शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

येवल्यात गतवर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी

By admin | Updated: May 14, 2014 22:32 IST

येवला : तालुक्यात मागील वर्षापेक्षा तुलनेने पाणीटंचाईचा प्रश्न, पालखेडच्या आवर्तनामुळे व प्रशासनाच्या नियोजनामुळे चांगला हाताळला गेल्याने, तीव्रता फारशी जाणवली नाही.

येवला : तालुक्यात मागील वर्षापेक्षा तुलनेने पाणीटंचाईचा प्रश्न, पालखेडच्या आवर्तनामुळे व प्रशासनाच्या नियोजनामुळे चांगला हाताळला गेल्याने, तीव्रता फारशी जाणवली नाही.मागील वर्षी १५ मेपर्यंत ४४ गावांसह ३७ वाड्यांवर पाणीटंचाईची झळ जाणवली होती. पाणीटंचाईच्या काळात तत्कालीन परिस्थितीत २५ टँकरद्वारे या गावांना पाणीपुरवठा केला गेला.यंदा मात्र पालखेडच्या पाणी आवर्तनाने, चांगलाच दिलासा मिळाला. बोकटे यात्रेनिमित्त पिण्याचे पाणी कालव्यातून फिरले. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली. यंदा तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी अजय जोशी हे पाणीटंचाईच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मागणी आल्यानंतर संबंधित गावांकडे पाहणी करून टँकरची गरज असल्यास चार दिवसांत टँकरची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरूकेले आहे. यंदा केवळ नऊ गावे आणि तीन वाड्यांनाच पाणीपुरवठा करावा लागत आहे व केवळ चार टँकरद्वारा हा पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीत तुलनात्मकदृष्ट्या निश्चितच बदल झाले आहेत.महालगाव, मुरमी, अहेरवाडी, देवरगाव, तळवाडे, बाळापूर, कासारखेडे, निळखेडे, गुजरखेडे- येवला तालुका पाणीटंचाई नऊ गावे.घनामाळी मळा (नगरसूल), शिवाजीनगर (तळवाडे), महादेववाडी (सायगाव)- तीन वाड्या.येवला तालुका- पाणीटंचाई नऊ गावे, तीन वाड्या १५ मेअखेरपर्यंतची परिस्थिती.येवल्यात गेल्या आठवड्यात पारा ४२ अंशांपर्यंत पोहोचला होता, परंतु चार दिवसांपासून पारा तीन ते चार अंशांने खाली उतरला आहे. वातावरण काहीसे ढगाळ आहे. सायंकाळच्या वेळी चांगलीच हवा सुरूआहे. या परिस्थितीमुळे वातावरणात तपमान कमी झाले आहे. यामुळे पाणीटंचाईची तीव्रतादेखील कमी होण्यास मदत होत आहे.पाणीटंचाई गावे टँकरच्या प्रतीक्षेतपांजरवाडी, चांदगाव, जायदरे, लहीत या चार गावांना टँकर मंजुरीची प्रतीक्षा आहे. या शिवाय तीन वाड्यांची मागणीदेखील मंजुरीसाठी प्रांत कार्यालयातून जिल्हाधिकारी यांच्याकडील मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.सेवाभावी पाणपोई सुरूयेथील गंगादरवाजा भागात किरण घाटकर यांनी स्वखर्चाने पाणपोई सुरूकेली आहे. दररोज सकाळी येथील चार माठ पाण्याने भरले जातात. दिवसभर रस्त्याने येणारे जाणारे अनेक नागरिक या पाणपोईचा लाभ घेतात. याशिवाय सिद्धेश्वर हनुमान मंडळ, काबरा चॉरिटेबल ट्रस्ट यांच्यासह अनेक सेवाभावी संस्थांनी पाणपोईची व्यवस्था शहरात केली आहे.या महिन्याच्या अखेरीस वातावरणात उष्मा वाढला, तर ग्रामीण भागात पाणीटंचाईची गावे आणखी वाढण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)