शहरं
Join us  
Trending Stories
1
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
2
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
3
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
4
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
5
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
6
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
7
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
8
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
9
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
10
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
11
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
12
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
13
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
14
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
15
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
16
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
17
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
18
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
19
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
20
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!

१ लाख ३१ हजार कोटी रेल्वेसाठी !

By admin | Updated: February 2, 2017 04:23 IST

रेल्वे प्रवास व मालवाहतुकीत ना कोणतीही भाडेवाढ, ना नव्या गाड्यांची घोषणा, केंद्रीय अर्थसंकल्पात विलिन झालेल्या रेल्वेविषयी अतिशय त्रोटक व निवडक घोषणा अवघ्या काही मिनिटांत

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

रेल्वे प्रवास व मालवाहतुकीत ना कोणतीही भाडेवाढ, ना नव्या गाड्यांची घोषणा, केंद्रीय अर्थसंकल्पात विलिन झालेल्या रेल्वेविषयी अतिशय त्रोटक व निवडक घोषणा अवघ्या काही मिनिटांत अर्थमंत्री जेटलींनी लोकसभेत सादर केल्या. भारताच्या इतिहासात ९३ वर्षानंतर प्रथमच रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प नाही. अर्थमंत्री म्हणाले, रेल्वे, नद्या व रस्ते ही भारताची जीवनरेखा आहे. त्यात रेल्वेचे स्वतंत्र अस्तित्व संपले असून महामार्गांवरील वाहतूक, जलमार्ग, सागरी परिवहन यासह भारत सरकारच्या समग्र परिवहन धोरणाचा रेल्वे सेवा एक भाग बनली आहे. बजेट भाषणात रेल्वेशी संबंधित ज्या घोषणा केल्या, त्यात वर्ष २0१७/१८ मधे रेल्वेसाठी १ लाख ३१ हजार कोटींची तरतूद आहे. त्यापैकी ५५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केंद्र सरकार करणार आहे. (गेल्या वर्षी तरतूद १ लाख २१ हजार कोटी होती.)थोडक्यात रेल्वे बजेटमधे यंदा २२ टक्क्यांची वाढ आहे. अपघात टाळणे व प्रवासी सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देण्यासाठी यंदा १ लाख कोटी रुपयांच्या रेल्वे सुरक्षा निधी (रेल्वे सेफ्टी फंड) ची घोषणा करण्यात आली आहे. प्रतिवर्षी २0 हजार कोटी याप्रमाणे येत्या ५ वर्षांत अर्थसंकल्पाव्दारे त्याची भरपाई करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षा व लोहमार्गांवरील अपघात टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने केंद्र सरकारचे लक्ष ज्या महत्त्वपूर्ण विषयांकडे वेधले होते, त्यात जुन्या मार्गांचे नूतनीकरण, सिग्नल व्यवस्थेचे आधुनिकिरण, शक्तिशाली विद्युत लाइन्स टाकणे, टक्करविरोधी उपकरणे लावणे, स्लिपर्स बदलणे, मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बाद करून नवे ओव्हरब्रिज बांधणे इत्यादी गोष्टींचा समावेश होता. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात या सर्व बाबींचा उल्लेख केला नाही, मात्र प्रतिवर्षी रेल्वे सेफ्टी फंडव्दारे प्रतिवर्षी मिळणाऱ्या २0 हजार कोटींच्या निधीतून या प्रकल्पांची टप्प्याटप्प्याने पूर्तता करता येईल.भारतात ज्या मार्गांवर १00 गाड्यांची वाहतूक हवी, त्या रूटवर सध्या १५0 ते १६0 गाड्या धावत आहेत. अपेक्षेनुसार २0१९ पर्यंत डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम पूर्ण झाले, तर गाड्यांच्या गर्दीमुळे मार्गांवरचे कंजेशन बऱ्यापैकी दूर होईल. तूर्त प्रवाशांच्या गर्दीची गैरसोय टाळण्यासाठी डबल डेकर ट्रेन्सचा पर्याय रेल्वेने स्वीकारला आहे.