शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेचे शिष्टमंडळ नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 20:06 IST

जिल्ह्यात द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले असून, हंगामपूर्व द्राक्षांचे शंभर टक्के नुकसान झाले तर छाटणी झालेल्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, भात पिकांचे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

ठळक मुद्देस्थायी समिती : संपूर्ण कर्जमाफी, सरसकट पंचनाम्याचा ठरावहंगामपूर्व द्राक्षांचे शंभर टक्के नुकसान झाले तर छाटणी झालेल्या बागांचे मोठे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून, सरकारने नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीसाठी लावलेले निकष बदलून शेतक-यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत व त्यांच्यावर असलेल्या पीककर्जासह सर्व प्रकारच्या कर्जाची तत्काळ माफी देऊन शेतक-यांना उभे करावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला. जिल्हा परिषदेने निव्वळ ठराव करून शासनाला आपल्या भावना कळविण्यापुरता मर्यादित न राहता, सर्वपक्षीय पदाधिकारी, सदस्यांचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री अथवा सचिवांची भेट घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला सुरुवात झाल्यानंतर भास्कर गावित यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करून स्थायी समितीच्या सभेत त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. त्यावर बाळासाहेब क्षीरसागर यांनी जिल्ह्यात द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले असून, हंगामपूर्व द्राक्षांचे शंभर टक्के नुकसान झाले तर छाटणी झालेल्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, भात पिकांचे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-याला उत्पादन घेण्यासाठी आलेला खर्च व त्यापासून मिळणा-या उत्पादनाइतकी भरपाई मिळावी, त्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे व शेतक-यांची सर्व कर्जे माफ करण्यात यावी, अशी मागणी करून तसा ठराव मांडला. या ठरावाला आत्माराम कुंभार्डे यांनी अनुमोदन दिले. ते म्हणाले, सरकारकडून हेक्टरी ३३ हजार रुपये शेतकºयांना नुकसानभरपाई शासनाकडून दिली जात असली तरी, शेतपिकांचे झालेले नुकसान पाहता शासनाची मदत अल्प आहे. त्यामुळे कमीत कमी शेतक-याला एक लाख रुपये हेक्टरी नुकसानभरपाई दिली जावी व त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व पक्षीय शिष्टमंडळाने येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री, मुख्य सचिव, अवर सचिवांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती समाजावून सांगावी. तसे झाल्यास ख-या अर्थाने शेतक-यांना न्याय दिल्यासारखे होणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद