शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक डिसेंबरमध्ये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:14 IST

राज्यातील जिल्हा परिषदेच्या बारा व पंचायत समित्यांच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने आपली तयारी चालविली असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रत्येकी दोन जागांचा समावेश आहे. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून आयोगाने सर्व रिक्त जागांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केल्याने साधारणत: डिसेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात चार जागा : मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषदेच्या बारा व पंचायत समित्यांच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने आपली तयारी चालविली असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रत्येकी दोन जागांचा समावेश आहे. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून आयोगाने सर्व रिक्त जागांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केल्याने साधारणत: डिसेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नांदगाव पंचायत समितीच्या न्यायडोंगरी व निफाड पंचायत समितीच्या नांदुर्डी अशा दोन जागा रिक्त आहेत. न्यायडोंगरीच्या सदस्या आशा आहेर या उपसभापती होत्या तर नांदुर्डी गणातील सूर्यवंशी या दोघांचे जातवैधता पडताळणी नसल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. राज्य निवडणूक आयोगाने ४ आॅक्टोबर रोजी या मतदारसंघात ज्या ज्या मतदारांची नावे यादीत असतील ती ग्राह्ण धरण्याचे निर्देश दिले असून, ही यादी २ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करून हरकती मागविण्यात येतील. ६ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली असून, ८ नोव्हेंबर रोजी त्यावर सुनावणी व त्याचदिवशी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गटात व गणात मतदारांना पाहण्यासाठी ही यादी ठेवण्यात येणार आहे.साधारणत: मतदार यादी जाहीर झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जातो. त्यामुळे मतदार यादी नोव्हेंबरमध्येच जाहीर होणार असल्याने साधारणत: डिसेंबरमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम घोेषित करताच राजकीय वर्तुळातही पोटनिवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक तयारीला लागले असून, प्रत्येकाने यापूर्वीच आपली चाचपणी करून ठेवली आहे.लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजीनामानाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव व कळवण तालुक्यातील मानूर या दोन जिल्हा परिषदेच्या जागा लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान रिक्त झाल्या आहेत. खेडगाव गटातील सदस्य माजी आमदार धनराज महाले यांनी पक्षांतर करून राष्टÑवादीत प्रवेश केला व लोकसभेची उमेदवारी केली होती तर मानूर गटाच्या सदस्या डॉ. भारती पवार यांनीदेखील राष्टÑवादी सोडून भाजपात प्रवेश केला व उमेदवारी केली होती. त्यात त्या निवडूनही आल्या. दोन्ही सदस्यांनी निवडणुकीपूर्वीच राजीनामा दिल्याने या दोन्ही जागा गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदElectionनिवडणूक