शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

येवला-विंचूर चौफुलीवर वाहतुकीची कोंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:59 IST

येवला : शहरातून जाणारा मनमाड - नगर राज्य महामार्गावर दिवसातून अनेकदा होणारी वाहतूक कोंडी आता डोकेदुखीचा विषय बनली आहे.नगर - मनमाड आणि नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गांचा शहरातील विंचूर चौफुलीजवळ असलेला संगम लक्षात घेता या महामार्गावरून धावणारी शेकडो वाहने, त्यातून होणारा वाहतुकीचा मोठा खोळंबा चिंतेचा विषय बनला आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली असून वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे.

ठळक मुद्दे लग्नसराईचा फटका : कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

येवला : शहरातून जाणारा मनमाड - नगर राज्य महामार्गावर दिवसातून अनेकदा होणारी वाहतूक कोंडी आता डोकेदुखीचा विषय बनली आहे.नगर - मनमाड आणि नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गांचा शहरातील विंचूर चौफुलीजवळ असलेला संगम लक्षात घेता या महामार्गावरून धावणारी शेकडो वाहने, त्यातून होणारा वाहतुकीचा मोठा खोळंबा चिंतेचा विषय बनला आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली असून वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे.येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरु ज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील विंचूर चौफुली व फत्तेबुरु ज नाका येथे सकाळी दहा वाजल्यापासून ट्रॅॅफिक जाम सुरु झाला. याच मार्गाने एक वरिष्ठ अधिकारी जात होते. ते देखील या ट्रॅॅफिक जामच्या विळख्यात सापडले. मात्र यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकाने १५ ते २० मिनिटे थांबून वाहतूक सुरळीत केली. मात्र त्या साहेबांची गाडी गेल्यानंतर अवघ्या दोन तीन मिनिटात पुन्हा ट्रॅफिक जॅम झाली. रस्त्याच्या दोनही बाजूंनी दोन ते तीन किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. याकरिता पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन येथे कर्मचारी नियुक्ती करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रि या यावेळी उमटत होत्या.नगर व औरंगाबाद येथून नाशिकला जाणारी वाहने येवला विंचूर चौफुलीवरील वाहतुकीच्या कोंडीत सापडत आहेत. त्यातच शहरात लावलेल्या अभिनंदनाच्या फलकांचा अडथळा होत असल्याने नाशिक रस्त्याकडे कसे वळावे हेच समजत नाही. प्रवाशी आणि माल वाहतूक करणाºया गाड्या येथे उभ्या राहतात. अनेकदा मोठ्या गाड्यांना वळणदेखील घेता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.शहरातील तीनही चौफुलींवर वाहतूक पोलीस २४ तास आवश्यक आहे. येथे पोलीस चौकी असून नसल्यासारखी आहे. येवला-विंचूर चौफुलीवर अनेकदा वाहनचालकांना खाली उतरून वाहतुकीचे नियमन करावे लागते. वास्तविक पाहता येवला-विंचूर चौफुलीवर वाहतूक सिग्नलची अत्यंत आवश्यकता आहे. चौफुलीवर मध्यभागी पोलिसांना वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शेड नाही. त्यामुळे पोलीसदेखील याठिकाणी वाहतूक नियमनासाठी उभे राहू शकत नाही. या साºया वाहतुकीच्या कोंडीतून व अडथळ्यांमधून येवलेकरांची सुटका कोण करील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वळण मार्गावर सिग्नल नसल्याने नाराजीयेवला विंचूर चौफुलीसह पारेगाव रस्त्याच्या वळण मार्गावर वाहतूक सिग्नल बसवावेत अशी अनेक दिवसांची मागणी आहे. या मार्गावरून महाविद्यालयाकडे जाणारी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या रस्त्यावर झेब्रा क्र ॉसिंग सह सिग्नल बसवावेत अशी मागणी अनेकदा करण्यात आली, तरीदेखील दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.