शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

येवलेकरांचा घसा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 01:15 IST

येवला : शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून, पाच दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिटे अपुरा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.

ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाई : चार दिवसांआड १५ मिनिटे अशुद्ध पाणीपुरवठा

येवला : शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून, पाच दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिटे अपुरा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.सोमवारी तर मध्यवस्तीसह अनेक भागात पाणीपुरवठाच झाला नसल्याचे नागरिक सांगत आहेत. आवर्तन मिळण्यासाठी कागदोपत्री श्रेयवादाचेही प्रयत्न झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १ मार्चला आवर्तन सोडणार असल्याचे लेखी आश्वासनदेखील मिळाले. अद्यापपावेतो पाणी आलेच नाही. आता १० मार्चच्या पुढे पाणी मिळणार असल्याची चर्चा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची क्षमता ५० दलघफुटाची आहे. परंतु वारेमाप अनधिकृत पाणी उपसा आणि अयोग्य वितरण व्यवस्था यामुळे चार योजना राबवूनही येवलेकरांचा घसा कोरडाच राहत असल्याचा टाहो अनेकदा फोडला जातो. पालखेड डाव्या कालव्याचे पाणी आवर्तन मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेला पत्राद्वारे कळविले. पण पाणी आवर्तन सुटलेच नाही. आणखी किमान १५ ते २० दिवसांनी आवर्तन सुटणार असल्याची चर्चा आहे. आणखी काही दिवस येवलेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची स्थिती दिसत आहे. पालिकेच्या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे पोटदुखीचे आजार वाढले आहेत. अशुद्ध पाण्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आले आहे. याचेही कोणाला सोयरसुतक नाही. पाणीटंचाई सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.२०० विहिरीतून पाण्याचा उपसापालखेड पाणी आवर्तनाने शहर साठवण तलावात भरलेले ४० दलघफूट पाणी मार्चअखेर पुरणार होते. शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही पाणी पुरायलाच हवे. पण पाच दिवसाआड पाणीपुरवठा करूनही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच पाणी संपुष्टात येते. हे नेमके गणित कायम बिघडले आणि ते कुठे बिघडते. हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. वर्षभरासाठी पाणीपट्टी आकारून शहराला घरटी पाच दिवसाआड पाणी मिळते. खासगी पाण्याचे टँकर राजकीय वरदहस्ताने साठवण तलावालगतच्या विहिरीवरून सर्रासपणे भरले जात असल्याची चर्चा आहे. शिवाय सभोवतालच्या सुमारे २०० विहिरीतून होणारा अमर्याद उपसा, पालिकेचे पाणीवाटपाचे ढिसाळ नियोजन यामुळे शहरात पाणीटंचाई आहे.