शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यंदा अवघ्या अडीच हजार महिलांची शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:14 IST

कोरोनाच्या काळात संपूर्ण समाजमन तब्बल आठ ते दहा महिने घाबरलेले होते. कोरोनाचा विषाणू कोणत्या मार्गाने शरीरात प्रवेश करील ...

कोरोनाच्या काळात संपूर्ण समाजमन तब्बल आठ ते दहा महिने घाबरलेले होते. कोरोनाचा विषाणू कोणत्या मार्गाने शरीरात प्रवेश करील याची कोणतीही शाश्वती नसल्याने प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली. आरोग्य यंत्रणा त्यासाठी कार्यरत होतीच, परंतु या काळात कोणतीही जोखीम घेण्यास कोणीच तयार नसल्याने त्याचा परिणाम कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर झाला. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर दरवर्षी शस्त्रक्रियेसाठी होणारी महिलांची गर्दी रोडावली. तर आरोग्य यंत्रणेनेही जोखीम नको म्हणून अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी हात अखडता घेतला आहे. सन २०१९ मध्ये जिल्ह्याला देण्यात आलेले महिलांच्या शस्त्रक्रियेचे २६,९६८ उद्दिष्ट जवळपास ६८ टक्के पूर्ण झाले होते. त्यात १८४०६ महिलांनी स्वत:हून शस्त्रक्रिया करून घेतली तर त्याच बरोबर पुरूषांनीही पुढाकार घेतल्याने त्यांच्याही ८७५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कोरोनामुळे मात्र सन २०२०मध्ये हेच प्रमाण अवघ्या ९ टक्क्यांवर येऊन थांबले आहे.

----------------

एक नजर शस्त्रक्रियांवर

सन २०१९ - १८४०६ - महिलांनी केली नसबंदी

८७५ पुरूषांनी केली नसबंदी

सन २०२०- २४०४ महिलांनी केली नसबंदी

२०३ पुरूषांनी केली नसबंदी

-------------

नपुंसकत्वाची भीती

महिलांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत फारसा काही गैरसमज नसला तरी, अशा शस्त्रक्रियेतून महिलांची मुले जन्माला घालण्यापासून होणाऱ्या त्रासातून मुक्तता होत आहे. परंतु पुरूषांचे मात्र नसबंदीबाबत अनेक गैरसमज आहेत. नसबंदीने नपुंसकत्व येते त्याचबरोबर कामोत्तेजनावर परिणाम होतो. असा समज मोठ्या प्रमाणावर पसरविण्यात आल्यामुळे महिलांच्या तुलनेत पुरूषांच्या शस्त्रक्रिया अगदीच अल्प प्रमाणात होत आहेत.

---------------

कोरोनामुळे शस्त्रक्रियेत घट

कोरोनाच्या सुमारे आठ ते दहा महिन्यांच्या काळात संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत होती. त्यातच समाजात देखील एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणी धजावले नाही. आता मात्र हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांवर महिला व पुरूषांच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- डॉ. कपील आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी