वेग देण्यासाठी मंत्रालयाने पढाकार घेतला असून, देशातील १०१ नद्यांची निवड केल्यावर त्यात महाराष्ट्रातील १० व गोव्यातील सहा नद्यांचा समावेश करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिल्याचे परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले. गडकरींनी या प्रकल्पाविषयी माहिती देताना सांगितले, नागपूरची नाग, रत्नागिरीतील अंबा, यवतमाळातील अरूणावती, बुलडाण्यातील पैनगंगा, बीडमधील मांजरा, महाडची सावित्री, संगमनेरची शास्त्री, ठाणे जिल्ह्यात रेल्वेला समांतर जाणारी उल्हास, महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा, चंद्रपूरची वैनगंगा या नद्यांमधून जलवाहतूक होणार आहे. तर गोव्यातील जुआरी, सल, म्हापसा, मांडवी, कुमबरजुआ, चापोरा या नद्यांमधून जलवाहतूक करून तेथील पर्यटनाला गती देण्याचाही विचार सरकारचा आहे. बीडच्या मांजरा व महाबळेश्वरच्या कृष्णेच्या मदतीने महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण या राज्यांनाही जलवाहतुकीने जोडण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी मिळाल्याने एकत्रित विधेयक आणून जलवाहतूक सुरू केली जाईल. देशात १२०८ बेटे व १८९ दीपस्तंभ असून त्यांचा विकास करून ती पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)च्छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या यशाची गाथा प्रेरणादायी असल्याने त्यांच्या नावाने रत्नागिरीजवळ एक बंदराचा विकास करण्यात येणार आहे. च्रस्ते व रेल्वेने जोडून देशातील १२ मोठ्या बंदरांचा विकास ‘रेल्वे विकास कार्पोरेशन’च्या माध्यमातून केला जाणार आहे. मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचाही यामध्ये समावेश आहे.