शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

पन्नास टक्के उपस्थितीबाबत जिल्हा परिषद पेचात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:14 IST

शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता, अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के असावी, असे आदेश बजावले आहेत. त्यामागे शासकीय कार्यालयात ...

शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता, अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के असावी, असे आदेश बजावले आहेत. त्यामागे शासकीय कार्यालयात अभ्यागतांची होणारी गर्दी व सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वाढत चाललेली कोरोना बाधितांची संख्या हे कारण देण्यात आले आहे. अनेक शासकीय कार्यालयात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून, त्यातून अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. नाशिक जिल्हा परिषदेत कोरोना बाधितांची संख्या २५ ते ३०च्या घरात पोहोचली असून, दररोज नवनवीन बाधित सापडू लागले आहेत. त्यामुळे अनेक विभागांमध्ये अगोदरच कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. त्यातच रिक्तपदांची संख्या अधिक आहे. सध्या मार्च अखेरची कामे सर्वच विभागात सुरू आहेत. या कामांना वेळेची मर्यादा असून, चालू आठवडा त्यासाठी महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी की, शासनानेच मर्यादा घालून दिलेल्या आर्थिक वर्षाअखेरची कामे पूर्ण करावी, असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनाला पडला आहे. आरोग्य व पाणी पुरवठा या दोन्ही अत्यावश्यक सेवा असलेल्या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करता येणार नाही, त्याच प्रमाणे लेखा व वित्त विभागासाठीही हा महिना महत्त्वाचा असल्यामुळे त्यांच्यात कपात करण्याजोगी परिस्थिती नाही. त्यामुळे तूर्त तरी मार्च अखेरपर्यंत जिल्हा परिषदेत ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याची मानसिकता प्रशासनाची दिसत नसून, उलट कोरोनापासून खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने सर्वच खाते प्रमुखांना दिल्या आहेत.