शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

गुरुजी तुम्हीसुद्धा!

By किरण अग्रवाल | Updated: September 2, 2018 01:11 IST

समाजाचे मार्गदर्शक म्हणविणाऱ्या स्तंभात गुरुजनांचा क्रम नेहमी अव्वल राहिला असला तरी, त्यातील काही अपवादात्मक घटकांमुळे या आदरप्राप्त क्षेत्रालाही नख लागण्याचे प्रकार अलीकडे वरचेवर समोर येत आहे, हे दुर्दैवीच म्हणायला हवे. स्वत:च्या सोयी-सुविधाजनक बदलीसाठी जिल्हा परिषद यंत्रणेला खोटी वा चुकीची माहिती पुरविणाºया शिक्षकांचे जे प्रकरण नाशकात पुढे आले आहे तेदेखील याच अपवादात मोडणारे आहे.

ठळक मुद्दे दुसरीकडे काही जणांच्या वेतनवाढी बंद करण्याची वेळ ओढवावी, हे शोचनीयच ठरावे.

समाजाचे मार्गदर्शक म्हणविणाऱ्या स्तंभात गुरुजनांचा क्रम नेहमी अव्वल राहिला असला तरी, त्यातील काही अपवादात्मक घटकांमुळे या आदरप्राप्त क्षेत्रालाही नख लागण्याचे प्रकार अलीकडे वरचेवर समोर येत आहे, हे दुर्दैवीच म्हणायला हवे. स्वत:च्या सोयी-सुविधाजनक बदलीसाठी जिल्हा परिषद यंत्रणेला खोटी वा चुकीची माहिती पुरविणाºया शिक्षकांचे जे प्रकरण नाशकात पुढे आले आहे तेदेखील याच अपवादात मोडणारे आहे.नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलीप्रक्रियेत स्वत:ची सोयीच्या ठिकाणी वर्णी लावून घेण्यासाठी काहींनी खोटी माहिती भरून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यासंबंधित सुमारे २०० शिक्षकांची सुनावणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेऊन त्यात दोषी आढळलेल्या ९४ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर, संबंधिताना पुढील बदलीप्रक्रियेत विकल्प दिला जाणार नसून अवघड म्हणजे दुर्गम भागात त्यांची बदली केली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील जवळपास सर्वच विभागातील अनागोंदी हा नेहमीच टीकेचा विषय ठरत आला आहे. शिक्षक बदल्यांचा विषयही दरवर्षीच गाजत असतो; परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या ‘मिलीभगता’तून काहींना लाभदायक तर काहींसाठी त्रासदायक ठरणाºया बदल्या होत असण्याची ती तक्रार असे. यंदा मात्र शिक्षकांनीच खोटी माहिती पुरवून प्रशासन यंत्रणेची दिशाभूल केल्याचे पुढे आले. असले प्रकार हे अपवादात्मकतेत मोडणारे असतात हे खरे; पण त्यामुळे एकूणच समाजाचा दृष्टिकोन बदलू पाहण्याची भीती असते. मागे मालेगाव महापालिकेत जीवन सोनवणे आयुक्तपदी असताना त्यांनी तेथील सर्वशिक्षा अभियानाच्या योजनेत गोंधळ घालणाºयांना हुडकून काढले होते. शासनाचा निधी लाटून प्रत्यक्षात वर्गखोल्याच बांधल्या नसल्याचे त्यावेळी आढळून आल्याने काही मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुरुजनांच्या प्रतिमेवर ओरखडा ओढणारे हे प्रकार आहेत. तेव्हा अशा गोंधळींना वेळीच वठणीवर आणणे हे केवळ प्रशासन म्हणून यंत्रणांचेच काम नाही, तर शिक्षक संघटनांनीदेखील अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात आजही जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्थाबिकट असताना शिक्षकवर्ग ज्ञानार्जनासाठी परिश्रम घेताना दिसतो. खासगी शाळांचे वाढते प्रस्थपाहता जि.प.च्या शाळांसाठी विद्यार्थी मिळविण्यापासून तर ते टिकविण्यापर्यंतचे व्यवस्थापन त्यांना सांभाळावे लागते. ते करताना विद्यार्थी घडवायचे आव्हान सोपे नाही. पण शिक्षकी पेशातील सेवाभाव टिकून असल्याने यंदा जिल्ह्यातील सात शिक्षकांना राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाले आहेत. असे एकीकडे अभिनंदनीय आदर्श समोर येत असताना दुसरीकडे काही जणांच्या वेतनवाढी बंद करण्याची वेळ ओढवावी, हे शोचनीयच ठरावे.