शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

जलवाहतुकीत महाराष्ट्रातील १० नद्या

By admin | Updated: March 27, 2015 01:37 IST

मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलवाहतूक योजनेमध्ये महाराष्ट्रातील दहा नद्यांची निवड झाली असून, पुढील दीड वर्षांत यामधून मधून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलवाहतूक योजनेमध्ये महाराष्ट्रातील दहा नद्यांची निवड झाली असून, पुढील दीड वर्षांत यामधून मधून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. यासाठी स्वयंचलित नौका वापरण्याचा विचार आहे. नदीच्या दोन्ही बाजूंचा विकास यातून साध्य होईल असा विश्वास सरकारला आहे.मुंबईच्या रहदारीचा अंदाज घेऊन कल्याण- ठाणे- मुंबई हा मार्ग जलवाहतुकीने जोडण्यात येणार आहे. रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून स्वस्त जलवाहतुकीला वेग देण्यासाठी मंत्रालयाने पढाकार घेतला असून, देशातील १०१ नद्यांची निवड केल्यावर त्यात महाराष्ट्रातील १० व गोव्यातील सहा नद्यांचा समावेश करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिल्याचे परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले. गडकरींनी या प्रकल्पाविषयी माहिती देताना सांगितले, नागपूरची नाग, रत्नागिरीतील अंबा, यवतमाळातील अरूणावती, बुलडाण्यातील पैनगंगा, बीडमधील मांजरा, महाडची सावित्री, संगमनेरची शास्त्री, ठाणे जिल्ह्यात रेल्वेला समांतर जाणारी उल्हास, महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा, चंद्रपूरची वैनगंगा या नद्यांमधून जलवाहतूक होणार आहे. तर गोव्यातील जुआरी, सल, म्हापसा, मांडवी, कुमबरजुआ, चापोरा या नद्यांमधून जलवाहतूक करून तेथील पर्यटनाला गती देण्याचाही विचार सरकारचा आहे. बीडच्या मांजरा व महाबळेश्वरच्या कृष्णेच्या मदतीने महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण या राज्यांनाही जलवाहतुकीने जोडण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी मिळाल्याने एकत्रित विधेयक आणून जलवाहतूक सुरू केली जाईल. देशात १२०८ बेटे व १८९ दीपस्तंभ असून त्यांचा विकास करून ती पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)च्छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या यशाची गाथा प्रेरणादायी असल्याने त्यांच्या नावाने रत्नागिरीजवळ एक बंदराचा विकास करण्यात येणार आहे. च्रस्ते व रेल्वेने जोडून देशातील १२ मोठ्या बंदरांचा विकास ‘रेल्वे विकास कार्पोरेशन’च्या माध्यमातून केला जाणार आहे. मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचाही यामध्ये समावेश आहे.