शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात पाऊस नसल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:58 IST

अंदरसुल :येवला तालुक्यात पावसाळा संपत आला तरी वरु णराजा बरसला नसल्याने आता बळीराजा हतबल झाला आहे. टमाटा आणि कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे पाऊस न आल्याने अंदरसुल व उत्तरपूर्व भागातील कमी पावसात लागवड केलेली पिके मका कापूस सोयाबीन मूग भुईमूग ही खरिपाची पिके आज वाया गेली असून शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

अंदरसुल :येवला तालुक्यात पावसाळा संपत आला तरी वरु णराजा बरसला नसल्याने आता बळीराजा हतबल झाला आहे. टमाटा आणि कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.तालुक्यात एकमेव नगदी पीक म्हणून घेतले जाणारे कांदा हा सद्या मातीमोल भावाने विकला जात आहे. काही वेळेला थोडा भाव जास्त मिळाला म्हणजे सर्व आलबेल आहे असा प्रचार होत असतो. वास्तविक कांदा हा शेतकरी प्रसंगी कर्ज घेऊन महागडी रोपे व खते खरेदी करून सात ते आठ हजार रु पये एकरी मजुरी देऊन उत्पन्न घेतात. भावाची हमी नसते मजुरीइतके दाम मिळत नाही. डाळिंब टमाटे मातीमोल भावाने विकले जात आहे. दमदार पाऊस न झाल्याने विहिरींना पाणी नाही तालुक्यातील पूर्वेकडील नद्या कोरड्या आहेत उष्णतेची तीव्रता जास्त झाल्याने कालव्याच्या जुजबी पाण्याने ओल्या झालेल्या जमिनी खड्डे नाले कोरडी झाली आहेत.खरीप हातचा जात असून रब्बीच्या पिके कशी घेता येतील याची विवंचनेत बळीराजा संकटांना सामोरे जाऊ शकत नसल्याचे चित्र दिसत आहे .