शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

जागतिक अर्थव्यवस्था अधांतरी अभय टिळक : ‘संक्रमणपर्वातील जग-भारत’ विषयावर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:46 IST

नाशिक : यंत्रमानवाच्या वापरात होत असलेली वाढ, आर्थिक पुनर्रचन, मध्यवर्गीयांची आर्थिक स्तर वाढवण्यासाठी चाललेली धरपड, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जगभरातील शासनाकडून कर्ज काढण्याचे वाढणारे प्रमाण यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अद्यापही संक्रमणातून जात आहे.

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात बॅँका डबघाईसआर्थिक पुनर्रचनेला दमदार सुरुवात

नाशिक : यंत्रमानवाच्या वापरात होत असलेली वाढ, आर्थिक पुनर्रचन, मध्यवर्गीयांची आर्थिक स्तर वाढवण्यासाठी चाललेली धरपड, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जगभरातील शासनाकडून कर्ज काढण्याचे वाढणारे प्रमाण यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अद्यापही संक्रमणातून जात असून, तिला सावरण्यास हळू हळू सुरुवात होत आहे, असे प्रतिपादन अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभय टिळक यांनी केले.श्री समर्थ सहकारी बॅँकेच्या वतीने कै. मधुकर कुलकर्णी यांच्या ७व्या स्मृतिदिनानिमित्त ‘संक्रमणपर्वातील जग आणि भारत’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात शुक्रवारी (दि.२९) व्याख्यानात टिळक पुढे म्हणाले की, अमेरिकेने मोठ्या प्रमाणात दिलेली कर्जे आणि त्याची न होत असलेली परतफेड यामुळे मोठ्या प्रमाणात बॅँका डबघाईस गेल्या व त्याचा परिणाम भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेवर झाला. २००८ साली झालेल्या या घटनेनंतर अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांनी हे प्रकरण २०२० पर्यंत स्थिरावू शकेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्याकाळी अमेरिकन जनतेने त्यांना गांभिर्याने घेतले नव्हते पण आज त्यांची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरत असून आर्थिक पुनर्रचनेला आता दमदार सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक संक्रमणात यंत्रमानवाचा वाढत चाललेला वापर बेरोजगारी वाढवणारा ठरेल की काय इतपत भयावह स्थिती निर्माण झाली आहे.अमेरिकेची डगमगलेली अर्थव्यवस्था केवळ अमेरिकेलाच त्रासदायक न ठरता ती जगभरातील अर्थव्यवस्थेला मारक ठरली आहे. जगभरातील सरकारांना त्यामुळे कर्जे घ्यावी लागली. त्याची परतफेड न झाल्याने आणखी कर्जे घ्यावी लागली. जगभरातील उद्योग, व्यवसाय या सर्व विकसित पट्ट्यात सरकार आजही कर्जबाजारी असून हे चित्र बदलण्यास आत्ताशी सुरुवात झाली आहे. त्याुळे अर्थव्यवस्थेची गुंतागुंत समजावून घेणे आवश्यक बनले आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. जागतिकीकरण वाढत चालले असताना स्थानिक वस्तूंना, स्थानिक बाजारपेठ, स्थानिक ग्राहकांना स्थानिक स्तरावरच त्याचा लाभ मिळणे या गोष्टी झाल्या पाहिजे, असा विचारही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी मधुकर कुलकर्णी यांच्या जीवनावर चित्रफित दाखविण्यात आली. अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांनी टिळक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.पुणेकर आहे, पण पुणेरी नाहीकार्यक्रमाच्या प्रारंभी टिळक यांचा पुणेकर, असा परिचय करून देण्यात आला. त्यावर आपला जन्म पुण्यात, सदाशिव पेठेत झाला असून, आडनाव टिळक असल्याने त्या अर्थाने पुणेकर असलो तरी पुणेरी संस्काराचा नाही असे स्पष्टीकरण देताच सभागृहात हशा पिकला.