शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

यंदा मान्सून जूनअखेर होणार सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:42 IST

नाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्दे हवामान तज्ज्ञांची माहिती : कमी सौर डागांमुळे दुष्काळ

नाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.महाराष्टÑात दुष्काळाचा दाह अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामानाचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी म्हटले आहे, २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील दोन वर्षे मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युतचुंबकीय क्षेत्रातदेखील बदल घडवून आणते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त. परिणामी, सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्ल्युअन्सेस डाटा अ‍ॅनालिसिस सेंटर (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची शक्यताही जोहरे यांनी वर्तविली आहे. सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य हा मान्सून हाकमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग व या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.पाणीकपातीचा निर्णय आवश्यकयंदा पुन्हा एकदा कडक दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. हिमालयात यंदा झालेली जास्त बर्फवृष्टी हादेखील दुष्काळाचा स्पष्ट इशारा आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी कपातीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास ती गंभीर चूक होऊ शकते. शासनाने त्यासाठी योग्य ते धोरण राबवून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजेत. मध्य भारतातही दुष्काळाची स्थिती तीव्र होऊ शकते, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.

हवामान तज्ज्ञांची माहिती : कमी सौर डागांमुळे दुष्काळयंदा मान्सून जूनअखेर होणार सक्रियनाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.महाराष्टÑात दुष्काळाचा दाह अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामानाचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी म्हटले आहे, २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील दोन वर्षे मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युतचुंबकीय क्षेत्रातदेखील बदल घडवून आणते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त. परिणामी, सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्ल्युअन्सेस डाटा अ‍ॅनालिसिस सेंटर (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची शक्यताही जोहरे यांनी वर्तविली आहे. सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य हा मान्सून हाकमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग व या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.पाणीकपातीचा निर्णय आवश्यकयंदा पुन्हा एकदा कडक दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. हिमालयात यंदा झालेली जास्त बर्फवृष्टी हादेखील दुष्काळाचा स्पष्ट इशारा आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी कपातीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास ती गंभीर चूक होऊ शकते. शासनाने त्यासाठी योग्य ते धोरण राबवून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजेत. मध्य भारतातही दुष्काळाची स्थिती तीव्र होऊ शकते, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.