शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

सामाजिक आसक्तीतूनच घडतो लेखक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:54 IST

सामाजिक होणं ही आपली आसक्ती असायला हवी. सामाजिक होण्याच्या आसक्तीतूनच लेखक जन्मतो आणि घडत जातो. लेखक नाहीच घडला तर निदान माणूस तरी घडायला हवा, असे मत नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी रविवारी (दि. २४) सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

नाशिक : सामाजिक होणं ही आपली आसक्ती असायला हवी. सामाजिक होण्याच्या आसक्तीतूनच लेखक जन्मतो आणि घडत जातो. लेखक नाहीच घडला तर निदान माणूस तरी घडायला हवा, असे मत नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी रविवारी (दि. २४) सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. दोनदिवसीय जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या दुसºया दिवसाच्या सत्राचे उद्घाटन मेळाव्याचे अध्यक्ष नाट्यलेखक दत्ता पाटील यांच्या बीजभाषणाने झाले. वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दत्ता पाटील यांनी साहित्यासह विविध विषयांना हात घालत आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य केले. आपल्या सभोवताली एकमेकांना नाकारणारी नवी व्यवस्था तयार व्हायला लागली असून, चर्चा आणि वाद यातील सीमारेषा पुसल्या गेल्या आहेत. चर्चा म्हणजेच वाद असे नवीन समीकरण तयार होऊ लागले आहे, हे सांगताना दत्ता पाटील यांनी सोशल मीडियावर जातीधर्मावरून, राजकारणावरून चाललेल्या उन्मादयुक्त व्हर्च्युअल दंगली डोळ्यांना सहजपणे दिसत असल्याचे सांगितले. चर्चेच्या पलीकडे पोहचलेले नेटिझन्स अतिशय उन्मादाने वावरत असून, ही एकप्रकारची हिंसाच आहे आणि ती शारीरिक हिंसेपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे सांगताना अशा व्यवस्थेवर ज्यांनी नियंत्रण राखायला हवे, अशा यंत्रणाच सोशल माध्यमांच्या पोशिंद्या आहेत हे ठळकपणे अधोरेखित केले तसेच आजच्या लेखकांच्या पिढीला याकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे आवाहन केले. जागतिकी करणानंतर खेडोपाडी अनेक स्थित्यंतरे बघायला मिळू लागली आहेत, मातीशी घट्ट नाळ असल्याशिवाय समकालीन भान येत नाही. अलीकडच्या काळात मातीतले लिहिणाºयांना पुरस्कारांच्या पातळीवर बसवत तातडीने त्यांना संपवून टाकण्याची घाई झाली असल्याचेही सांगितले. साहित्याची समाजकारण, राजकारणापासून फारकत होऊच शकत नाही तसेच जीवनशैलीवर राजकीय आणि जातीपातीच्या, धार्मिकतेच्या उन्मादी वातावरणाचा मोठा प्रभाव आहे हे वास्तव नाकारून चालत नाही तसेच आपल्याला या गोष्टींपासून अलिप्त राहताच येणार नाही, अशी व्यवस्था निर्माण होऊ लागली आहे. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष अ‍ॅड अभिजीत बगदे, सांस्कृतिक कार्यसचिव जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह आमदार देवयानी फरांदे आणि सुहास फरांदे उपस्थित होते.