शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास टक्के उपस्थितीबाबत जिल्हा परिषद पेचात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:14 IST

शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता, अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के असावी, असे आदेश बजावले आहेत. त्यामागे शासकीय कार्यालयात ...

शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता, अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के असावी, असे आदेश बजावले आहेत. त्यामागे शासकीय कार्यालयात अभ्यागतांची होणारी गर्दी व सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वाढत चाललेली कोरोना बाधितांची संख्या हे कारण देण्यात आले आहे. अनेक शासकीय कार्यालयात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून, त्यातून अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. नाशिक जिल्हा परिषदेत कोरोना बाधितांची संख्या २५ ते ३०च्या घरात पोहोचली असून, दररोज नवनवीन बाधित सापडू लागले आहेत. त्यामुळे अनेक विभागांमध्ये अगोदरच कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. त्यातच रिक्तपदांची संख्या अधिक आहे. सध्या मार्च अखेरची कामे सर्वच विभागात सुरू आहेत. या कामांना वेळेची मर्यादा असून, चालू आठवडा त्यासाठी महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी की, शासनानेच मर्यादा घालून दिलेल्या आर्थिक वर्षाअखेरची कामे पूर्ण करावी, असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनाला पडला आहे. आरोग्य व पाणी पुरवठा या दोन्ही अत्यावश्यक सेवा असलेल्या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करता येणार नाही, त्याच प्रमाणे लेखा व वित्त विभागासाठीही हा महिना महत्त्वाचा असल्यामुळे त्यांच्यात कपात करण्याजोगी परिस्थिती नाही. त्यामुळे तूर्त तरी मार्च अखेरपर्यंत जिल्हा परिषदेत ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याची मानसिकता प्रशासनाची दिसत नसून, उलट कोरोनापासून खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने सर्वच खाते प्रमुखांना दिल्या आहेत.