शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

येवला : पालखेड डावा कालव्याच्या पाणी वितरणात दुजाभाव पाणीवापर सोसायट्या पाण्यापासूनच वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:08 IST

येवला : पालखेड डावा कालव्याच्या दुसºया आवर्तनाचा खेळखंडोबा झाला असून, जेथे पाणी हवे तेथे ते पोहचले नसून, नको तेथे शेतात तळे साचले आहे.

ठळक मुद्देउशिरा सोडलेल्या आवर्तनाने शेतकरी हवालदिल धरणे दिले तरी पाणीवाटपाचा घोळ

येवला : पालखेड डावा कालव्याच्या दुसºया आवर्तनाचा खेळखंडोबा झाला असून, जेथे पाणी हवे तेथे ते पोहचले नसून, नको तेथे शेतात तळे साचले आहे. त्यामुळे कित्येक शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. जलयुक्त शेत हे नवीनच धोरण कालवा प्रशासनाने वापरल्याची बाब उघड झाली आहे. पालखेड लाभ क्षेत्राखालील वितरिका क्र. ३५ आठमाही असून, तिला पाणी नाही. त्याबरोबरच अनेक संस्थांना अजून पाणी मिळालेले नाही. उशिरा सोडलेल्या आवर्तनाने शेतकरी हवालदिल झाला आहे. चालू हंगाम रब्बीसाठी पालखेडचे दुसरे आवर्तन दि. १ फेब्रुवारी रोजी ठरलेले असताना ८ फेब्रुवारी रोजी सोडण्यात आले. यंदा १०० टक्के धरणे टक्के धरणे भरलेली असतानासुद्धा कमी दिवसाचे आवर्तन देण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण पाणी मिळेल की नाही या शंकेने शेतकºयांनी उचल खाल्ली. जिल्हाधिकाºयांना निवेदने दिली, पालखेडच्या जळगाव नेऊर कार्यालयासमोर धरणे दिले तरी पाणीवाटपाचा घोळ सुरूच आहे. अनेक पाणीवापर संस्थांना अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. तरी कालवा प्रशासनाने नको तेथील पाणी बंद करून शेतकºयांना समान न्यायाने सर्वांना पाणी उपलब्ध करून द्यावे. शेतात पाणी सोडून कालव्याच्या आवर्तनामधून भूजल पातळी कशी वाढवायचे धडे भाजपा सरकारच्या काळात दिले जात असल्याची चर्चा शेतकरी करू लागले आहेत. भाजपाचे जलयुक्त शिवार अभियान २०० टक्के यशस्वी झाल्याचे चित्र पूर्णत्वास जात आहे.