शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जिल्हा परिषद शाळा पोषण आहारापासून वंचित

By admin | Updated: July 17, 2016 00:59 IST

संताप : महिन्यापासून धान्य वितरित नाही

बेलगाव कुऱ्हे : शासनाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार व पूरक पोषण आहार देण्याची तरतूद आहे. या मुलांच्या आहाराचा घास कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, मात्र मुलांना गेल्या महिन्याभरापासून इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागातील पिंपळगाव डुकरा, भरवीर, भंडारदरावाडी, गिऱ्हेवाडी, निनावी, पिंपळगाव घाडगा येथे पोषण आहाराच्या खिचडीसाठी लागणारे तांदूळ अथवा कोणतेही खाद्य वस्तू अजूनही वितरित झालेल्या नसल्याने मुलांना खिचडी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. या आदिवासी दुर्गम भागातील काही जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून धान्य घेऊन तात्पुरती खिचडी शिजविली जाते. आता धान्यच शिल्लक नसल्यामुळे शाळा हतबल झाल्या आहेत. जिल्हा ठेकेदाराकडून अद्याप साहित्याचे वाटप झालेले नाही. तालुकास्तरावर काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळांना धान्य वाटप झाले असले तरी, काही शाळा धान्य नाही म्हणून शिक्षण घेणारी आदिवासी मुलेही आहारापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब समोर दिसत आहे.दररोज शाळेच्या मुलांना खिचडी वाटप करण्याचा शासनाचा उद्देश आहे; मात्र इगतपुरीच्या शिक्षण विभागाचे कोणत्याही पद्धतीचे नियोजन नसल्याने त्यांना मुलांच्या पोषण आहाराचा विसर पडला आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पोषण आहारातील धान्य लवकर शाळेना वाटप करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)