शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

यंदा त्र्यंबकेश्वरला मुबलक पाणी

By admin | Updated: February 27, 2017 01:02 IST

त्र्यंबकेश्वर : यावर्षी त्र्यंबकेश्वर शहरात पिण्याच्या पाण्याची स्थिती उत्तम असून, यंदाच्या वर्षी शहरात पाणीटंचाई भासणार नसल्याचा अंदाज नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी व्यक्त केला आहे.

त्र्यंबकेश्वर : यावर्षी त्र्यंबकेश्वर शहरात पिण्याच्या पाण्याची स्थिती उत्तम असून, यंदाच्या वर्षी शहरात पाणीटंचाई भासणार नसल्याचा अंदाज नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी व्यक्त केला आहे. त्र्यंबकेश्वरमधील जलाशय दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच आटू लागतात; यावर्षी फेब्रुवारी अखेरही तीनही जलाशयात पाण्याचा भरपूर साठा असल्याचे दिसून येते. अहल्या धरण, अंबोली धरण व गौतमी-गोदावरी प्रकल्पातील त्र्यंबकेश्वर शहरासाठी राखून ठेवलेला पाणीसाठा भरपूर असल्याने पाणीटंचाई भासणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लढ्ढा यांनी अहल्या धरणाची खोली वाढविण्याचे काम हाती घेतले असून, नगरसेवकांनीही यात सहभाग नोंदविला आहे. पावसाळ्यात परिसरातील डोंगरांवरून वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर दगड, माती, कचरा धरणपात्रात येऊ नये म्हणून धरणापासून काही अंतरावर बांध घातले गेल्याने मागील वर्षी धरणातील पाणी स्वच्छ होते. मागील वर्षी पावसाचे प्रमाणदेखील जास्त होते. मागील आॅगस्ट महिन्यात सतत २/३ दिवस झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील सर्व जलाशय ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे यंदा पाण्याची स्थिती उत्तम आहे. बेझे धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग होत असून, याबाबत बेझेवासियांचीदेखील तक्र ार आहे. तथापि, संबंधित शाखा अभियंत्याच्या म्हणण्यानुसार त्र्यंबकेश्वरसाठी पाणी कमी पडणार नाही. शहराला यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असे म्हटले जात असले तरी खासगी व बेकायदा मोटारी लावून बेसुमार पाणी उपसा होत राहिला तर पाणीटंचाई नक्की भासणार आहे. शासनाने बेकायदा पाणी उपशाला पायबंद घालावा, अंबोली धरण ते त्र्यंबकेश्वर पाणीपुरवठा केंद्रापर्यंत लावण्यात आलेल्या एअर व्हॉल्हमधून होणारी गळती थांबवावी, पाणीबचतीसाठी नगराध्यक्ष विजया लढ्ढा, मुख्याधिकारी चेतना मानुरे केरु रे व पाणीपुरवठा सभापती यांनी आतापासूनच लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)