शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

जागतिक अर्थव्यवस्था अधांतरी अभय टिळक : ‘संक्रमणपर्वातील जग-भारत’ विषयावर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:46 IST

नाशिक : यंत्रमानवाच्या वापरात होत असलेली वाढ, आर्थिक पुनर्रचन, मध्यवर्गीयांची आर्थिक स्तर वाढवण्यासाठी चाललेली धरपड, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जगभरातील शासनाकडून कर्ज काढण्याचे वाढणारे प्रमाण यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अद्यापही संक्रमणातून जात आहे.

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात बॅँका डबघाईसआर्थिक पुनर्रचनेला दमदार सुरुवात

नाशिक : यंत्रमानवाच्या वापरात होत असलेली वाढ, आर्थिक पुनर्रचन, मध्यवर्गीयांची आर्थिक स्तर वाढवण्यासाठी चाललेली धरपड, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जगभरातील शासनाकडून कर्ज काढण्याचे वाढणारे प्रमाण यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अद्यापही संक्रमणातून जात असून, तिला सावरण्यास हळू हळू सुरुवात होत आहे, असे प्रतिपादन अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभय टिळक यांनी केले.श्री समर्थ सहकारी बॅँकेच्या वतीने कै. मधुकर कुलकर्णी यांच्या ७व्या स्मृतिदिनानिमित्त ‘संक्रमणपर्वातील जग आणि भारत’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात शुक्रवारी (दि.२९) व्याख्यानात टिळक पुढे म्हणाले की, अमेरिकेने मोठ्या प्रमाणात दिलेली कर्जे आणि त्याची न होत असलेली परतफेड यामुळे मोठ्या प्रमाणात बॅँका डबघाईस गेल्या व त्याचा परिणाम भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेवर झाला. २००८ साली झालेल्या या घटनेनंतर अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांनी हे प्रकरण २०२० पर्यंत स्थिरावू शकेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्याकाळी अमेरिकन जनतेने त्यांना गांभिर्याने घेतले नव्हते पण आज त्यांची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरत असून आर्थिक पुनर्रचनेला आता दमदार सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक संक्रमणात यंत्रमानवाचा वाढत चाललेला वापर बेरोजगारी वाढवणारा ठरेल की काय इतपत भयावह स्थिती निर्माण झाली आहे.अमेरिकेची डगमगलेली अर्थव्यवस्था केवळ अमेरिकेलाच त्रासदायक न ठरता ती जगभरातील अर्थव्यवस्थेला मारक ठरली आहे. जगभरातील सरकारांना त्यामुळे कर्जे घ्यावी लागली. त्याची परतफेड न झाल्याने आणखी कर्जे घ्यावी लागली. जगभरातील उद्योग, व्यवसाय या सर्व विकसित पट्ट्यात सरकार आजही कर्जबाजारी असून हे चित्र बदलण्यास आत्ताशी सुरुवात झाली आहे. त्याुळे अर्थव्यवस्थेची गुंतागुंत समजावून घेणे आवश्यक बनले आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. जागतिकीकरण वाढत चालले असताना स्थानिक वस्तूंना, स्थानिक बाजारपेठ, स्थानिक ग्राहकांना स्थानिक स्तरावरच त्याचा लाभ मिळणे या गोष्टी झाल्या पाहिजे, असा विचारही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी मधुकर कुलकर्णी यांच्या जीवनावर चित्रफित दाखविण्यात आली. अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांनी टिळक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.पुणेकर आहे, पण पुणेरी नाहीकार्यक्रमाच्या प्रारंभी टिळक यांचा पुणेकर, असा परिचय करून देण्यात आला. त्यावर आपला जन्म पुण्यात, सदाशिव पेठेत झाला असून, आडनाव टिळक असल्याने त्या अर्थाने पुणेकर असलो तरी पुणेरी संस्काराचा नाही असे स्पष्टीकरण देताच सभागृहात हशा पिकला.