शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

यंदा दीडशे टक्के पाऊस; जुन्या रस्त्यांची धूळधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:07 IST

पावसाचे दिवस अधिक : पालिकेकडून रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू नाशिक : शहरात पावसाची वार्षिक सरासरी असते सुमारे ७०० मि.मी. परंतु, यंदा चार महिन्यांत पाऊस पडला १०८४ मि.मी. सरासरी दीडशे टक्के पाऊस आणि त्यातही पावसाचे दिवस अधिक असल्याने त्याचा परिणाम शहरातील पाच ते दहा वर्षांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवर झाला असून, ठिकठिकाणी खड्डे पडून धूळधाण झाली आहे. आता महापालिकेने अशा रस्त्यांची सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून, दिवाळीनंतर रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

पावसाचे दिवस अधिक : पालिकेकडून रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू

नाशिक : शहरात पावसाची वार्षिक सरासरी असते सुमारे ७०० मि.मी. परंतु, यंदा चार महिन्यांत पाऊस पडला १०८४ मि.मी. सरासरी दीडशे टक्के पाऊस आणि त्यातही पावसाचे दिवस अधिक असल्याने त्याचा परिणाम शहरातील पाच ते दहा वर्षांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवर झाला असून, ठिकठिकाणी खड्डे पडून धूळधाण झाली आहे. आता महापालिकेने अशा रस्त्यांची सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून, दिवाळीनंतर रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.दरवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दुरवस्था होत आली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिकेमार्फत लगोलग तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांची डागडुजीही केली जाते. सर्वसाधारणपणे नाशिक शहरात पावसाळ्यात सुमारे ७०० मि.मी. पाऊस पडतो आणि गोदावरी नदीला फार तर दोन किंवा तीनदा पूर येतो. यंदा मात्र, १ जून ते २९ सप्टेंबर २०१७ या कालावधीत १०८४ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजेच सरासरी दीडशे ते पावणेदोनशे टक्के पाऊस झाला आहे. शिवाय, यंदा फार कमी दिवस पावसाने उघडीप दिली असून, गोदावरी नदीलाही यंदा सुमारे सहा ते सात वेळा पूर येऊन गेला आहे. पावसाचे दिवस अधिक असल्याने यंदा त्याचा सर्वाधिक फटका पाच ते दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्यांना बसल्याचा दावा महापालिकेचे शहर अभियंता उत्तम पवार यांनी केला आहे. अशा रस्त्यांचे प्रभागनिहाय सर्वेक्षण आता महापालिकेने सुरू केले आहे. या सर्वेक्षणात ज्याठिकाणी ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी, केबल टाकण्यासाठी अथवा पाणीपुरवठ्याची लाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले असतील, त्यांचीही नोंद घेतली जाणार आहे.रस्ता दुरुस्ती ठेकेदारामार्फततीन वर्षांच्या आतील ज्या रस्त्यांची दुरवस्था झालेली असेल, त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराचीच आहे. महापालिकेकडून संबंधित ठेकेदारांकडून सदर रस्त्यांची कामे करून घेतली जातील, असे शहर अभियंता उत्तम पवार यांनी सांगितले. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे हाती घेतली जातील. सततच्या पावसामुळे यंदा खड्डे बुजविण्यात अडथळे आले.