शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा त्र्यंबकेश्वरला मुबलक पाणी

By admin | Updated: February 27, 2017 01:02 IST

त्र्यंबकेश्वर : यावर्षी त्र्यंबकेश्वर शहरात पिण्याच्या पाण्याची स्थिती उत्तम असून, यंदाच्या वर्षी शहरात पाणीटंचाई भासणार नसल्याचा अंदाज नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी व्यक्त केला आहे.

त्र्यंबकेश्वर : यावर्षी त्र्यंबकेश्वर शहरात पिण्याच्या पाण्याची स्थिती उत्तम असून, यंदाच्या वर्षी शहरात पाणीटंचाई भासणार नसल्याचा अंदाज नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी व्यक्त केला आहे. त्र्यंबकेश्वरमधील जलाशय दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच आटू लागतात; यावर्षी फेब्रुवारी अखेरही तीनही जलाशयात पाण्याचा भरपूर साठा असल्याचे दिसून येते. अहल्या धरण, अंबोली धरण व गौतमी-गोदावरी प्रकल्पातील त्र्यंबकेश्वर शहरासाठी राखून ठेवलेला पाणीसाठा भरपूर असल्याने पाणीटंचाई भासणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लढ्ढा यांनी अहल्या धरणाची खोली वाढविण्याचे काम हाती घेतले असून, नगरसेवकांनीही यात सहभाग नोंदविला आहे. पावसाळ्यात परिसरातील डोंगरांवरून वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर दगड, माती, कचरा धरणपात्रात येऊ नये म्हणून धरणापासून काही अंतरावर बांध घातले गेल्याने मागील वर्षी धरणातील पाणी स्वच्छ होते. मागील वर्षी पावसाचे प्रमाणदेखील जास्त होते. मागील आॅगस्ट महिन्यात सतत २/३ दिवस झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील सर्व जलाशय ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे यंदा पाण्याची स्थिती उत्तम आहे. बेझे धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग होत असून, याबाबत बेझेवासियांचीदेखील तक्र ार आहे. तथापि, संबंधित शाखा अभियंत्याच्या म्हणण्यानुसार त्र्यंबकेश्वरसाठी पाणी कमी पडणार नाही. शहराला यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असे म्हटले जात असले तरी खासगी व बेकायदा मोटारी लावून बेसुमार पाणी उपसा होत राहिला तर पाणीटंचाई नक्की भासणार आहे. शासनाने बेकायदा पाणी उपशाला पायबंद घालावा, अंबोली धरण ते त्र्यंबकेश्वर पाणीपुरवठा केंद्रापर्यंत लावण्यात आलेल्या एअर व्हॉल्हमधून होणारी गळती थांबवावी, पाणीबचतीसाठी नगराध्यक्ष विजया लढ्ढा, मुख्याधिकारी चेतना मानुरे केरु रे व पाणीपुरवठा सभापती यांनी आतापासूनच लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)