शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पन्नास टक्के उपस्थितीबाबत जिल्हा परिषद पेचात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:14 IST

शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता, अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के असावी, असे आदेश बजावले आहेत. त्यामागे शासकीय कार्यालयात ...

शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता, अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के असावी, असे आदेश बजावले आहेत. त्यामागे शासकीय कार्यालयात अभ्यागतांची होणारी गर्दी व सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वाढत चाललेली कोरोना बाधितांची संख्या हे कारण देण्यात आले आहे. अनेक शासकीय कार्यालयात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून, त्यातून अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. नाशिक जिल्हा परिषदेत कोरोना बाधितांची संख्या २५ ते ३०च्या घरात पोहोचली असून, दररोज नवनवीन बाधित सापडू लागले आहेत. त्यामुळे अनेक विभागांमध्ये अगोदरच कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. त्यातच रिक्तपदांची संख्या अधिक आहे. सध्या मार्च अखेरची कामे सर्वच विभागात सुरू आहेत. या कामांना वेळेची मर्यादा असून, चालू आठवडा त्यासाठी महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी की, शासनानेच मर्यादा घालून दिलेल्या आर्थिक वर्षाअखेरची कामे पूर्ण करावी, असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनाला पडला आहे. आरोग्य व पाणी पुरवठा या दोन्ही अत्यावश्यक सेवा असलेल्या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करता येणार नाही, त्याच प्रमाणे लेखा व वित्त विभागासाठीही हा महिना महत्त्वाचा असल्यामुळे त्यांच्यात कपात करण्याजोगी परिस्थिती नाही. त्यामुळे तूर्त तरी मार्च अखेरपर्यंत जिल्हा परिषदेत ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याची मानसिकता प्रशासनाची दिसत नसून, उलट कोरोनापासून खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने सर्वच खाते प्रमुखांना दिल्या आहेत.