शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

पिवळी पिके हे दाहक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:10 IST

नांदगाव : इतरत्र जास्त पावसाने पिके पिवळी पडलेली दिसत असली तरी नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी पिवळी पडलेली पिके हे दाहक वास्तव आहे. दुष्काळाला सामोरे जात असलेल्या जनतेविषयी अधिकाऱ्यांनी सजग असायला हवे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देहरिश्चंद्र चव्हाण : नांदगावला झालेली आढावा बैठक वादळी

 

 

नांदगाव : इतरत्र जास्त पावसाने पिके पिवळी पडलेली दिसत असली तरी नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी पिवळी पडलेली पिके हे दाहक वास्तव आहे. दुष्काळाला सामोरे जात असलेल्या जनतेविषयी अधिकाऱ्यांनी सजग असायला हवे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.येथील पंचायत समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार संजय पवार,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार भारती सागरे, गटविकास अधिकारी जगनराव सूर्यवंशी, मुख्याधिकारी श्रिया देवचके, जिल्हा परिषद सदस्य आशाबाई जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, पंचायत समिती सदस्य मधुबाला खिरडकर, श्रावण गोºहे आदी व्यासपीठावर होते.आढावा बैठकीच्या निमित्ताने समस्याग्रस्त लोकांच्या समस्यांना वाचा फुटली. वीज वितरण कंपनीच्या वाढीव बिलांच्या रकमा, ४२ खेडी व ५६ खेडी पाणीपुरवठा योजनांमधील त्रुटी अशा अनेक समस्यांचा पाढा जनतेने खासदारांसमोर वाचला. जनतेतील प्रक्षोभ लक्षात घेता खासदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १० सप्टेंबरला होणाºया बैठकीत नांदगाव तालुक्यातील परिस्थितीकडे लक्ष वाढणार असल्याचे सांगितले.सामान्यांच्या प्रश्नांविषयी उदासीन राहून बैठकांना अनुपस्थित राहणाºया अधिकाºयांचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्याची सूचना चव्हाण यांनी तहसीलदार भारती सागरे यांना केली. अधिकारी काम करीत नसल्याने निर्माण होणाºया अडचणींचा मुद्दा माजी आमदार संजय पवार यांनी मांडून खासदारांनी त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली.मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी पालिकेने पाणीपट्टीचे पैसे भरल्यावरदेखील जिल्हा परिषदेकडून पाण्याचे आवर्तन उशिरा मिळते, ते तीन दिवसांनी मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत वीज वितरण विभागाच्या तक्रारींचा पाऊस पडला. त्यावर वीज वितरण विभागाच्या अधिकाºयांची भंबेरी उडाली. टँकर भरून द्याकेवळ ३८ टक्के पाऊस होऊनही ४० टक्के पिके चांगली आहेत. या कृषी अधिकाºयांच्या माहितीला नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला. तुरळक पाऊस झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करण्यात आले व ज्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो तो शुद्ध नसतो. त्यासाठी ५६ खेडी योजनेतून टँकर भरून देण्याची मागणी करण्यात आली.