शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

अन्न सुरक्षा योजनेसाठीच्या लढ्याला यश

By admin | Updated: September 20, 2015 22:42 IST

अन्न सुरक्षा योजनेसाठीच्या लढ्याला यश

न्यायडोगंरी : नांदगाव तालुक्यातील पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अन्न सुरक्षा योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित ठेवण्यात आल्याने याबाबत सतत दोन वर्षांपासून पाठपुरावा करून पुकारलेल्या लढ्यास अखेर यश प्राप्त झाले आहे. नवीन २२८४ लाभार्थ्यांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आल्याने न्यायडोंगरीकरांनी समाधान व्यक्त केले आहे. अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ लोकसंख्येच्या ७६:३२ टक्के लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतात. सन २०११ च्या गावच्या लोकसंख्येनुसार न्यायडोंगरी गावाची लोकसंख्या ९०९० असताना वरील टक्केवारीनुसार ७०१३ लाभार्थी लाभ घेण्यास पात्र असताना नांदगावच्या पुरवठा विभागाकडून मात्र फक्तचार हजार सातशे एकोणतीस लाभार्थ्यांनाच लाभ देण्यात येत होता. याविरुद्ध गेल्या दोन वर्षांपासून सतत पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांनी पाठपुरावा केला आहे. नांदगाव पुरवठा विभाग मात्र वेळकाढूपणा करीत असल्याने अखेर मोरे यांनी सदरची तफावत सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तातडीने दखल घेत नांदगाव पुरवठा विभागाची चांगलीच कानउघडणी केली. नांदगावच्या तहसीलदार पु. न. दंडिले यांनी शशिकांत मोरे यांना व पुरवठा विभागाचे अधिकारी विजय थोरात, स्वस्त धान्य दुकान गोकुळ राठोड, गणेश पाटील यांना समोरासमोर बोलवून संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली. त्या २२८४ लाभार्थी लाभापासून वंचित असल्याची बाब उघड होताच पुरवठा खोतेचे पत्र क्रमांक २९८/२०१५ नुसार अगोदर पात्र ठरविण्यात आले़(वार्ताहर)