शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

युवकांनी भारतमातेच्या सेवेत लीन व्हावे : लपालकर

By admin | Updated: August 9, 2015 23:12 IST

युवकांनी भारतमातेच्या सेवेत लीन व्हावे : लपालकर

नाशिक : पाश्चात्य संस्कृती ही भौतिकवादी असून, भारतीय संस्कृती ही अध्यात्मवादी आहे. युवकांनी एक उत्साह, ध्येय, नवीन आशा घेऊन भारतमातेची सेवा करायला हवी, असे मत विश्वास लपालकर यांनी नाशिक सिंधी सोशल ग्रुप नाशिक आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नाशिक शाखा आयोजित व्याख्यानमालेत व्यक्त केले.व्याख्यानमालेच्या द्वितीय पुष्पात ‘पुरब और पश्चिम स्वामी विवेकानंदजी के नजरोसे’ या विषयावर विश्वास लपालकर श्रोत्यांशी संवाद साधताना विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित अनेक उदाहरणांतून प्रेरणा दिली. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचे नाते लोहचुंबकासारखे होते. विवेकानंदांनी संन्यास घेतल्यानंतर १८८८ साली कोलकाता येथून परिभ्रमणाला सुरुवात केली. संन्यास घेतल्यानंतर आपले आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले होते. कोलकाता ते कन्याकुमारी असा प्रवास करताना विवेकानंदांनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला. केरळमध्ये गेल्यावर तेथील जातीय हिंसाचार पाहून विवेकानंद हतबल होत ‘मी जणू वेड्यांच्या इस्पितळात आलो’ असल्याची खंत व्यक्त केली होती. परिभ्रमण करताना १८९२ साली विवेकानंद कन्याकुमारीला पोहचले आणि समुद्रातील शिलालेखावर तीन दिवस तपश्चर्या करून उत्तरेकडे बघितले असता त्यांना परिभ्रमण करताना दिसलेली संपूर्ण भारतीय संस्कृती डोळ्यासमोर येऊ लागली आणि भारताला संघटन करण्याची गरज असल्याची जाणीव प्रकर्षाने जाणवल्याचे लपालकर यांनी यावेळी सांगितले.याकाळात विवेकानंदांना भारतीय संस्कृती एका हाताने घट्ट पकडून ठेवत दुसऱ्या हाताने पाश्चात्य संस्कृतीतून योग्य ते घेत जाण्याची क्लृप्ती अवगत झाल्याचेही लपालकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात आश्विनी बेदी आणि छाया फुकन यांनी विवेकानंद जीवन गीत गाऊन केली; तर सूत्रसंचालन हरिश गुरुनानी यांनी केले. यावेळी नरेश कारडा, वासुदेव ललवाणी, मधुकर देशपांडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)