शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

यंदा मान्सून जूनअखेर होणार सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:42 IST

नाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्दे हवामान तज्ज्ञांची माहिती : कमी सौर डागांमुळे दुष्काळ

नाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.महाराष्टÑात दुष्काळाचा दाह अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामानाचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी म्हटले आहे, २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील दोन वर्षे मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युतचुंबकीय क्षेत्रातदेखील बदल घडवून आणते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त. परिणामी, सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्ल्युअन्सेस डाटा अ‍ॅनालिसिस सेंटर (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची शक्यताही जोहरे यांनी वर्तविली आहे. सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य हा मान्सून हाकमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग व या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.पाणीकपातीचा निर्णय आवश्यकयंदा पुन्हा एकदा कडक दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. हिमालयात यंदा झालेली जास्त बर्फवृष्टी हादेखील दुष्काळाचा स्पष्ट इशारा आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी कपातीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास ती गंभीर चूक होऊ शकते. शासनाने त्यासाठी योग्य ते धोरण राबवून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजेत. मध्य भारतातही दुष्काळाची स्थिती तीव्र होऊ शकते, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.

हवामान तज्ज्ञांची माहिती : कमी सौर डागांमुळे दुष्काळयंदा मान्सून जूनअखेर होणार सक्रियनाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.महाराष्टÑात दुष्काळाचा दाह अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामानाचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी म्हटले आहे, २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील दोन वर्षे मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युतचुंबकीय क्षेत्रातदेखील बदल घडवून आणते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त. परिणामी, सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्ल्युअन्सेस डाटा अ‍ॅनालिसिस सेंटर (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची शक्यताही जोहरे यांनी वर्तविली आहे. सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य हा मान्सून हाकमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग व या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.पाणीकपातीचा निर्णय आवश्यकयंदा पुन्हा एकदा कडक दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. हिमालयात यंदा झालेली जास्त बर्फवृष्टी हादेखील दुष्काळाचा स्पष्ट इशारा आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी कपातीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास ती गंभीर चूक होऊ शकते. शासनाने त्यासाठी योग्य ते धोरण राबवून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजेत. मध्य भारतातही दुष्काळाची स्थिती तीव्र होऊ शकते, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.