शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

पिवळी पिके हे दाहक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:10 IST

नांदगाव : इतरत्र जास्त पावसाने पिके पिवळी पडलेली दिसत असली तरी नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी पिवळी पडलेली पिके हे दाहक वास्तव आहे. दुष्काळाला सामोरे जात असलेल्या जनतेविषयी अधिकाऱ्यांनी सजग असायला हवे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देहरिश्चंद्र चव्हाण : नांदगावला झालेली आढावा बैठक वादळी

 

 

नांदगाव : इतरत्र जास्त पावसाने पिके पिवळी पडलेली दिसत असली तरी नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी पिवळी पडलेली पिके हे दाहक वास्तव आहे. दुष्काळाला सामोरे जात असलेल्या जनतेविषयी अधिकाऱ्यांनी सजग असायला हवे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.येथील पंचायत समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार संजय पवार,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार भारती सागरे, गटविकास अधिकारी जगनराव सूर्यवंशी, मुख्याधिकारी श्रिया देवचके, जिल्हा परिषद सदस्य आशाबाई जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, पंचायत समिती सदस्य मधुबाला खिरडकर, श्रावण गोºहे आदी व्यासपीठावर होते.आढावा बैठकीच्या निमित्ताने समस्याग्रस्त लोकांच्या समस्यांना वाचा फुटली. वीज वितरण कंपनीच्या वाढीव बिलांच्या रकमा, ४२ खेडी व ५६ खेडी पाणीपुरवठा योजनांमधील त्रुटी अशा अनेक समस्यांचा पाढा जनतेने खासदारांसमोर वाचला. जनतेतील प्रक्षोभ लक्षात घेता खासदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १० सप्टेंबरला होणाºया बैठकीत नांदगाव तालुक्यातील परिस्थितीकडे लक्ष वाढणार असल्याचे सांगितले.सामान्यांच्या प्रश्नांविषयी उदासीन राहून बैठकांना अनुपस्थित राहणाºया अधिकाºयांचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्याची सूचना चव्हाण यांनी तहसीलदार भारती सागरे यांना केली. अधिकारी काम करीत नसल्याने निर्माण होणाºया अडचणींचा मुद्दा माजी आमदार संजय पवार यांनी मांडून खासदारांनी त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली.मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी पालिकेने पाणीपट्टीचे पैसे भरल्यावरदेखील जिल्हा परिषदेकडून पाण्याचे आवर्तन उशिरा मिळते, ते तीन दिवसांनी मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत वीज वितरण विभागाच्या तक्रारींचा पाऊस पडला. त्यावर वीज वितरण विभागाच्या अधिकाºयांची भंबेरी उडाली. टँकर भरून द्याकेवळ ३८ टक्के पाऊस होऊनही ४० टक्के पिके चांगली आहेत. या कृषी अधिकाºयांच्या माहितीला नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला. तुरळक पाऊस झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करण्यात आले व ज्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो तो शुद्ध नसतो. त्यासाठी ५६ खेडी योजनेतून टँकर भरून देण्याची मागणी करण्यात आली.