शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

येवलेकरांचा घसा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 01:15 IST

येवला : शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून, पाच दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिटे अपुरा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.

ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाई : चार दिवसांआड १५ मिनिटे अशुद्ध पाणीपुरवठा

येवला : शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून, पाच दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिटे अपुरा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.सोमवारी तर मध्यवस्तीसह अनेक भागात पाणीपुरवठाच झाला नसल्याचे नागरिक सांगत आहेत. आवर्तन मिळण्यासाठी कागदोपत्री श्रेयवादाचेही प्रयत्न झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १ मार्चला आवर्तन सोडणार असल्याचे लेखी आश्वासनदेखील मिळाले. अद्यापपावेतो पाणी आलेच नाही. आता १० मार्चच्या पुढे पाणी मिळणार असल्याची चर्चा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची क्षमता ५० दलघफुटाची आहे. परंतु वारेमाप अनधिकृत पाणी उपसा आणि अयोग्य वितरण व्यवस्था यामुळे चार योजना राबवूनही येवलेकरांचा घसा कोरडाच राहत असल्याचा टाहो अनेकदा फोडला जातो. पालखेड डाव्या कालव्याचे पाणी आवर्तन मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेला पत्राद्वारे कळविले. पण पाणी आवर्तन सुटलेच नाही. आणखी किमान १५ ते २० दिवसांनी आवर्तन सुटणार असल्याची चर्चा आहे. आणखी काही दिवस येवलेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची स्थिती दिसत आहे. पालिकेच्या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे पोटदुखीचे आजार वाढले आहेत. अशुद्ध पाण्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आले आहे. याचेही कोणाला सोयरसुतक नाही. पाणीटंचाई सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.२०० विहिरीतून पाण्याचा उपसापालखेड पाणी आवर्तनाने शहर साठवण तलावात भरलेले ४० दलघफूट पाणी मार्चअखेर पुरणार होते. शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही पाणी पुरायलाच हवे. पण पाच दिवसाआड पाणीपुरवठा करूनही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच पाणी संपुष्टात येते. हे नेमके गणित कायम बिघडले आणि ते कुठे बिघडते. हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. वर्षभरासाठी पाणीपट्टी आकारून शहराला घरटी पाच दिवसाआड पाणी मिळते. खासगी पाण्याचे टँकर राजकीय वरदहस्ताने साठवण तलावालगतच्या विहिरीवरून सर्रासपणे भरले जात असल्याची चर्चा आहे. शिवाय सभोवतालच्या सुमारे २०० विहिरीतून होणारा अमर्याद उपसा, पालिकेचे पाणीवाटपाचे ढिसाळ नियोजन यामुळे शहरात पाणीटंचाई आहे.