शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

पंचतत्त्वानुसार उपासना पद्धती वेगळी

By admin | Updated: September 20, 2015 23:04 IST

कार्ष्णी स्वामी गुरुशरणानंद : संवित स्तोत्रावलीचे प्रकाशन

नाशिक : मनुष्याचे शरीर हे पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू आणि जल या पंचतत्त्वापासून बनले असून, परमेश्वरदेखील या पाच तत्त्वांनुसार स्वरूप साकार झाला आहे. ज्या शरीरात जे तत्त्व अधिक त्याप्रमाणे मनुष्य त्या देवतांची भक्ती-उपासना करतो. म्हणजे पृथ्वीतत्त्व अधिक असेल तर शिवभक्ती करतो आणि आकाशतत्त्व अधिक असेल तर विष्णूभक्ती करतो; परंतु अनेक रूपे असली तरी परमेश्वर एकच आहे, असे विचार कार्ष्णी स्वामी गुरुशरणानंद महाराज यांनी मांडले. पंचवटीतील भक्तिधाम-कैलास मठ येथे सुरू असलेल्या रामकथेच्या समारोप व स्वामी संविदानंद सरस्वती संकलित संवित स्तोत्रावली ग्रंथाचे प्रकाशन सभारंभात महाराज बोलत होते. याप्रसंगी पुढे महाराज म्हणाले की, आपल्या सनातन हिंदू धर्मावर अनेक आरोप होतात; परंतु मन, बुद्धी, चित्त यांची एकाग्रता साधून अहंकाराचा नाश करण्याचे सामर्थ्य धर्म ग्रंथात व साधू-संतांच्या विचारात आहे. देवाचे स्वरूप अनंत आहे. परमेश्वर प्राप्तीचा खरा मार्ग जाणून घेण्यासाठी धर्मग्रंथाचे वाचन व अभ्यास व्हावा, असे सांगून त्यांनी स्वामी संविदानंद सरस्वती यांनी संकलित केलेल्या स्तोत्र ग्रंथाचे कौतुक केले. याप्रसंगी रामकथा प्रवचनकार प्रेमभूषण महाराज, मलुकापीठाधिश्वर राजेंद्र देवाचार्य महाराज, स्वामी कैलाशानंद महाराज, स्वामी अवधेशानंद महाराज, स्वामी हरिचैतन्य महाराज आदिंनी विचार मांडले. प्रास्ताविकात स्वामी संविदानंद महाराज यांनी कैलास मठाची परंपरा तसेच, ग्रंथाच्या संकलनामागील संकल्पना स्पष्ट केली. याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर गुरुमित बग्गा, सिद्धानंद महाराज, महेशानंद महाराज, अमित चंदजी, नरेश सभरवाल, लालचंद गुप्ता, अभयनंद महाराज आदि उपस्थित होते. यावेळी संत-महंतांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्याम चैतनजी यांनी केले.