शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

होय, नोटाबंदी फसलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:01 IST

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्या आणि देशवासीयांना धक्का बसला. मात्र, त्याचवेळी नोटाबंदी ही दहशतवाद्यांना होणारी मदत रोखणारी आणि काळा पैसा असणाºयांसाठी कशी रामबाण ठरेल असे त्यांनी ठासून सांगितल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढला आणि बॅँकेत उभे राहणाºयांनीही देशासाठी एक दिवस रांगेत उभे राहिले तर गैर काय, असा प्रश्न करून नोटाबंदीचे समर्थन केले होते. याच नोटाबंदीच्या घोषणेची वर्षपूर्ती होत असताना मात्र नोटाबंदीच्या समर्थनात घसरण झालेली दिसते आहे.

नाशिक : गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्या आणि देशवासीयांना धक्का बसला. मात्र, त्याचवेळी नोटाबंदी ही दहशतवाद्यांना होणारी मदत रोखणारी आणि काळा पैसा असणाºयांसाठी कशी रामबाण ठरेल असे त्यांनी ठासून सांगितल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढला आणि बॅँकेत उभे राहणाºयांनीही देशासाठी एक दिवस रांगेत उभे राहिले तर गैर काय, असा प्रश्न करून नोटाबंदीचे समर्थन केले होते. याच नोटाबंदीच्या घोषणेची वर्षपूर्ती होत असताना मात्र नोटाबंदीच्या समर्थनात घसरण झालेली दिसते आहे.‘लोकमत’ने यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात नोटाबंदीचे कट्टर समर्थन करणाºयांची मानसिकता बदलल्याचे दिसून आले. विशेषत: नोटाबंदीनंतर जितकी रक्कम चलनात होती, तितकीच जमा झाल्याने त्यातून फार मोठे काळे धन हाती पडल्याचे दिसले नाही, त्यामुळेच ही नोटाबंदी फसवी असल्याचे मत सर्वेक्षणात आढळून आले. अर्थात, पंतप्रधानांनी प्रयत्न केलेत असेही मत सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आले, तर काहींनी नोटाबंदीचा भाजपाच्या नेत्यांनाच फायदा झाला, असा सरळ सरळ आरोपही केला. लोकमतने या सर्वेक्षणाअंतर्गत विविध क्षेत्रांतील शंभर व्यक्तींशी संपर्क साधून त्यांचे मत जाणून घेतले आणि त्यांना तीन प्रश्न केले. त्यानुसार नोटांबदी यशस्वी झाली असे वाटते काय, या प्रश्नावर ५५ टक्के लोकांनी नकारात्मक मत व्यक्त केले, तर ४५ टक्के लोकांनी यशस्वी झाल्याचा दावा केला.नोटाबंदीमुळे भविष्यात भ्रष्टाचार बंद होईल काय, या विषयावर तर सपशेल नकारार्थी मत नोंदविण्यात आले आहे. ८० टक्के नागरिकांनी भ्रष्टाचार थांबणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. नोटाबंदीमुळे कॅशलेस व्यवहार वाढल्याचा दावा केला गेला. तो खरा असला तरी अजूनही शंभर टक्के नागरिकांची कॅशलेस व्यवहाराची मानसिकता नाही. तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करण्यात येणारा अडसर आणि आॅनलाइनमुळे खरोखरच व्यवहार विश्वासार्ह होईल असे वाटत नसल्याचे मत सर्वेक्षणात सहभागी नागरिकांनी व्यक्त केले. आॅनलाइन व्यवहारात वाढ झाल्याचे मत एकूण ६० टक्के लोकांनी नोंदवले, तर चाळीस टक्के नागरिकांनी त्याकडे वळलो नसल्याचे सांगितले.