शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पतंजलीच्या ‘उद्योगा’वरून श्रेयवादाचा ‘योगा’

By admin | Updated: December 22, 2016 01:04 IST

आपल्याच प्रयत्नांना यश : फरांदेंनी दिला पालकमंत्र्यांना शह

नाशिक : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योगसमूहाने नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी देऊन चोवीस तास उलटत नाही तोच भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र पतंजलीच्या या उद्योगाचे श्रेय स्वत:कडे घेत, आपल्या पाठपुराव्यामुळेच बाबा रामदेव यांनी ही तयारी दर्शविल्याचा दावा करून पालकमंत्र्यांना शह दिला आहे. नाशिक शहरातील विकासकामांना ज्या-ज्या वेळी मंजुरी देण्याचा विषय पुढे येताच, विद्यमान लोकप्रतिनिधींमध्ये श्रेय घेण्यावरून ‘योगा’ केला जात असल्याचा पुनर्प्रत्यय या निमित्ताने आला आहे.  मंगळवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी निमाच्या कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाशिकमध्ये कृषी पिकांवर आधारित पतंजलीचे फूड पार्क उद्योग सुरू करण्याबाबत बोलणे झाल्याचे सांगून लवकरच या उद्योगासाठी शासकीय जागा देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. नाशिकच्या रोजगार निर्मितीत हातभार लागण्याबरोबरच, कृषिमालाला योग्य ते दर मिळण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला होता. नागपूर नंतर नाशिकची पतंजली उद्योगासाठी निवड होणार असल्याने जिल्'ात गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा सर्व क्षेत्रातून व्यक्त केली जात असताना, भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र आपल्यामुळेच योगगुरू बाबा रामदेव यांनी नाशिकची निवड केल्याचा दावा केला आहे. दि. १६ नोव्हेंबर रोजी नगर येथे व दि. ४ डिसेंबर रोजी नागपूर येथे बाबा रामदेव यांची भेट घेऊन नाशिक जिल्'ातील कांदा व टमाटा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या व पतंजलीच्या मिनी फूड पार्कच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली असता, बाबा रामदेव यांनी या विषयावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार फरांदे यांचे म्हणणे आहे. फरांदे यांनी प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी केलेले प्रयत्न माहितीस्तव सादर केले आहे. त्यामुळे फरांदे यांचे म्हणणे मान्य केल्यास मुख्यमंत्र्यांनी बाबा रामदेव यांच्याशी चर्चा केल्यामुळेच पतंजली फूड पार्क नाशिकमध्ये येत असल्याचा पालकमंत्र्यांचा दावा खोटा ठरू लागला आहे. विशेष म्हणजे आमदार फरांदे यांनी केलेल्या प्रयत्नांची पालकमंत्र्यांनाच माहिती नसल्याचा दुसरा अर्थ काढला जात असून, भाजपातच याची चर्चा होऊ लागली आहे.