शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

गहू, तूरडाळीवर १0% आयात शुल्क

By admin | Updated: March 29, 2017 01:10 IST

गहू आणि तूरडाळीच्या आयातीवर १0 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज जाहीर केला. हे शुल्क तत्काळ

नवी दिल्ली : गहू आणि तूरडाळीच्या आयातीवर १0 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज जाहीर केला. हे शुल्क तत्काळ लागू होणार आहे. यंदा विक्रमी उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत हा निर्णय जाहीर केला. गेल्याच आठवड्यात अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी असा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेईल, असे सांगितले होते. गेल्या ८ डिसेंबर रोजी गव्हाच्या आयातीवरील शुल्क १0 टक्क्यांनी कमी करून शून्य टक्के केले होते. देशांतर्गत उपलब्धता वाढण्यासाठी तसेच किरकोळ किमतींना लगाम लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. तूरडाळीवर कोणतेही शुल्क नव्हते. अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, गहू आणि तूरडाळीवर १0 टक्के आयात शुल्क तत्काळ प्रभावाने लावता यावे, यासाठी १७ मार्च २0१२ रोजीच्या अधिसूचनेत सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सध्याच्या आयात पातळीवर ८४0 कोटींचा महसूल मिळेल. या निर्णयामुळे गहू आणि तूरडाळीच्या घसरणाऱ्या ठोक किमतीवर नियंत्रण आणण्यात मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळेल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात येथील गव्हाचे नवे पीक बाजारात येऊ लागले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)उत्पादन अधिक, दर घसरलेसरकारच्या दुसऱ्या अंदाजानुसार, २0१६-१७ या पीक वर्षात चांगल्या पावसामुळे गव्हाचे उत्पादन ९.७ कोटी टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ते ९.२३ कोटी टन होते. त्याचप्रमाणे तूरडाळीचे उत्पादन ४२.३ लाख टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ते २५.६ लाख टन होते. अधिक उत्पादनामुळे तूरडाळीचा ठोक भाव घसरला आहे. किमान आधारभूत किंमतही शेतकऱ्यांना मिळेनाशी झाली आहे.