शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चूक शासनाची, वेठीला धरला शेतकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:13 IST

संजीव धामणे, नांदगाव : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान चुकीने दोनदा बँकेत संबंधित लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. ...

संजीव धामणे, नांदगाव : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान चुकीने दोनदा बँकेत संबंधित लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. ‘ते’ अतिरिक्त अनुदान वसूल करण्यासाठी बँकेस दिलेल्या शासकीय पत्राचा अन्वयार्थ काढण्यात झालेल्या गडबडीमुळे, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडची प्रधानमंत्री किसान योजनेची रक्कम देण्यात आलेली नाही. यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे.

अवकाळी अनुदानाचा राज्य शासनाशी संबंध आहे तर प्रधानमंत्री किसान योजनेचा केंद्र सरकारशी संबंध आहे. अवकाळीचे अनुदान दोनदा बँक खात्यात चुकून वर्ग झाल्याने त्याची वसुली करण्यासाठी तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी आयडीबीआय बँकेला पत्र दिले. पत्रात ‘डबल’ झालेली रक्कम वसूल करण्यासाठी खात्यातून रक्कम काढण्यावर निर्बंध घालण्यात आल्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिल्या. दरम्यान, प्रधानमंत्री किसान योजनेचे २००० रुपये खात्यावर जमा झाले. आयडीबीआय बँकेच्या सूचनेवरून ग्रामीण महाराष्ट्र बँकेने सदरचे पैसे देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांपुढे प्रश्न चिन्ह उभे राहिले. बँकेपुढे असाच पेच निर्माण झाला. एकीकडे राज्य शासनाचे अवकाळी नुकसानीचे चुकून दुप्पट दिलेले अनुदान वसूल करावयाचे तर दुसरीकडे केंद्र सरकारने आयकर भरणारे व इतर उत्पन्नाची साधने असलेल्या शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री योजनेच्या खात्यात वर्ग झालेला निधी वसूल करून शासनाला भरावयाचा. यामुळे बँकेकडून, डबल अनुदान न मिळालेले व उत्पन्नाच्या इतर साधनांचा स्रोत नाही, अशा खातेधारक शेतकऱ्यांनांही खात्यातून पैसे काढण्यास आडकाठी केली गेली. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

इन्फो

...ही आहे शेतकऱ्यांची भूमिका!

अवकाळी अनुदानाची खात्यावर अतिरिक्त जमा झालेली रक्कम कमाईच्या स्रोतामधून वसूल करण्यात आली तर त्यास शेतकऱ्यांचा आक्षेप नाही. मात्र प्रधानमंत्री योजनेतून मिळणारी रक्कम अनुदान आहे. तो प्राप्तीचा स्रोत नाही. म्हणून ती रक्कम रोखता येणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

कोट....

माझ्या खात्यावर अवकाळीचे अनुदान जमा नाही. तसेच इतर उत्पन्नाची साधने नाहीत. तरीही प्रधानमंत्री किसान योजनेचे पैसे काढण्यास बँक तहसीलदारांच्या पत्राचा हवाला देऊन पैसे देण्याचे नाकारत आहे.

- भगवान मोरे, शेतकरी

कोट.....

बँकेला अवकाळी नुकसानीच्या दुप्पट अनुदान प्रकरणी वसुलीच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रधानमंत्री किसान योजनेचे अनुदान रोखण्याच्या नाहीत. या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू.

उदय कुलकर्णी, तहसीलदार

इन्फो

आतापर्यंत १२ लाख रुपये वसूल

प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत लाभ मिळालेले शेकडो शेतकरी त्यांच्याकडे असलेल्या इतर उत्पन्न स्रोतांमुळे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरले असून सदर रक्कम भरून घेण्याची कार्यवाही सुरू असून आतापर्यंत १२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तथापि नांदगाव तालुक्यात इतर उत्पन्नातून आयकर भरणारे ५३० शेतकरी असून त्यांना प्रधान मंत्री किसान अनुदान योजनेतून देण्यात आलेले ५३ लाख रुपये व मयत असूनही लाभ घेतलेले, तसेच जे दुसरीकडे काम करत आहेत किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत अशा २१० व्यक्तींना मिळालेले १८ लाख रुपयांचे अनुदान वसूल करण्यात येत आहे. पात्र नसताना लाभ घेतलेल्या व्यक्तींना तलाठ्यामार्फत नोटिसा दिल्या आहेत. त्यातल्या १२ लाख रुपयांचा भरणा शासकीय तिजोरीत जमा करण्यात आला असून उर्वरित रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे.