शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

येवलेकरांचा घसा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 01:15 IST

येवला : शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून, पाच दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिटे अपुरा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.

ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाई : चार दिवसांआड १५ मिनिटे अशुद्ध पाणीपुरवठा

येवला : शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून, पाच दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिटे अपुरा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.सोमवारी तर मध्यवस्तीसह अनेक भागात पाणीपुरवठाच झाला नसल्याचे नागरिक सांगत आहेत. आवर्तन मिळण्यासाठी कागदोपत्री श्रेयवादाचेही प्रयत्न झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १ मार्चला आवर्तन सोडणार असल्याचे लेखी आश्वासनदेखील मिळाले. अद्यापपावेतो पाणी आलेच नाही. आता १० मार्चच्या पुढे पाणी मिळणार असल्याची चर्चा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची क्षमता ५० दलघफुटाची आहे. परंतु वारेमाप अनधिकृत पाणी उपसा आणि अयोग्य वितरण व्यवस्था यामुळे चार योजना राबवूनही येवलेकरांचा घसा कोरडाच राहत असल्याचा टाहो अनेकदा फोडला जातो. पालखेड डाव्या कालव्याचे पाणी आवर्तन मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेला पत्राद्वारे कळविले. पण पाणी आवर्तन सुटलेच नाही. आणखी किमान १५ ते २० दिवसांनी आवर्तन सुटणार असल्याची चर्चा आहे. आणखी काही दिवस येवलेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची स्थिती दिसत आहे. पालिकेच्या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे पोटदुखीचे आजार वाढले आहेत. अशुद्ध पाण्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आले आहे. याचेही कोणाला सोयरसुतक नाही. पाणीटंचाई सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.२०० विहिरीतून पाण्याचा उपसापालखेड पाणी आवर्तनाने शहर साठवण तलावात भरलेले ४० दलघफूट पाणी मार्चअखेर पुरणार होते. शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही पाणी पुरायलाच हवे. पण पाच दिवसाआड पाणीपुरवठा करूनही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच पाणी संपुष्टात येते. हे नेमके गणित कायम बिघडले आणि ते कुठे बिघडते. हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. वर्षभरासाठी पाणीपट्टी आकारून शहराला घरटी पाच दिवसाआड पाणी मिळते. खासगी पाण्याचे टँकर राजकीय वरदहस्ताने साठवण तलावालगतच्या विहिरीवरून सर्रासपणे भरले जात असल्याची चर्चा आहे. शिवाय सभोवतालच्या सुमारे २०० विहिरीतून होणारा अमर्याद उपसा, पालिकेचे पाणीवाटपाचे ढिसाळ नियोजन यामुळे शहरात पाणीटंचाई आहे.