शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
4
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
5
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
6
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
7
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
8
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
9
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
10
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
11
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
12
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
13
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
14
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
15
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
16
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
17
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
18
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
19
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
20
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेचे शिष्टमंडळ नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 20:06 IST

जिल्ह्यात द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले असून, हंगामपूर्व द्राक्षांचे शंभर टक्के नुकसान झाले तर छाटणी झालेल्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, भात पिकांचे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

ठळक मुद्देस्थायी समिती : संपूर्ण कर्जमाफी, सरसकट पंचनाम्याचा ठरावहंगामपूर्व द्राक्षांचे शंभर टक्के नुकसान झाले तर छाटणी झालेल्या बागांचे मोठे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून, सरकारने नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीसाठी लावलेले निकष बदलून शेतक-यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत व त्यांच्यावर असलेल्या पीककर्जासह सर्व प्रकारच्या कर्जाची तत्काळ माफी देऊन शेतक-यांना उभे करावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला. जिल्हा परिषदेने निव्वळ ठराव करून शासनाला आपल्या भावना कळविण्यापुरता मर्यादित न राहता, सर्वपक्षीय पदाधिकारी, सदस्यांचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री अथवा सचिवांची भेट घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला सुरुवात झाल्यानंतर भास्कर गावित यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करून स्थायी समितीच्या सभेत त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. त्यावर बाळासाहेब क्षीरसागर यांनी जिल्ह्यात द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले असून, हंगामपूर्व द्राक्षांचे शंभर टक्के नुकसान झाले तर छाटणी झालेल्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, भात पिकांचे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-याला उत्पादन घेण्यासाठी आलेला खर्च व त्यापासून मिळणा-या उत्पादनाइतकी भरपाई मिळावी, त्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे व शेतक-यांची सर्व कर्जे माफ करण्यात यावी, अशी मागणी करून तसा ठराव मांडला. या ठरावाला आत्माराम कुंभार्डे यांनी अनुमोदन दिले. ते म्हणाले, सरकारकडून हेक्टरी ३३ हजार रुपये शेतकºयांना नुकसानभरपाई शासनाकडून दिली जात असली तरी, शेतपिकांचे झालेले नुकसान पाहता शासनाची मदत अल्प आहे. त्यामुळे कमीत कमी शेतक-याला एक लाख रुपये हेक्टरी नुकसानभरपाई दिली जावी व त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व पक्षीय शिष्टमंडळाने येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री, मुख्य सचिव, अवर सचिवांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती समाजावून सांगावी. तसे झाल्यास ख-या अर्थाने शेतक-यांना न्याय दिल्यासारखे होणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद