शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

येवल्यात गतवर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी

By admin | Updated: May 14, 2014 22:32 IST

येवला : तालुक्यात मागील वर्षापेक्षा तुलनेने पाणीटंचाईचा प्रश्न, पालखेडच्या आवर्तनामुळे व प्रशासनाच्या नियोजनामुळे चांगला हाताळला गेल्याने, तीव्रता फारशी जाणवली नाही.

येवला : तालुक्यात मागील वर्षापेक्षा तुलनेने पाणीटंचाईचा प्रश्न, पालखेडच्या आवर्तनामुळे व प्रशासनाच्या नियोजनामुळे चांगला हाताळला गेल्याने, तीव्रता फारशी जाणवली नाही.मागील वर्षी १५ मेपर्यंत ४४ गावांसह ३७ वाड्यांवर पाणीटंचाईची झळ जाणवली होती. पाणीटंचाईच्या काळात तत्कालीन परिस्थितीत २५ टँकरद्वारे या गावांना पाणीपुरवठा केला गेला.यंदा मात्र पालखेडच्या पाणी आवर्तनाने, चांगलाच दिलासा मिळाला. बोकटे यात्रेनिमित्त पिण्याचे पाणी कालव्यातून फिरले. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली. यंदा तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी अजय जोशी हे पाणीटंचाईच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मागणी आल्यानंतर संबंधित गावांकडे पाहणी करून टँकरची गरज असल्यास चार दिवसांत टँकरची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरूकेले आहे. यंदा केवळ नऊ गावे आणि तीन वाड्यांनाच पाणीपुरवठा करावा लागत आहे व केवळ चार टँकरद्वारा हा पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीत तुलनात्मकदृष्ट्या निश्चितच बदल झाले आहेत.महालगाव, मुरमी, अहेरवाडी, देवरगाव, तळवाडे, बाळापूर, कासारखेडे, निळखेडे, गुजरखेडे- येवला तालुका पाणीटंचाई नऊ गावे.घनामाळी मळा (नगरसूल), शिवाजीनगर (तळवाडे), महादेववाडी (सायगाव)- तीन वाड्या.येवला तालुका- पाणीटंचाई नऊ गावे, तीन वाड्या १५ मेअखेरपर्यंतची परिस्थिती.येवल्यात गेल्या आठवड्यात पारा ४२ अंशांपर्यंत पोहोचला होता, परंतु चार दिवसांपासून पारा तीन ते चार अंशांने खाली उतरला आहे. वातावरण काहीसे ढगाळ आहे. सायंकाळच्या वेळी चांगलीच हवा सुरूआहे. या परिस्थितीमुळे वातावरणात तपमान कमी झाले आहे. यामुळे पाणीटंचाईची तीव्रतादेखील कमी होण्यास मदत होत आहे.पाणीटंचाई गावे टँकरच्या प्रतीक्षेतपांजरवाडी, चांदगाव, जायदरे, लहीत या चार गावांना टँकर मंजुरीची प्रतीक्षा आहे. या शिवाय तीन वाड्यांची मागणीदेखील मंजुरीसाठी प्रांत कार्यालयातून जिल्हाधिकारी यांच्याकडील मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.सेवाभावी पाणपोई सुरूयेथील गंगादरवाजा भागात किरण घाटकर यांनी स्वखर्चाने पाणपोई सुरूकेली आहे. दररोज सकाळी येथील चार माठ पाण्याने भरले जातात. दिवसभर रस्त्याने येणारे जाणारे अनेक नागरिक या पाणपोईचा लाभ घेतात. याशिवाय सिद्धेश्वर हनुमान मंडळ, काबरा चॉरिटेबल ट्रस्ट यांच्यासह अनेक सेवाभावी संस्थांनी पाणपोईची व्यवस्था शहरात केली आहे.या महिन्याच्या अखेरीस वातावरणात उष्मा वाढला, तर ग्रामीण भागात पाणीटंचाईची गावे आणखी वाढण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)