शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
4
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
5
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
6
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
7
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
8
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
9
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
10
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
11
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
12
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
13
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
14
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
15
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
16
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
17
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
18
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
19
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
20
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पिवळी पिके हे दाहक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:10 IST

नांदगाव : इतरत्र जास्त पावसाने पिके पिवळी पडलेली दिसत असली तरी नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी पिवळी पडलेली पिके हे दाहक वास्तव आहे. दुष्काळाला सामोरे जात असलेल्या जनतेविषयी अधिकाऱ्यांनी सजग असायला हवे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देहरिश्चंद्र चव्हाण : नांदगावला झालेली आढावा बैठक वादळी

 

 

नांदगाव : इतरत्र जास्त पावसाने पिके पिवळी पडलेली दिसत असली तरी नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी पिवळी पडलेली पिके हे दाहक वास्तव आहे. दुष्काळाला सामोरे जात असलेल्या जनतेविषयी अधिकाऱ्यांनी सजग असायला हवे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.येथील पंचायत समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार संजय पवार,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार भारती सागरे, गटविकास अधिकारी जगनराव सूर्यवंशी, मुख्याधिकारी श्रिया देवचके, जिल्हा परिषद सदस्य आशाबाई जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, पंचायत समिती सदस्य मधुबाला खिरडकर, श्रावण गोºहे आदी व्यासपीठावर होते.आढावा बैठकीच्या निमित्ताने समस्याग्रस्त लोकांच्या समस्यांना वाचा फुटली. वीज वितरण कंपनीच्या वाढीव बिलांच्या रकमा, ४२ खेडी व ५६ खेडी पाणीपुरवठा योजनांमधील त्रुटी अशा अनेक समस्यांचा पाढा जनतेने खासदारांसमोर वाचला. जनतेतील प्रक्षोभ लक्षात घेता खासदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १० सप्टेंबरला होणाºया बैठकीत नांदगाव तालुक्यातील परिस्थितीकडे लक्ष वाढणार असल्याचे सांगितले.सामान्यांच्या प्रश्नांविषयी उदासीन राहून बैठकांना अनुपस्थित राहणाºया अधिकाºयांचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्याची सूचना चव्हाण यांनी तहसीलदार भारती सागरे यांना केली. अधिकारी काम करीत नसल्याने निर्माण होणाºया अडचणींचा मुद्दा माजी आमदार संजय पवार यांनी मांडून खासदारांनी त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली.मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी पालिकेने पाणीपट्टीचे पैसे भरल्यावरदेखील जिल्हा परिषदेकडून पाण्याचे आवर्तन उशिरा मिळते, ते तीन दिवसांनी मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत वीज वितरण विभागाच्या तक्रारींचा पाऊस पडला. त्यावर वीज वितरण विभागाच्या अधिकाºयांची भंबेरी उडाली. टँकर भरून द्याकेवळ ३८ टक्के पाऊस होऊनही ४० टक्के पिके चांगली आहेत. या कृषी अधिकाºयांच्या माहितीला नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला. तुरळक पाऊस झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करण्यात आले व ज्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो तो शुद्ध नसतो. त्यासाठी ५६ खेडी योजनेतून टँकर भरून देण्याची मागणी करण्यात आली.