शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

यंदा फक्त १ लाख ६९ हजार मूर्तींचे दान लक्षणिय घट: पर्यावरण जागृतीमुळे संकलन घटल्याचा मनपाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:51 IST

नाशिक- नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवांतर्गत गत वेळी २ लाख ३९ हजार गणेश मूर्तींचे दान स्विकारणाºया महापालिकेला यंदा फक्त १ लाख ३९ हजार मुर्तींचे दान मिळाले आहे. तथापि, नागरीकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती झाल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यात आल्या या व अन्य मूर्तींची घरोघरी तसेच कृत्रिम तलावात निर्गत केल्याने ...

नाशिक- नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवांतर्गत गत वेळी २ लाख ३९ हजार गणेश मूर्तींचे दान स्विकारणाºया महापालिकेला यंदा फक्त १ लाख ३९ हजार मुर्तींचे दान मिळाले आहे. तथापि, नागरीकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती झाल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यात आल्या या व अन्य मूर्तींची घरोघरी तसेच कृत्रिम तलावात निर्गत केल्याने संख्या घटली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.नाशिक मध्ये १९९७ मध्ये महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने विसर्जित मूर्तींचे दान प्रायोगिक तत्वावर स्विकारण्यास सुरूवात केली. पुढे गोदावरी नदीसह अन्य नद्यांचे प्रदुषण टाळण्यासाठी महापालिका त्यात सहभागी झाली. यानंतर अन्य संस्थाही सहभागी झाल्याने सातत्याने मूर्ती आणि निर्माल्य संकलनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २ लाख ३९ हजार मूर्तींचे संकलन करण्यात आले होते. त्यामुळे यंदा त्यापेक्षा अधिक संकलन होईल आणि मूर्ती संकलनाचा विक्रम प्रस्थापित होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. महापालिकेच्या बरोबरच विविध सेवाभावी संस्थांनी देखील यासंदर्भात आवाहन तर केलेच शिवाय मूर्ती विसर्जन स्थळांच्या ठिकाणी तसे मूर्ती स्विकृती केंद्रे उभारली होती. महापालिकेने २६ नैसर्गिक विसर्जन केंद्राच्या ठिकाणी मूर्तीदान स्विकारण्याची व्यवस्था केली होती. त्याच बरोबर २८ ठिकाणी कृत्रिम कुंडे तयार केली होती. नागरीकांच्या इच्छेनुसार कृत्रिम कुंडात विसर्जन करण्याची अथवा मूर्ती दानाची सोय करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी महापालिकेचे दहा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. शिवाय, स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. मात्र प्रत्यक्षात सहा विभाग मिळून १ लाख ६९ हजार ९५७ मूर्ती संकलीत करण्यात आल्या आहेत. मूर्ती संकलन घटण्यामागे महापालिकेने विविध कारणे दिली असून यंदा नागरीक पर्यावरण स्नेही झाल्यानेच शाडु मातीच्या मूर्तींचा वापर अधिक झाला, तसेच नागरीकांनी नदीपात्राशिवाय घरच्या घरी विसर्जन केले असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय निर्माल्य संकलनातही घट झाली आहे. यंदा १३१.६ टन निर्माल्य संकलीत करण्यात आले आहे. गेल्या वर्षी १६९ टन निर्माल्य संकलीत करण्यात आले होते.