शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नव्या वर्षात मिळणार १0 लाख नोकऱ्या

By admin | Updated: January 1, 2015 23:56 IST

२0१५ हे वर्ष नोकरदारांसाठी नव्या आशा घेऊन येण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार नव्या वर्षात १0 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील

नवी दिल्ली : २0१५ हे वर्ष नोकरदारांसाठी नव्या आशा घेऊन येण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार नव्या वर्षात १0 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील तसेच उत्तम दर्जाचे काम करणाऱ्या नोकरदारांना ४0 टक्के पगारवाढ मिळेल.सरासरी पगारवाढही १५ ते २0 टक्क्यांपर्यंत राहील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी ती १0 ते १२ टक्के होती. नव्या युगातील ई-कॉमर्सच्या क्षेत्रात अधिक पगारवाढ मिळण्याचा अंदाज आहे. यंदा भारताचा आर्थिक वाढीचा दर ५.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. अलीकडच्या काळात तो ५ टक्क्यांपेक्षा कमीच होता. यंदा प्रथमच तो ५ टक्क्यांच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्याचा लाभ रोजगार क्षेत्राला होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.नव्या वर्षात विदेशातील मोठ्या कंपन्या भारतात दुकाने काढण्यासाठी येतील. त्यातून रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण होतील, असा अंदाज आहे. नव्या नोकऱ्यांच्या संधी नेतृत्वाच्या पातळीपासून कनिष्ठ पातळीपर्यंत सर्वच ठिकाणी असतील, असे जाणकारांचे मत आहे. सरासरी पगारवाढ २0 टक्के ते ४0 टक्के यादरम्यान राहील, असेही जाणकारांना वाटते. माय हायरिंग क्लब या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार, आयटी, एफएमसीजी आणि इतर प्रमुख क्षेत्रांत सुमारे ९.५ लाख नवे रोजगार निर्माण होतील. रोजगार क्षेत्राकडून मिळणारे संकेत २0१५ या वर्षाकडून अत्यंत उत्साहवर्धक आहेत.विशेषत: ई-कॉमर्स, बँकिंग, वित्तीय क्षेत्र, आयटी, आयटीईएस आणि रिटेल या क्षेत्राकडून अधिक चांगले संकेत आहेत. या सर्वच क्षेत्रांत गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक चांगल्या संधी आणि अधिक चांगले वेतन अपेक्षित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)हे ग्रुप या संस्थेचे संचालक आयोन हेवीट यांनी सांगितले की, भारतीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना १0 ते १८ टक्के वेतनवाढ देतील, असे दिसते.आशियात व्हिएतनामनंतर ही सर्वाधिक वेतनवाढ असणार आहे.अ‍ॅब्सोल्यूट डाटा अनॅलॅटिक्स या संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष सुदेष्णा दत्ता यांनी सांगितले की, नव्या वर्षात बोनस वगैरे सोयी-सवलतीच्या माध्यमातून घसघशीत लाभ मिळेल.अस्पायरिंग माइंडस या संशोधन संस्थेचे सीईओ हिमांशू अग्रवाल यांनी सांगितले की, उच्च दर्जाची कौशल्ये असणाऱ्या नोकरदारांना २0 टक्के ते ४0 टक्के पगारवाढ मिळेल, असे सध्याच्या स्थितीवरून दिसते.