शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

पतंजलीच्या ‘उद्योगा’वरून श्रेयवादाचा ‘योगा’

By admin | Updated: December 22, 2016 01:04 IST

आपल्याच प्रयत्नांना यश : फरांदेंनी दिला पालकमंत्र्यांना शह

नाशिक : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योगसमूहाने नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी देऊन चोवीस तास उलटत नाही तोच भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र पतंजलीच्या या उद्योगाचे श्रेय स्वत:कडे घेत, आपल्या पाठपुराव्यामुळेच बाबा रामदेव यांनी ही तयारी दर्शविल्याचा दावा करून पालकमंत्र्यांना शह दिला आहे. नाशिक शहरातील विकासकामांना ज्या-ज्या वेळी मंजुरी देण्याचा विषय पुढे येताच, विद्यमान लोकप्रतिनिधींमध्ये श्रेय घेण्यावरून ‘योगा’ केला जात असल्याचा पुनर्प्रत्यय या निमित्ताने आला आहे.  मंगळवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी निमाच्या कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाशिकमध्ये कृषी पिकांवर आधारित पतंजलीचे फूड पार्क उद्योग सुरू करण्याबाबत बोलणे झाल्याचे सांगून लवकरच या उद्योगासाठी शासकीय जागा देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. नाशिकच्या रोजगार निर्मितीत हातभार लागण्याबरोबरच, कृषिमालाला योग्य ते दर मिळण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला होता. नागपूर नंतर नाशिकची पतंजली उद्योगासाठी निवड होणार असल्याने जिल्'ात गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा सर्व क्षेत्रातून व्यक्त केली जात असताना, भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र आपल्यामुळेच योगगुरू बाबा रामदेव यांनी नाशिकची निवड केल्याचा दावा केला आहे. दि. १६ नोव्हेंबर रोजी नगर येथे व दि. ४ डिसेंबर रोजी नागपूर येथे बाबा रामदेव यांची भेट घेऊन नाशिक जिल्'ातील कांदा व टमाटा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या व पतंजलीच्या मिनी फूड पार्कच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली असता, बाबा रामदेव यांनी या विषयावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार फरांदे यांचे म्हणणे आहे. फरांदे यांनी प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी केलेले प्रयत्न माहितीस्तव सादर केले आहे. त्यामुळे फरांदे यांचे म्हणणे मान्य केल्यास मुख्यमंत्र्यांनी बाबा रामदेव यांच्याशी चर्चा केल्यामुळेच पतंजली फूड पार्क नाशिकमध्ये येत असल्याचा पालकमंत्र्यांचा दावा खोटा ठरू लागला आहे. विशेष म्हणजे आमदार फरांदे यांनी केलेल्या प्रयत्नांची पालकमंत्र्यांनाच माहिती नसल्याचा दुसरा अर्थ काढला जात असून, भाजपातच याची चर्चा होऊ लागली आहे.