शहरं
Join us  
Trending Stories
1
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
2
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
3
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
4
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
5
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
6
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
7
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
8
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
9
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
10
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
11
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
12
स्मार्टफोनची बॅटरी धडाधड उतरतेय? पटकन ऑन करा 'या' ५ सेटिंग्स; बॅटरीची होईल दुप्पट बचत
13
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
14
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
15
U19 World Cup 2026 Schedule : ICC चा मोठा निर्णय; वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या गटातून पाकिस्तान बाहेर
16
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
17
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
18
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
19
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
20
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

येवला-विंचूर चौफुलीवर वाहतुकीची कोंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:59 IST

येवला : शहरातून जाणारा मनमाड - नगर राज्य महामार्गावर दिवसातून अनेकदा होणारी वाहतूक कोंडी आता डोकेदुखीचा विषय बनली आहे.नगर - मनमाड आणि नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गांचा शहरातील विंचूर चौफुलीजवळ असलेला संगम लक्षात घेता या महामार्गावरून धावणारी शेकडो वाहने, त्यातून होणारा वाहतुकीचा मोठा खोळंबा चिंतेचा विषय बनला आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली असून वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे.

ठळक मुद्दे लग्नसराईचा फटका : कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

येवला : शहरातून जाणारा मनमाड - नगर राज्य महामार्गावर दिवसातून अनेकदा होणारी वाहतूक कोंडी आता डोकेदुखीचा विषय बनली आहे.नगर - मनमाड आणि नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गांचा शहरातील विंचूर चौफुलीजवळ असलेला संगम लक्षात घेता या महामार्गावरून धावणारी शेकडो वाहने, त्यातून होणारा वाहतुकीचा मोठा खोळंबा चिंतेचा विषय बनला आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली असून वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे.येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरु ज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील विंचूर चौफुली व फत्तेबुरु ज नाका येथे सकाळी दहा वाजल्यापासून ट्रॅॅफिक जाम सुरु झाला. याच मार्गाने एक वरिष्ठ अधिकारी जात होते. ते देखील या ट्रॅॅफिक जामच्या विळख्यात सापडले. मात्र यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकाने १५ ते २० मिनिटे थांबून वाहतूक सुरळीत केली. मात्र त्या साहेबांची गाडी गेल्यानंतर अवघ्या दोन तीन मिनिटात पुन्हा ट्रॅफिक जॅम झाली. रस्त्याच्या दोनही बाजूंनी दोन ते तीन किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. याकरिता पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन येथे कर्मचारी नियुक्ती करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रि या यावेळी उमटत होत्या.नगर व औरंगाबाद येथून नाशिकला जाणारी वाहने येवला विंचूर चौफुलीवरील वाहतुकीच्या कोंडीत सापडत आहेत. त्यातच शहरात लावलेल्या अभिनंदनाच्या फलकांचा अडथळा होत असल्याने नाशिक रस्त्याकडे कसे वळावे हेच समजत नाही. प्रवाशी आणि माल वाहतूक करणाºया गाड्या येथे उभ्या राहतात. अनेकदा मोठ्या गाड्यांना वळणदेखील घेता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.शहरातील तीनही चौफुलींवर वाहतूक पोलीस २४ तास आवश्यक आहे. येथे पोलीस चौकी असून नसल्यासारखी आहे. येवला-विंचूर चौफुलीवर अनेकदा वाहनचालकांना खाली उतरून वाहतुकीचे नियमन करावे लागते. वास्तविक पाहता येवला-विंचूर चौफुलीवर वाहतूक सिग्नलची अत्यंत आवश्यकता आहे. चौफुलीवर मध्यभागी पोलिसांना वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शेड नाही. त्यामुळे पोलीसदेखील याठिकाणी वाहतूक नियमनासाठी उभे राहू शकत नाही. या साºया वाहतुकीच्या कोंडीतून व अडथळ्यांमधून येवलेकरांची सुटका कोण करील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वळण मार्गावर सिग्नल नसल्याने नाराजीयेवला विंचूर चौफुलीसह पारेगाव रस्त्याच्या वळण मार्गावर वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक दिवसांची मागणी आहे. या मार्गावरून महाविद्यालयाकडे जाणारी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या रस्त्यावर झेब्रा क्र ॉसिंग सह सिग्नल बसवावेत अशी मागणी अनेकदा करण्यात आली, तरीदेखील दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.