शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोडणारे संसार पोलिसांमुळे जुळले

By admin | Updated: March 8, 2017 00:19 IST

नाशिक : शहर व ग्रामीण पोलीस दलातील महिला सुरक्षा विशेष शाखेने गत वर्षभरात ३५५ मोडकळीस आलेल्या संसारांना जोडण्याचे कठीण काम केले आहे़

विजय मोरे : नाशिकसासू-सासऱ्यांसोबत पटत नाही म्हणून पूर्वी घरात भांडणे होत असत. मात्र, आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नवरा-बायकोमध्ये भांडणे होत आहेत. नोकरदार नवरा-बायकोत तर हे प्रमाण अधिक जाणवतेय... चहा-नाष्टा तुझे तू करून घे, मीही तुझ्यासारखीच नोकरी करते, मीही पैसे कमावते, इथपासून तर घरी येण्यास उशीर का, संशयावरून एकमेकांच्या मोबाइलमधील मेसेज, सोशल मीडियावरील कॉमेंट्स तपासणे या गोष्टीही संसार मोडकळीला येण्यास कारणीभूत ठरत आहेत. या संसारांना टिकविण्यासाठी महत्त्वाचा आधार म्हणजे दोघांचेही समुपदेशऩ नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलातील महिला सुरक्षा विशेष शाखेने गत वर्षभरात ३५५ मोडकळीस आलेल्या संसारांना जोडण्याचे कठीण काम केले आहे़  प्रेमविवाह असो की ठरवून केलेला विवाह असो संसारातील भांडण हा अविभाज्य घटक आहे़ नवरा-बायकोपैकी कुणाच्या एकाचा अहंकार, गैरसमजूत, क्षुल्लक, किरकोळ वाद वेळीच न शमल्याने तो घटस्फोटापर्यंतही पोहोचल्याची अनेक उदाहरणे आहेत़ याचे प्रमुख कारण म्हणजे या दोघांपैकी एकही जण माघार घेण्यासाठी तयार नसतो़ त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या लहान मुलांची मात्र ससेहोलपट होते़ भांडणाचा परिणाम त्या कोवळ्या मुलांवर होत असतो, याची जाणीव त्या दोघांनाही नसते आणि असलीच तरी ती करून घ्यायची नसते. नातेवाईक, मित्रमंडळी आपापल्या परीने यात लक्ष घालून सल्ले देण्याचे काम करत असतात. मात्र तरीही काही फरक पडत नसल्याने शेवटी पोलीस ठाण्याची पायरी दोघेही चढतात. महिलांवरील अत्याचारासाठी शहर तसेच ग्रामीण पोलीस मुख्यालयात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत महिला सुरक्षा विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या दोन्ही कक्षांकडे गत वर्षभरात १ हजार २५२ तक्रारी आल्या. या तक्रारींची दखल घेऊन तक्रारदार नवरा-बायकोचे समुपदेशन करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम या विशेष कक्षाने केले. यासाठी येथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी आपापल्या परीने समुपदेशन करतात. त्यात त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळत असल्याचे दिसून येते.  जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षभराच्या कालावधीत आलेल्या तक्रार अर्जांपैकी शहर महिला शाखेस १८७, तर ग्रामीण पोलीस महिला शाखेला १६८ असे एकूण ३५५ अर्ज समुपदेशनाच्या माध्यमातून निकाली काढण्यात यश आले. उर्वरित अर्जांमध्ये तडजोड न झाल्याने नाइलाजाने गुन्हे नोंदविण्याची वेळ आली आहे. या शाखेकडे येणारे अर्ज हे प्रामुख्याने महिलांवरील अत्याचाराचे असतात. तर काही प्रकरणांमध्ये महिलांकडूनही पुरुषांना त्रास होत असल्याचे दिसून येते. अनेकदा एकाच बैठकीत प्रश्न सुटले नाहीत, तरी दोन-तीन बैठकांमध्ये प्रश्न सोडवले जातात. अनेक प्रकरणांमध्ये पती-पत्नी दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. अशावेळी कक्षातील महिलांचे प्रयत्न कमी पडले, तर अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने समुपदेशन केले जाते. आपसात तडजोड केली नाही, तर नाइलाजाने गुन्हा दाखल करावा लागेल आणि एकदा गुन्हा दाखल झाला, तर अनेक अडचणी निर्माण होतील, या भीतीपोटी अनेकांनी आपले संसार जुळवून घेतल्याची माहिती महिला विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे़