शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मोडणारे संसार पोलिसांमुळे जुळले

By admin | Updated: March 8, 2017 00:19 IST

नाशिक : शहर व ग्रामीण पोलीस दलातील महिला सुरक्षा विशेष शाखेने गत वर्षभरात ३५५ मोडकळीस आलेल्या संसारांना जोडण्याचे कठीण काम केले आहे़

विजय मोरे : नाशिकसासू-सासऱ्यांसोबत पटत नाही म्हणून पूर्वी घरात भांडणे होत असत. मात्र, आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नवरा-बायकोमध्ये भांडणे होत आहेत. नोकरदार नवरा-बायकोत तर हे प्रमाण अधिक जाणवतेय... चहा-नाष्टा तुझे तू करून घे, मीही तुझ्यासारखीच नोकरी करते, मीही पैसे कमावते, इथपासून तर घरी येण्यास उशीर का, संशयावरून एकमेकांच्या मोबाइलमधील मेसेज, सोशल मीडियावरील कॉमेंट्स तपासणे या गोष्टीही संसार मोडकळीला येण्यास कारणीभूत ठरत आहेत. या संसारांना टिकविण्यासाठी महत्त्वाचा आधार म्हणजे दोघांचेही समुपदेशऩ नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलातील महिला सुरक्षा विशेष शाखेने गत वर्षभरात ३५५ मोडकळीस आलेल्या संसारांना जोडण्याचे कठीण काम केले आहे़  प्रेमविवाह असो की ठरवून केलेला विवाह असो संसारातील भांडण हा अविभाज्य घटक आहे़ नवरा-बायकोपैकी कुणाच्या एकाचा अहंकार, गैरसमजूत, क्षुल्लक, किरकोळ वाद वेळीच न शमल्याने तो घटस्फोटापर्यंतही पोहोचल्याची अनेक उदाहरणे आहेत़ याचे प्रमुख कारण म्हणजे या दोघांपैकी एकही जण माघार घेण्यासाठी तयार नसतो़ त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या लहान मुलांची मात्र ससेहोलपट होते़ भांडणाचा परिणाम त्या कोवळ्या मुलांवर होत असतो, याची जाणीव त्या दोघांनाही नसते आणि असलीच तरी ती करून घ्यायची नसते. नातेवाईक, मित्रमंडळी आपापल्या परीने यात लक्ष घालून सल्ले देण्याचे काम करत असतात. मात्र तरीही काही फरक पडत नसल्याने शेवटी पोलीस ठाण्याची पायरी दोघेही चढतात. महिलांवरील अत्याचारासाठी शहर तसेच ग्रामीण पोलीस मुख्यालयात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत महिला सुरक्षा विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या दोन्ही कक्षांकडे गत वर्षभरात १ हजार २५२ तक्रारी आल्या. या तक्रारींची दखल घेऊन तक्रारदार नवरा-बायकोचे समुपदेशन करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम या विशेष कक्षाने केले. यासाठी येथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी आपापल्या परीने समुपदेशन करतात. त्यात त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळत असल्याचे दिसून येते.  जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षभराच्या कालावधीत आलेल्या तक्रार अर्जांपैकी शहर महिला शाखेस १८७, तर ग्रामीण पोलीस महिला शाखेला १६८ असे एकूण ३५५ अर्ज समुपदेशनाच्या माध्यमातून निकाली काढण्यात यश आले. उर्वरित अर्जांमध्ये तडजोड न झाल्याने नाइलाजाने गुन्हे नोंदविण्याची वेळ आली आहे. या शाखेकडे येणारे अर्ज हे प्रामुख्याने महिलांवरील अत्याचाराचे असतात. तर काही प्रकरणांमध्ये महिलांकडूनही पुरुषांना त्रास होत असल्याचे दिसून येते. अनेकदा एकाच बैठकीत प्रश्न सुटले नाहीत, तरी दोन-तीन बैठकांमध्ये प्रश्न सोडवले जातात. अनेक प्रकरणांमध्ये पती-पत्नी दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. अशावेळी कक्षातील महिलांचे प्रयत्न कमी पडले, तर अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने समुपदेशन केले जाते. आपसात तडजोड केली नाही, तर नाइलाजाने गुन्हा दाखल करावा लागेल आणि एकदा गुन्हा दाखल झाला, तर अनेक अडचणी निर्माण होतील, या भीतीपोटी अनेकांनी आपले संसार जुळवून घेतल्याची माहिती महिला विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे़