शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

चूक शासनाची, वेठीला धरला शेतकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:13 IST

संजीव धामणे, नांदगाव : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान चुकीने दोनदा बँकेत संबंधित लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. ...

संजीव धामणे, नांदगाव : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान चुकीने दोनदा बँकेत संबंधित लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. ‘ते’ अतिरिक्त अनुदान वसूल करण्यासाठी बँकेस दिलेल्या शासकीय पत्राचा अन्वयार्थ काढण्यात झालेल्या गडबडीमुळे, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडची प्रधानमंत्री किसान योजनेची रक्कम देण्यात आलेली नाही. यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे.

अवकाळी अनुदानाचा राज्य शासनाशी संबंध आहे तर प्रधानमंत्री किसान योजनेचा केंद्र सरकारशी संबंध आहे. अवकाळीचे अनुदान दोनदा बँक खात्यात चुकून वर्ग झाल्याने त्याची वसुली करण्यासाठी तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी आयडीबीआय बँकेला पत्र दिले. पत्रात ‘डबल’ झालेली रक्कम वसूल करण्यासाठी खात्यातून रक्कम काढण्यावर निर्बंध घालण्यात आल्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिल्या. दरम्यान, प्रधानमंत्री किसान योजनेचे २००० रुपये खात्यावर जमा झाले. आयडीबीआय बँकेच्या सूचनेवरून ग्रामीण महाराष्ट्र बँकेने सदरचे पैसे देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांपुढे प्रश्न चिन्ह उभे राहिले. बँकेपुढे असाच पेच निर्माण झाला. एकीकडे राज्य शासनाचे अवकाळी नुकसानीचे चुकून दुप्पट दिलेले अनुदान वसूल करावयाचे तर दुसरीकडे केंद्र सरकारने आयकर भरणारे व इतर उत्पन्नाची साधने असलेल्या शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री योजनेच्या खात्यात वर्ग झालेला निधी वसूल करून शासनाला भरावयाचा. यामुळे बँकेकडून, डबल अनुदान न मिळालेले व उत्पन्नाच्या इतर साधनांचा स्रोत नाही, अशा खातेधारक शेतकऱ्यांनांही खात्यातून पैसे काढण्यास आडकाठी केली गेली. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

इन्फो

...ही आहे शेतकऱ्यांची भूमिका!

अवकाळी अनुदानाची खात्यावर अतिरिक्त जमा झालेली रक्कम कमाईच्या स्रोतामधून वसूल करण्यात आली तर त्यास शेतकऱ्यांचा आक्षेप नाही. मात्र प्रधानमंत्री योजनेतून मिळणारी रक्कम अनुदान आहे. तो प्राप्तीचा स्रोत नाही. म्हणून ती रक्कम रोखता येणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

कोट....

माझ्या खात्यावर अवकाळीचे अनुदान जमा नाही. तसेच इतर उत्पन्नाची साधने नाहीत. तरीही प्रधानमंत्री किसान योजनेचे पैसे काढण्यास बँक तहसीलदारांच्या पत्राचा हवाला देऊन पैसे देण्याचे नाकारत आहे.

- भगवान मोरे, शेतकरी

कोट.....

बँकेला अवकाळी नुकसानीच्या दुप्पट अनुदान प्रकरणी वसुलीच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रधानमंत्री किसान योजनेचे अनुदान रोखण्याच्या नाहीत. या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू.

उदय कुलकर्णी, तहसीलदार

इन्फो

आतापर्यंत १२ लाख रुपये वसूल

प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत लाभ मिळालेले शेकडो शेतकरी त्यांच्याकडे असलेल्या इतर उत्पन्न स्रोतांमुळे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरले असून सदर रक्कम भरून घेण्याची कार्यवाही सुरू असून आतापर्यंत १२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तथापि नांदगाव तालुक्यात इतर उत्पन्नातून आयकर भरणारे ५३० शेतकरी असून त्यांना प्रधान मंत्री किसान अनुदान योजनेतून देण्यात आलेले ५३ लाख रुपये व मयत असूनही लाभ घेतलेले, तसेच जे दुसरीकडे काम करत आहेत किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत अशा २१० व्यक्तींना मिळालेले १८ लाख रुपयांचे अनुदान वसूल करण्यात येत आहे. पात्र नसताना लाभ घेतलेल्या व्यक्तींना तलाठ्यामार्फत नोटिसा दिल्या आहेत. त्यातल्या १२ लाख रुपयांचा भरणा शासकीय तिजोरीत जमा करण्यात आला असून उर्वरित रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे.