शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी गावांचा कायापालट करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 23:21 IST

दिंडोरी / वरखेडा : ग्रामविकास हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असून, आज अनेक तरुण ग्रामविकासासाठी धडपड करताना दिसत आहे हे चांगले चित्र आहे. गावचे उत्पन्न कमी असतानाही विविध योजनांच्या माध्यमातून वरखेडा येथील विकास होत लिफ्ट असलेली बहुमजली ग्रामपंचायत कार्यालय असलेले राज्यातील वरखेडा हे पहिले गाव असून, युवकांनी असेच ग्रामविकासात योगदान देत ग्रामीण भागाचा कायापालट करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ठळक मुद्देअजित पवार : वरखेडा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या बहुमजली इमारतीचे उद्घाटन

poliलोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी / वरखेडा : ग्रामविकास हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असून, आज अनेक तरुण ग्रामविकासासाठी धडपड करताना दिसत आहे हे चांगले चित्र आहे. गावचे उत्पन्न कमी असतानाही विविध योजनांच्या माध्यमातून वरखेडा येथील विकास होत लिफ्ट असलेली बहुमजली ग्रामपंचायत कार्यालय असलेले राज्यातील वरखेडा हे पहिले गाव असून, युवकांनी असेच ग्रामविकासात योगदान देत ग्रामीण भागाचा कायापालट करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.वरखेडा येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन, पाणीपुरवठा योजना भूमिपूजन आदी विविध विकासकामांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते.यावेळी बोलताना पवार यांनी राजेंद्र उफाडे यांच्या कामकाजाचे कौतुक करून गावात ग्रामविकासासाठी २५ लाखांचा निधी देत असल्याचे जाहीर केले.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, हे सरकार जनतेचे असून, ग्रामीण व शहरी दोन्ही भागांचा समान विकास साधणार आहे. ग्रामपंचायती बळकट करणार असून चौदाव्या वित्त आयोगामुळे ग्राम विकास चांगला होणार आहे. भाजपच्या काळात १७ रुपयांचे दूध होते ते आता ३१ रुपये केले. मालेगावात झालेली दुर्घटना अत्यंत वाईट आहे, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे २६ लोकांना जीव गमवावा लागला. यामुळे योग्य पद्धतीने व संयमाने जीवन जगावे, तरुण समाज चांगला तयार व्हायला पाहिजे, साधू संतांचा आदर्श ठेवून वागले पाहिजे असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक उपसरपंच राजेंद्र उफाडे यांनीकेले.आमदार नरहरी झिरवाळ यांनी विविध प्रश्न मांडले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार उत्तम भालेराव, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, माजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, जिप सदस्य भास्कर भगरे, विश्वासराव देशमुख, सदाशिव शेळके, संजय पडोळ, वरखेडा सरपंच जयश्री कडाळे, सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.राजेंद्र लग्नात एवढा नटला नसेल...अजितदादा पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. शुक्रवारी वरखेडा येथील उपसरपंच राजेंद्र उफाडे सूट कोट व फेटा घालून होते, यावेळी बोलताना पवार यांनी राजेंद्र लग्नात एवढा नटला नसेल तेवढा नटला... मी बघा किती साध्या ड्रेसवर असे म्हणत फिरकी घेतली. या ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजनही अजित पवार यांच्या हस्ते झाले होते, त्यावेळी राजेंद्र उफाडे यांनी ब्रेसलेट घातले होते तेव्हाही त्यांना टोमणा मारत साधं राहण्याचा सल्ला दिला होता.झरवाळांवर मोठी जबाबदारीआमदार नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपद द्यावे ही सर्वांची अपेक्षा होती पण तीन पक्षाचे सरकार आले, त्यामुळे मर्यादा आल्या. तरी चिंता करू नका, भविष्यात लवकरच नरहरी झिरवाळ यांच्यावर मोठी जबादारी देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.अजित पवार यांचे दिंडोरी व परमोरी येथे स्वागत निवेदनशुक्रवारी सकाळी दिंडोरी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या अजितदादा पवार यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दिंडोरी येथे नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी स्वागत करीत विविध मागण्यांचे निवेदन दिले.परमोरी येथेही रोशन दिघे, अनिल दिघे, राकेश दिघे, विजय दिघे, हेमंत दिघे, नीलेश दिघे व आदींनी त्यांचे स्वागत करीत ग्रामपंचायतीतर्फेमागण्यांचे निवेदन दिले. पवार यांनी स्वागत स्वीकारत आस्थेवाईकपणे चर्चा करीत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारण