शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

सराफाचे दहा लाखाचे दागिने घेऊन बंगाली कारागिरांचा पोबारा

By admin | Updated: March 23, 2017 17:18 IST

जळगाव: दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची सराफाने रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या कारागिरांच्या गावात चौकशीसाठी गेलेल्या सराफ व मध्यस्थीला त्यांच्या नातेवाईकांनी धमकी देऊन पिटाळून लावले आहे.

जळगाव: दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची सराफाने रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या कारागिरांच्या गावात चौकशीसाठी गेलेल्या सराफ व मध्यस्थीला त्यांच्या नातेवाईकांनी धमकी देऊन पिटाळून लावले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सचिन वसंतराव भामरे यांचे पिंप्राळा येथील सोमाणी व्यापारी संकुलात साई ज्वेलर्स नावाने दुकान आहे. भामरे हे सोने, चांदी घडविण्याचे तसेच खरेदी-विक्रीचे काम करतात. ऑर्डरप्रमाणे दागिने घडविण्याचेही काम करतात. सुशांता सुनील कुंडू (रा.चुनाबाटी, ता.शिवपुर, जि.हावडा, पि›म बंगला) व राकेश अनंत अधिकारी (रा.धुलेकुंडू जि.हुगळी, पि›म बंगाल) दोन्ही.ह.मु.सिताराम प्लाझा, मारोती पेठ, जगताप मंगल कार्यालयासमोर जळगाव या दागिने घडविणार्‍या कारागिरांशी त्यांची ९ वर्षापासून ओळख होती. त्यातून त्यांच्याशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित झाले होते. २२ फेब्रुवारी रोजी भामरे यांच्याकडे दागिने घडविण्याची ऑर्डर आली. त्यामुळे भामरे यांनी राकेश व सुशांता या दोघांना त्यादिवशी दुकानात बोलावून घेतले व ईअर रिंग ३ ग्रॅम ५३ जोडी, मंगळसूत्र पोत पेंडलसह ३५ ग्रॅमप्रमाणे २ नग व मंगळसूत्र वाटी २ ग्रॅम जोडी प्रमाणे ६० नग अशी ऑर्डर दिली. त्यासाठी ३५० ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट या दोघांच्या ताब्यात दिले. यावेळी बंगाली समाजाचे सोनार भिकुराम संत्रा हे देखील उपस्थित होते.
बिस्कीट मिळताच ठोकली धूम
सोन्याचे बिस्कीट मिळताच सुशांता व राकेश या दोघांनी जळगावातून धूम ठोकली. ऑर्डर घेतांना या दोघांनी भामरे यांना ४ ते ५ दिवसात सोने बनवून देतो असे सांगितले होते, त्यानुसार भामरे यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता दोघांचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे ते राहत असलेल्या ठिकाणी भामरे गेले, मात्र तेथील सहकार्‍यांनी सुशांता व राकेश हे दोन्ही जण कोणालाच काहीही न सांगता बाहेरगावी गेल्याचे समजले.हे ऐकून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने भामरे यांनी दोघांचा परिसरात शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही.