शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

युवकांनी गावांचा कायापालट करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 23:21 IST

दिंडोरी / वरखेडा : ग्रामविकास हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असून, आज अनेक तरुण ग्रामविकासासाठी धडपड करताना दिसत आहे हे चांगले चित्र आहे. गावचे उत्पन्न कमी असतानाही विविध योजनांच्या माध्यमातून वरखेडा येथील विकास होत लिफ्ट असलेली बहुमजली ग्रामपंचायत कार्यालय असलेले राज्यातील वरखेडा हे पहिले गाव असून, युवकांनी असेच ग्रामविकासात योगदान देत ग्रामीण भागाचा कायापालट करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ठळक मुद्देअजित पवार : वरखेडा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या बहुमजली इमारतीचे उद्घाटन

poliलोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी / वरखेडा : ग्रामविकास हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असून, आज अनेक तरुण ग्रामविकासासाठी धडपड करताना दिसत आहे हे चांगले चित्र आहे. गावचे उत्पन्न कमी असतानाही विविध योजनांच्या माध्यमातून वरखेडा येथील विकास होत लिफ्ट असलेली बहुमजली ग्रामपंचायत कार्यालय असलेले राज्यातील वरखेडा हे पहिले गाव असून, युवकांनी असेच ग्रामविकासात योगदान देत ग्रामीण भागाचा कायापालट करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.वरखेडा येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन, पाणीपुरवठा योजना भूमिपूजन आदी विविध विकासकामांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते.यावेळी बोलताना पवार यांनी राजेंद्र उफाडे यांच्या कामकाजाचे कौतुक करून गावात ग्रामविकासासाठी २५ लाखांचा निधी देत असल्याचे जाहीर केले.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, हे सरकार जनतेचे असून, ग्रामीण व शहरी दोन्ही भागांचा समान विकास साधणार आहे. ग्रामपंचायती बळकट करणार असून चौदाव्या वित्त आयोगामुळे ग्राम विकास चांगला होणार आहे. भाजपच्या काळात १७ रुपयांचे दूध होते ते आता ३१ रुपये केले. मालेगावात झालेली दुर्घटना अत्यंत वाईट आहे, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे २६ लोकांना जीव गमवावा लागला. यामुळे योग्य पद्धतीने व संयमाने जीवन जगावे, तरुण समाज चांगला तयार व्हायला पाहिजे, साधू संतांचा आदर्श ठेवून वागले पाहिजे असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक उपसरपंच राजेंद्र उफाडे यांनीकेले.आमदार नरहरी झिरवाळ यांनी विविध प्रश्न मांडले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार उत्तम भालेराव, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, माजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, जिप सदस्य भास्कर भगरे, विश्वासराव देशमुख, सदाशिव शेळके, संजय पडोळ, वरखेडा सरपंच जयश्री कडाळे, सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.राजेंद्र लग्नात एवढा नटला नसेल...अजितदादा पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. शुक्रवारी वरखेडा येथील उपसरपंच राजेंद्र उफाडे सूट कोट व फेटा घालून होते, यावेळी बोलताना पवार यांनी राजेंद्र लग्नात एवढा नटला नसेल तेवढा नटला... मी बघा किती साध्या ड्रेसवर असे म्हणत फिरकी घेतली. या ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजनही अजित पवार यांच्या हस्ते झाले होते, त्यावेळी राजेंद्र उफाडे यांनी ब्रेसलेट घातले होते तेव्हाही त्यांना टोमणा मारत साधं राहण्याचा सल्ला दिला होता.झरवाळांवर मोठी जबाबदारीआमदार नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपद द्यावे ही सर्वांची अपेक्षा होती पण तीन पक्षाचे सरकार आले, त्यामुळे मर्यादा आल्या. तरी चिंता करू नका, भविष्यात लवकरच नरहरी झिरवाळ यांच्यावर मोठी जबादारी देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.अजित पवार यांचे दिंडोरी व परमोरी येथे स्वागत निवेदनशुक्रवारी सकाळी दिंडोरी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या अजितदादा पवार यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दिंडोरी येथे नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी स्वागत करीत विविध मागण्यांचे निवेदन दिले.परमोरी येथेही रोशन दिघे, अनिल दिघे, राकेश दिघे, विजय दिघे, हेमंत दिघे, नीलेश दिघे व आदींनी त्यांचे स्वागत करीत ग्रामपंचायतीतर्फेमागण्यांचे निवेदन दिले. पवार यांनी स्वागत स्वीकारत आस्थेवाईकपणे चर्चा करीत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारण