शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात टोमॅटोवर करपा रोगाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST

जळगाव नेऊर : कांद्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या टोमॅटो पिकावर जीवाणूजन्य करपा रोगाने आक्रमण केल्याने, उत्पादनाच्या उंबरठ्यावर हजारो ...

जळगाव नेऊर : कांद्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या टोमॅटो पिकावर जीवाणूजन्य करपा रोगाने आक्रमण केल्याने, उत्पादनाच्या उंबरठ्यावर हजारो हेक्‍टरवरील टोमॅटो पीक संकटात सापडले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

येवला तालुक्‍यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली असून, साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून येथील टोमॅटोची राज्यात व राज्याबाहेर विक्री सुरू होते, पण गेली दहा-बारा दिवसांपासून कधी रिमझिम पाऊस, तर कधी जोराचा पाऊस, तर कधी उष्ण, दमट वातावरणाने टोमॅटो पिकावर जीवाणूजन्य करपा रोगाने आक्रमण केल्याने टोमॅटो पीक संकटात सापडले आहे. पाने, फांद्या, फळांवर काळे ठिपके पडल्याने फेकून देण्याची वेळ आली आली असल्याने, शेतकऱ्यांची वाट बिकट झाली आहे. मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकावर जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पाने करपत असून, फळांवर काळे ठिपके पडले असून, तालुक्‍यातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा टोमॅटो पिकावरील खर्चात वाढ झाली असून, मोठ्या प्रमाणात औषधांचा खर्च वाढत आहे

---------------------

पिके करपली

जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव पानावर फांद्यांवर व फळांवर झाल्यामुळे प्रत खराब होत असते. दररोज पडणाऱ्या पावसाच्या सरीमुळे औषधेही वाया जात असून, मोठ्या प्रमाणात खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे, मोठ्या संकटातून वाचविलेले टोमॅटो पीक करपत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

-----------

क्षेत्र वाढले, खर्चात वाढ

येवला तालुक्‍यात या वर्षी टोमॅटो लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्या बरोबरच टोमॅटो पीक उभे करण्यासाठी लागणारे साहित्य तार, बांबू, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संच, मजुरी यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने टोमॅटो पीक खर्चिक बनत चालले आहेत.

---------------

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मशागत करून, खते टाकून पेपर अंथरून दीड एकरावर टोमॅटो लागवड केली, पण गेली दहा-बारा दिवसांपासून दिवसापासून कधी रिमझिम पाऊस, कधी जोराचा पाऊस तर कधी, उष्ण, दमट वातावरण, यामुळे टोमॅटोवर जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडावर करपा येऊन, फळांवर काळे डाग पडल्याने, मोठ्या प्रमाणात औषधांच्या फवारण्या कराव्या लागत असल्याने, हजारो रुपये खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

- शांताराम मढवई, टोमॅटो उत्पादक

--------------

जळगाव नेऊर (२४ जळगाव नेऊर)

240721\24nsk_4_24072021_13.jpg

२४ जळगाव नेऊर