शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

जलवाहतुकीत महाराष्ट्रातील १० नद्या

By admin | Updated: March 27, 2015 01:37 IST

मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलवाहतूक योजनेमध्ये महाराष्ट्रातील दहा नद्यांची निवड झाली असून, पुढील दीड वर्षांत यामधून मधून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलवाहतूक योजनेमध्ये महाराष्ट्रातील दहा नद्यांची निवड झाली असून, पुढील दीड वर्षांत यामधून मधून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. यासाठी स्वयंचलित नौका वापरण्याचा विचार आहे. नदीच्या दोन्ही बाजूंचा विकास यातून साध्य होईल असा विश्वास सरकारला आहे.मुंबईच्या रहदारीचा अंदाज घेऊन कल्याण- ठाणे- मुंबई हा मार्ग जलवाहतुकीने जोडण्यात येणार आहे. रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून स्वस्त जलवाहतुकीला वेग देण्यासाठी मंत्रालयाने पढाकार घेतला असून, देशातील १०१ नद्यांची निवड केल्यावर त्यात महाराष्ट्रातील १० व गोव्यातील सहा नद्यांचा समावेश करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिल्याचे परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले. गडकरींनी या प्रकल्पाविषयी माहिती देताना सांगितले, नागपूरची नाग, रत्नागिरीतील अंबा, यवतमाळातील अरूणावती, बुलडाण्यातील पैनगंगा, बीडमधील मांजरा, महाडची सावित्री, संगमनेरची शास्त्री, ठाणे जिल्ह्यात रेल्वेला समांतर जाणारी उल्हास, महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा, चंद्रपूरची वैनगंगा या नद्यांमधून जलवाहतूक होणार आहे. तर गोव्यातील जुआरी, सल, म्हापसा, मांडवी, कुमबरजुआ, चापोरा या नद्यांमधून जलवाहतूक करून तेथील पर्यटनाला गती देण्याचाही विचार सरकारचा आहे. बीडच्या मांजरा व महाबळेश्वरच्या कृष्णेच्या मदतीने महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण या राज्यांनाही जलवाहतुकीने जोडण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी मिळाल्याने एकत्रित विधेयक आणून जलवाहतूक सुरू केली जाईल. देशात १२०८ बेटे व १८९ दीपस्तंभ असून त्यांचा विकास करून ती पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)च्छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या यशाची गाथा प्रेरणादायी असल्याने त्यांच्या नावाने रत्नागिरीजवळ एक बंदराचा विकास करण्यात येणार आहे. च्रस्ते व रेल्वेने जोडून देशातील १२ मोठ्या बंदरांचा विकास ‘रेल्वे विकास कार्पोरेशन’च्या माध्यमातून केला जाणार आहे. मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचाही यामध्ये समावेश आहे.