शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

येवला : तालुक्यातील शेतकरी अडचणीत‘प्रहार’चे विमा कंपनी अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:51 IST

येवला : तालुक्यातील पीकविमा नुकसानीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, या मागणीचे निवेदन विमा कंपनीच्या संबंधित अधिकाºयाला देण्यात आले आहे. कार्यवाही न झाल्यास विमा कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

ठळक मुद्देविमा कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

येवला : तालुक्यातील पीकविमा नुकसानीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, या मागणीचे निवेदन विमा कंपनीच्या संबंधित अधिकाºयाला देण्यात आले आहे. कार्यवाही न झाल्यास विमा कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.येवला तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात सन २०१७ - १८ सालातील पीकविम्याचे दावे मंजूर होऊनही विमा कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून, शेतकºयांना भांडवलाची अत्यंत गरज आहे; मात्र विमा कंपनीने अद्यापही नुकसानभरपाई न दिल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला आहे.कंपनीकडून शेतकºयांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपासले आहे.याप्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, उपाध्यक्ष वसंतराव झांबरे, तालुका सरचिटणीस रामभाऊ नाईकवाडे, किरण चरमळ, सागर गायकवाड, योगेश चव्हाणके, भागवत भड, बाळासाहेब बोराडे, नारायण घोटेकर, संदीप कोकाटे, ज्ञानेश्वर वाघ, किरण गायकवाड, मारु ती मापारी, रवि कदम आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.भरपाई देण्यास टाळाटाळयेवला तालुक्यात हजारो शेतकरी दरवर्षी न चुकता पीकविम्याचा हप्ता संबंधित कंपनीकडे अदा करतात. मात्र, आजपर्यंत एकाही शेतकºयाला नुकसानभरपाई मिळाल्याचे ऐकिवात नाही. गतवर्षी पडलेल्या भयानक दुष्काळाने शेतकरी होरपळलेला असताना विमा कंपनीने या शेतकºयांना आधार देण्याची गरज असताना संबंधित विमा कंपनी मात्र आर्थिक भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे.